शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरारी पौर्णिमा माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:35 IST

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला.

- नंदकिशोर पाटीलत्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे आणि त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात!दोन वर्षांपूर्वी भागवतांनी चिंतन शिबिरात सांगितलेलं हे ‘त्रिपुरा पौर्णिमा’ महात्म्य तेव्हा काही स्वयंसेवकांच्या डोक्यावरून गेलं होतं. कोण हा त्रिपुरासुर? कुठे आहे त्याचे ते नगर? चिंतनाचा विषय तर ‘पूर्वांचल की ओर’ असा असताना अचानक हे त्रिपुरारी पुराण का? एक ना अनेक अशा अनुत्तरित प्रश्नांना मागे सोडून ती बैठक पार पडली...भागवतांच्या बौद्धिकाचे हेच तर वैशिष्ट्य. ते जेव्हा डावीकडे बघा, असे म्हणतात तेव्हा ऐकणा-यांना वाटतं, ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत असावेत. पण स्वयंसेवकाला हा इशारा पुरेसा असतो. लागलीच ते आपली शबनम काखेत अडकवून पश्चिम बंगाल अथवा केरळकडे कूच करतात. तेव्हाही असेच घडले. ‘दक्षिणायन’ शिबिरात भागवतांनी स्कंद पुराणातील त्रिपुरारी पौर्णिमेचं महात्म्य सांगताच देवधर आदी स्वयंसेवकांनी आपला मुक्काम आगरतळाकडे हलविला होता. गेली दोन दशकं त्रिपुरात माणिकांचं सरकार होतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी या न्यायानं चालणारं. जातीय दंगली आणि भ्रष्टाचाराचा मागमूस नसल्याने वरकरणी ही लढाई सोपी नव्हती. कूटनीतीचा कस लागणार होता. देव आणि दैत्याचे द्वंद्वं उभं केल्याखेरीस जनतेला भाविक बनविता येणार नाहीे, हे भागवतांना ठाऊक होतं. कर्मसिध्दांताची पाठराखण आणि लेनिनवादावर ठाम विश्वास असलेल्या इथल्या कर्मठ ‘सरकार’चा तर देवाशीच उभा दावा...अखेर भागवतांना लढाईचे सूत्र गवसले. त्रिपुरातील ‘माणिक’मोती टिपायचे असतील तर ही कामगिरी एखाद्या देवावर सोपवायला हवी! देवधर होतेच. देवाचा शोध सुरू झाला. अन् दैवयोग असा की, कधीकाळी व्यायामशाळेत (जिम) प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) असलेले विप्लव कुमार देव नावाचे कार्यकर्ते संघातच होते! त्रिपुराच्या लढाईचा नायक ठरला. आता संहिता बाकी होती. नवमतदारांना पुराणातील वांगी दाखवून आकर्षित करता येणार नव्हते. भविष्य आणि भुकेच्या चिंतेतून त्यांना मुक्ती हवी होती.अच्छेदिनाचे स्वप्न दाखवून भूक तात्पुरती का होईना शमविता येते, हा पूर्वानुभव असल्याने ‘माणिक नही हिरा चाहिए’! अशी आकर्षक घोषणा तयार झाली. संघाकडे प्रचारकांची वानवा नव्हती. बघता-बघता घरोघरी ही घोषणा पोहोचली. कालपरवापर्यंत माणिकांच्या नावाचा जप करणारी पिढी स्वप्नातील या हि-यास (हायवे, इंटरनेट, रोडवे अन् एअरवेज) भुलली अन् सरकारबरोबर ‘लेनिन’ही धारातीर्थी पडले!