शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

रेल्वे प्रवास असुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 04:04 IST

अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर रेल्वेने गारूड केले आहे. प्रवास करणे तर सोडाच, नुसती डोळ्यासमोरून जरी धडधडत गेली तरी आजही आपण तेवढ्याच कुतुहलाने

अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर रेल्वेने गारूड केले आहे. प्रवास करणे तर सोडाच, नुसती डोळ्यासमोरून जरी धडधडत गेली तरी आजही आपण तेवढ्याच कुतुहलाने तिच्याकडे पाहतो. तिचे हे धडधडत जाणे कुठेतरी मनात भीतीचे कंपणे निर्माण करणारे असले तरी त्या तुलनेत तिचे दर्शन अधिक सुखदायक असते, हेही तितकेच खरे. झूक झूक झूक झूक आगीण गाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी.. असे गुणगुणत मामाच्या गावाला रेल्वेतून प्रवास करताना जो आनंद आपण अनुभवला, त्याची आजही आठवण आल्हाददायी असते. परंतु या धकाधकीच्या काळात मामाच्या गावाचा हा प्रवास मात्र कठीण होताना दिसतो आहे. आरक्षणापासून ते नियोजित स्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण प्रवासात जिवाची जी घालमेल चालू असते. पूर्वी हजार टक्के सुरक्षित वाटणाऱ्या रेल्वे प्रवासाबद्दल आता थोडी साशंकता निर्माण होत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. मराठवाड्यात गेल्या आठवड्यात ज्या काही दोन घटना घडल्या, त्या बघून प्रवाशांना सुरक्षितता देण्यास रेल्वे प्रशासन कमी पडत आहे की काय, असे उगाचच वाटू लागले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या परळी - हैदराबाद मार्गावरील सिमेंट सील पटाच्या २०० लोखंडी चाव्या काढून फेकल्याची घटना घडली होती. हा प्रकार की-मॅन अंशुमन कुमार यांच्यामुळे उघडकीस आला होता. त्यामुळे मोठा अपघात टळला. या चाव्या कोणी काढल्या? कधी काढल्या? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दहशतवाद-विरोधी पथक व रेल्वे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. दुसरी घटना थोडी वेगळी असली तरी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढणारी आहे. सिग्नलमध्ये बिघाड घडवून परभणी-औरंगाबाद मार्गावर नरसापूर-नगरसोल या रातराणीला लुटण्याचा प्रकार घडला. रेल्वे प्रवासात लूटमारीच्या अशा कितीतरी घटना घडत असतात. प्रवासी तक्रार करत नसल्यामुळे लूटमारीच्या घटनांचा आकडा कागदोपत्री कमी दिसतो आणि प्रशासनही आलबेलपणे वागते. घटनेनंतर चौकशीचे वेळीच निराकरण होत नसल्यामुळे प्रवाशांच्या विश्वासार्हतेलाही तडा जात आहे.