शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

त्रिपुरारी पौर्णिमा माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:35 IST

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला.

- नंदकिशोर पाटीलत्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे आणि त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात!दोन वर्षांपूर्वी भागवतांनी चिंतन शिबिरात सांगितलेलं हे ‘त्रिपुरा पौर्णिमा’ महात्म्य तेव्हा काही स्वयंसेवकांच्या डोक्यावरून गेलं होतं. कोण हा त्रिपुरासुर? कुठे आहे त्याचे ते नगर? चिंतनाचा विषय तर ‘पूर्वांचल की ओर’ असा असताना अचानक हे त्रिपुरारी पुराण का? एक ना अनेक अशा अनुत्तरित प्रश्नांना मागे सोडून ती बैठक पार पडली...भागवतांच्या बौद्धिकाचे हेच तर वैशिष्ट्य. ते जेव्हा डावीकडे बघा, असे म्हणतात तेव्हा ऐकणा-यांना वाटतं, ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत असावेत. पण स्वयंसेवकाला हा इशारा पुरेसा असतो. लागलीच ते आपली शबनम काखेत अडकवून पश्चिम बंगाल अथवा केरळकडे कूच करतात. तेव्हाही असेच घडले. ‘दक्षिणायन’ शिबिरात भागवतांनी स्कंद पुराणातील त्रिपुरारी पौर्णिमेचं महात्म्य सांगताच देवधर आदी स्वयंसेवकांनी आपला मुक्काम आगरतळाकडे हलविला होता. गेली दोन दशकं त्रिपुरात माणिकांचं सरकार होतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी या न्यायानं चालणारं. जातीय दंगली आणि भ्रष्टाचाराचा मागमूस नसल्याने वरकरणी ही लढाई सोपी नव्हती. कूटनीतीचा कस लागणार होता. देव आणि दैत्याचे द्वंद्वं उभं केल्याखेरीस जनतेला भाविक बनविता येणार नाहीे, हे भागवतांना ठाऊक होतं. कर्मसिध्दांताची पाठराखण आणि लेनिनवादावर ठाम विश्वास असलेल्या इथल्या कर्मठ ‘सरकार’चा तर देवाशीच उभा दावा...अखेर भागवतांना लढाईचे सूत्र गवसले. त्रिपुरातील ‘माणिक’मोती टिपायचे असतील तर ही कामगिरी एखाद्या देवावर सोपवायला हवी! देवधर होतेच. देवाचा शोध सुरू झाला. अन् दैवयोग असा की, कधीकाळी व्यायामशाळेत (जिम) प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) असलेले विप्लव कुमार देव नावाचे कार्यकर्ते संघातच होते! त्रिपुराच्या लढाईचा नायक ठरला. आता संहिता बाकी होती. नवमतदारांना पुराणातील वांगी दाखवून आकर्षित करता येणार नव्हते. भविष्य आणि भुकेच्या चिंतेतून त्यांना मुक्ती हवी होती.अच्छेदिनाचे स्वप्न दाखवून भूक तात्पुरती का होईना शमविता येते, हा पूर्वानुभव असल्याने ‘माणिक नही हिरा चाहिए’! अशी आकर्षक घोषणा तयार झाली. संघाकडे प्रचारकांची वानवा नव्हती. बघता-बघता घरोघरी ही घोषणा पोहोचली. कालपरवापर्यंत माणिकांच्या नावाचा जप करणारी पिढी स्वप्नातील या हि-यास (हायवे, इंटरनेट, रोडवे अन् एअरवेज) भुलली अन् सरकारबरोबर ‘लेनिन’ही धारातीर्थी पडले!