शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

तोगडियांचे बंड फसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:33 IST

विश्व हिंदू परिषद या संघाच्या एका शाखेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपल्या जीवाला ‘दिल्लीकरांकडून’ धोका असल्याचा आरोप केला आहे.

विश्व हिंदू परिषद या संघाच्या एका शाखेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपल्या जीवाला ‘दिल्लीकरांकडून’ धोका असल्याचा आरोप केला आहे. याच काळात तोगडिया हे मोदींच्या वै-यांशी हातमिळवणी करीत असल्याचे सांगणारे फलक अहमदाबाद शहरात लागले आहेत. मोदी आणि तोगडिया यांच्यातले भांडण १९९८ पासूनचे, म्हणजे १९ वर्षांएवढे जुने आहे. त्यावेळी तोगडिया यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्याच केशुभाई पटेलांना पाठिंबा दिला होता आणि मोदींचा केशुभार्इंना असलेला विरोधही जुना होता. पुढे मोदीच गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तोगडियांना आपल्या कुंपणाबाहेर ठेवले. ती तेढ कमी करण्याचे संघाचे प्रयत्न फसले आणि आता तिने कमालीचे धारदार स्वरूप घेतले आहे. दि. १६ जानेवारीला तोगडिया एकाएकी बेपत्ता झाले व पुढे तब्बल २४ तासांनी ते अहमदाबादच्याच एका सडकेच्या बाजूला बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावरील उपचाराच्यावेळी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मात्र तोेगडियांना ते मान्य झाले नाही. ‘माझे अपहरण करण्यात आले आणि ते करण्याचे आदेश दिल्लीहून (?) आले होते’ असे ते जाहीरपणे म्हणाले. पुढे जाऊन ‘आपल्या जीवाला धोका असल्याचेही’ त्यांनी सांगून टाकले. तोगडिया यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांचे अपहरण कोण व कसे करील असा प्रश्न त्यातून साºयांसमोर उभा राहिला. संघाच्या पदाधिकाºयांनाही तोगडियांचा आरोप मान्य झाला नाही. संघाच्या वरिष्ठ वर्तुळात तोगडिया यांना विहिंपच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याची चर्चाही याच काळात झाली. मात्र तोगडिया यांनी ‘तसे केल्यास आपण पर्यायी संघटना उभी करू’ अशी धमकी दिल्याने ती कारवाई थांबली. तोगडिया इस्पितळात असताना त्यांना भेटायला भाजप वा संघ यातील कुणी गेले नाही. त्यांची चौकशी करायला जाणाºयात हार्दिक पटेल आणि काँग्रेसचे पूर्व प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधावाडिया यांचा समावेश होता. या सबंध काळात तोगडियांचे मोदी-विरोधी बोलणे सुरू राहिले. परिणामी त्यांच्या विरोधात मोदींची बाजू घेणारे फलकही अहमदाबादेत लागलेले दिसले. विश्व हिंदू परिषद ही संघाची देशव्यापी व मोठी संघटना आहे आणि पंतप्रधानपदावर असणारे मोदीही संघाचेच स्वयंसेवक आहेत. त्या दोघात जुंपलेले हे भांडण संघ परिवारात ‘सारे शांत शांत’ नाही हे सांगणारे आहे. तोगडिया हे वृत्तीने नुसते आक्रमकच नाहीत तर कमालीचे आक्रस्ताळे आहेत. त्यांची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांना त्यातले एकारलेपण चांगले ठाऊक आहे. शिवाय त्यांच्यावर कुणाला जबाबदार राहण्याचे बंधन नाही. पंतप्रधानांना त्याविषयीची सगळीच नियंत्रणे सांभाळावी लागतात. स्वत:चा संतापही त्यांना दुसºया कुणाकडून वदवून घ्यावा लागतो. शिवाय त्यांना त्यांची प्रतिमाही जपावी लागते. तात्पर्य, एक कमालीचा आक्रस्ताळा व बेजबाबदार पुढारी व दुसरा सगळ्या राजकीय व राष्टÑीय जबाबदाºया सांभाळणारा नेता यांच्यातले हे वादंग आहे. मात्र प्रत्यक्ष ‘जीवाला धोका’ असल्याचा त्यातला तोगडिया यांचा कांगावा हे भांडण लवकर संपणारे नाही हे सांगणारा आहे. त्यांना शांत करण्याचा भाजपच्या स्थानिक पुढाºयांचा प्रयत्न आजवर फसला आहे. त्यामुळे त्यावर संघच कधीतरी तोडगा काढील असे म्हटले जात आहे. यातला निष्कर्ष, ‘तोगडिया ही लढाई हरतील’ एवढाच. कारण उघड आहे. आजच्या घटकेला तोगडियाहून मोदी हे संघ परिवाराला महत्त्वाचे व मोठे वाटणारे आहेत. शिवाय ते तसे आहेतही. मोदींनी मिळविलेल्या एकहाती विजयामुळेच संघ परिवाराला दिल्लीची सत्ता मिळविता आली. नंतरच्या काळात तो परिवार देशातील १९ राज्यात सत्तेवर आला. तोगडिया यांना हे जमणारे नव्हते उलट त्यांची वक्तव्ये संघावर आणि भाजपावर उलटणारीच अधिक होती. त्या परिवारात नेत्यांविरुद्ध बोलणे निषिद्ध असल्याने तोगडियांना आजवर कुणी छेडले नाही एवढेच. मोदींमध्ये ते धाडस आहे आणि त्याचा तोगडियांनी धसका घेतला आहे हे नोंदविणे आवश्यक आहे.