शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देशाचे द्रोही व प्रेमी

By admin | Updated: January 11, 2016 02:58 IST

भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही,

भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही, पण जन्माने भारतीय नागरिक असलेल्या आमीर खानला मात्र ती जाणवली, परिणामी आमीर खान देशद्रोही ठरत असेल तर सामी देशाचा परमप्रेमी देशभक्त ठरायला हरकत नाही. केन्द्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ या जाहिरात मोहिमेचा आमीर खान इतके दिवस प्रतिमादूत होता. त्याला आता तेथून हटविण्यात आले आहे. पण हटविले की त्याची मुदत संपली यावरून पर्यटन मंत्रालयात असलेला गोंधळ आधीच उघड झाला होता. हाच विषय संबंधित मंत्रालयाच्या संसदीय समितीत उपस्थित झाला तेव्हा आमीरच्या उच्चाटनाला इतके महत्त्व देण्याची गरज नाही कारण तो देशद्रोही आहे अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी उधळली. हे महोदय भोजपुरी सिनेमातले सुपरस्टार समजले जातात. म्हणजे त्यांचा आणि आमीरचा कुणबा एकच. एक बरे झाले, आमीरला जाणवलेल्या असहिष्णुतेचे प्रत्यक्ष दर्शन तिवारी यांनी घडविले. तिकडे तो वाद सुरू असताना इकडे मुंबईत आमीर आणि शाहरुख यांना मिळत असलेली मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यावरून माध्यमांंमधून मोठा गोंधळ सुरू आहे. या दोघांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात व्यक्त केलेली नापसंती सरकारला आवडली नाही म्हणून त्यांना ही शिक्षा असा माध्यमांचा सूर आहे. मुळात केवळ मुंबईतच नव्हे तर अन्यत्रही बड्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कामी येत असल्याने कायदा सुव्यवस्था अधिक धोक्यात येत चालली आहे व त्यामुळे ती कमी करावी अशी टीका माध्यमेच करीत असतात. त्यातून सिनेमा व्यवसायातील सर्व तारे-तारका त्यांच्या पदरी खासगी बाऊन्सर्सचा ताफा बाळगत असतात व त्यांच्या पुढ्यात आपले पोलीस बिचारे फारच किरकोळ भासत असतात. अशा स्थितीत केली सुरक्षा कमी तर त्यातून एवढा गहजब माजण्याचे किंवा माजवला जाण्याचे काही कारणच नाही.