शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

अनुशेषाचे कवित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:20 IST

आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमाती कल्याण समितीचा क्षेत्रिय पाहणी दौरा नुकताच झाला. एकूण 15 आमदारांच्या समितीने तीन दिवस जिल्ह्यात थांबून विविध बैठकांसह जिल्ह्यातील 42 ठिकाणी कामांची पाहणी केली. या समितीच्या दौ:यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रशासन आठवडाभर तणावाखाली होते. नव्हे तर कामाच्या ठिकाणी सर्वच कर्मचारी व अधिकारी चोखपणे आपले कर्तव्य ...

आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमाती कल्याण समितीचा क्षेत्रिय पाहणी दौरा नुकताच झाला. एकूण 15 आमदारांच्या समितीने तीन दिवस जिल्ह्यात थांबून विविध बैठकांसह जिल्ह्यातील 42 ठिकाणी कामांची पाहणी केली. या समितीच्या दौ:यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रशासन आठवडाभर तणावाखाली होते. नव्हे तर कामाच्या ठिकाणी सर्वच कर्मचारी व अधिकारी चोखपणे आपले कर्तव्य  बजावताना दिसून आल्याने ग्रामीण आदिवासी जनतेला आठवडाभर जणू प्रशासन जवळ आल्याचा अनुभव आला. त्यानिमित्ताने शासकीय इमारतींमध्ये रंगरंगोटी व स्वच्छताही झाली. समितीने भेटी दिलेल्या काही कामांच्या ठिकाणी प्रशासन सतर्क राहूनही त्रुटी दिसून आल्याने त्याबाबत संबंधितांवर कारवाईचे आदेश देतांना चांगल्या कामाची पाठ थोपटून ही समिती रवाना झाली. विशेषत: जिल्ह्यात रिक्त पदांचा मोठा अनुषेश असल्याने समितीने नाराजी व्यक्त केली. आदिवासी क्षेत्रातील कामांची पाहणी करून त्याचे मूल्यमापन करावे व त्या भागातील विकासासाठी काय आवश्यक आहे किंवा कुठल्या त्रुटी आहेत त्याबाबतचा अहवाल ही समिती विधी मंडळाला सादर करीत असते. विधीमंडळाने या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी असा सर्व साधारण त्या मागचा उद्देश असतो. मात्र दुदैवाची बाब म्हणजे समितीच्या दौ:यानंतर त्याबाबतचा अहवालावर फारशी अंमलबजावणी होत नाही असा आजवरचा अनुभव आहे. कारण नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त पदांचा अनुषेश हा जिल्हा निर्मितीपासून आहे. या जिल्ह्याची निर्मिती होवून 21 वर्षे झालीत. जिल्ह्याची निर्मिती झाली त्या वेळी मुळ अर्थात धुळे जिल्ह्यातील एक तृतीयांश कर्मचारी वर्ग करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्याही पेक्षा कमी कर्मचारी मिळाले. त्यामुळे अपू:या कर्मचारी वर्गातच या जिल्ह्याचा गाडा सुरू आहे. त्याचा परिणाम विकासाच्या गतीवर झाला आहे. आजच्या स्थितीत जवळपास मंजूर पदांपेक्षा सर्व विभागात दोन हजार पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यातच आदिवासी विकास विभागातील ही संख्या मोठी आहे. आश्रमशाळांवर त्याचा मोठा परिणाम जाणवत असल्याने आदिवासी विद्यार्थी दरवर्षी शिक्षक मिळावेत यासाठी प्रकल्प कार्यालयावर 20 ते 50 किलोमीटरची पायपीट करून मोर्चा काढत असतात. पण त्यांना अद्याप शिक्षक मिळालेले नाहीत. आरोग्याची अवस्था यापेक्षा चांगली नाही. कृषी तथा ग्रामपातळीवर काम करणारी यंत्रणा पुरेशी नाही. अशा स्थितीत नुकतीच जिल्ह्यात आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित करून त्याकडे लक्ष वेधले आहे. ही समिती या संदर्भात विधी मंडळाकडे अहवाल सादर करणार आहेच आता विधी मंडळाने त्याचे गांभीर्य घेवून किमान या वेळी तरी जिल्ह्यातील रिक्त पदांचे अनुषेश भरण्याची प्रक्रिया सुरू करेल, अशी आदिवासींची अपेक्षा आहे.