शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सत्य, सूत्र आणि स्वीकार

By admin | Updated: February 6, 2017 23:48 IST

भल्यामोठ्या मंडपातल्या रिकाम्या खुर्च्या, ‘समीक्षेची समीक्षा’ असल्या किचकट विषयांवरल्या चर्चांच्या रतिबाने आणलेल्या कंटाळ्याचा तवंग

भल्यामोठ्या मंडपातल्या रिकाम्या खुर्च्या, ‘समीक्षेची समीक्षा’ असल्या किचकट विषयांवरल्या चर्चांच्या रतिबाने आणलेल्या कंटाळ्याचा तवंग, विक्रमी विक्रीचे आकडे गाठू न शकलेले पुस्तक प्रदर्शन आणि वेळ काढून साहित्याच्या अंगणी आलेले; पण व्यासपीठावर काय चालले आहे त्यापेक्षा मंडपाबाहेर पुलं आणि बहिणाबार्इंच्या पुतळ्यांबरोबर सेल्फी काढण्यात रमलेले रसिक हे यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे एकूण फलित !! समारोपाचे सूप एरवी साहित्यिक खडाखडीत वाजते, यावर्षी ते निवडणुकांच्या गदारोळात यथास्थित राडा घालून वाजले एवढेच ! पण एरवी साहित्यबाह्य उद्देशांपोटी हा पसारा मांडणारे स्थानिक आयोजक आणि वादांचे रण लढवून निवडून आलेले अध्यक्ष वगळता ‘साहित्य संमेलन’ या एकेकाळी साहित्यिक-सांस्कृतिक आब असलेल्या आयोजनाबद्दलचा एकूण मराठी कळवळा दरवर्षी उणावतच चाललेला दिसतो.

असे का झाले असावे? एरवी मराठीच्या नावाने सोयीसोयीने कढ काढणे घडत असले आणि शासकीय दुर्लक्षाची रड कायम असली तरी या भाषेच्या व्यवहाराचे फार वाईट चाललेले नाही. पुस्तके खपतात, गाणी वाजतात, नाटके चालतात, सिनेमे धावतात... मराठी प्रकाशकांनीही कधी नव्हे ते एकत्र येऊन ‘रीडर अ‍ॅप’ वगैरे ‘लॉँच’ करणे हे ‘भावने’ला अत्यावश्यक व्यवहाराचे कालानुरूप कोंदण मिळत असल्याचे आणखी एक ताजे उदाहरण ! पण साहित्य संमेलनाचा चेहरा मात्र हिरमुसलेला आणि कावलेला !! का? कालबाह्यता हे त्याचे एक महत्त्वाचे कारण ! हे संमेलन ज्या पद्धतीने आखले जाते, त्यातले मुख्य व्यासपीठ जुनाट चर्चांची जी गुऱ्हाळे दरवर्षी लावते, त्यातले तेच तेच लोक ज्या भाषेत जे बोलतात; यातल्या कशाचाही नव्या मराठी वाचकांशी, रसिकांशी कसला म्हणून धागा असेल तर शपथ !! एका बाजूला देशभरात ‘कार्पोरेट’ पद्धतीने आयोजित केलेल्या, साहित्य-संगीत-चित्र-शिल्प-संगीताची मनोज्ञ सांगड घालणाऱ्या ‘लिट-फेस्ट’ना सुगीचे दिवस आलेले असताना मराठी साहित्य संमेलनाचे हे असे जुनाट होत जाणे क्लेशदायी आहे.

अनेकानेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या आजी-माजी अध्यक्षांनी या साहित्य संंमेलनात ‘सूत्रा’ऐवजी ‘सत्या’च्या देवघेवीचा नवा पायंडा पाडला. हा नुसता शब्दखेळ न राहील तर बरे! रसिक-वाचकांच्या वर्तमान गरजा आणि मनोवस्थेशी साहित्य संमेलनाच्या कालबाह्य झालेल्या आराखड्याचे नाते उरलेले नाही या ‘सत्या’चा निदान ‘स्वीकार’ करणे या अध्यक्षद्वयांनी साहित्य-संस्थांना भाग पाडावे. इतपत सत्य पेलायला तशीही फार मोठ्या प्रज्ञेची गरज पडू नये!