शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

आजचा अग्रलेख: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 06:30 IST

नवी एकीकृत निवृत्ती वेतन योजना १ जून २०२५पासून लागू होत असली तरी २००४पासून केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन दिलासा दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना २००५पासून निवृत्ती वेतन बंद केले होते. यापूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. कर्मचारी संघटनांनी त्याला विरोध करीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने केली होती. सुमारे वीस वर्षांच्या या लढ्याला केंद्र सरकारने प्रतिसाद दिल्याने अखेर मार्ग निघाला हे बरे झाले.

निवृत्ती वेतनावरून केंद्र तसेच विविध राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर्मचारी संघटनांच्या राष्ट्रीय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला आहे. विशेष म्हणजे कर्मचारी संघटनांनीदेखील या नव्या पर्यायाचे स्वागत केले आहे. नवी एकीकृत निवृत्ती वेतन योजना १ जून २०२५पासून लागू होत असली तरी २००४पासून केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांच्या मागणीच्या रेट्यामुळे सरकारने राष्ट्रीय निवृत्ती योजना जाहीर केली होती. ती कर्मचारी संघटनांनी मान्य केली नाही. त्यात कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून दहा टक्के रक्कम कपात करून निवृत्ती वेतनासाठी राखीव ठेवण्यात येणार होती. शिवाय सरकारदेखील मूळ वेतनाच्या चौदा टक्के रक्कम दरमहा जमा करणार होते. एकीकृत निवृत्ती वेतनासाठी सरकारने आपला वाटा चौदावरून वाढवून साडेअठरा टक्के केला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के वाटा कपात करण्याची तरतूद कायम ठेवली आहे. परिणामी वेतनाच्या साडेअठ्ठावीस टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात जमा होत राहील. सरकारला यासाठी दरवर्षी ६ हजार २५० कोटी रुपये बोजा उचलावा लागणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतनानुसार शेवटच्या वर्षीच्या मूळ वेतनाच्या सरासरी पन्नास टक्के निवृत्ती वेतन लागू करण्यात आले होते. ती अट आता एकीकृत निवृत्ती वेतन योजनेत रद्द करण्यात आली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही योजना चालू ठेवून त्यांनी ऐच्छिक पध्दतीने दोन्हींपैकी एका योजनेची निवड करण्याचे स्वातंत्र्यही ठेवण्यात आले आहे. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर जवळच्या कौटुंबीक नातलगांसाठी साठ टक्के निवृत्ती वेतन मिळत राहणार आहे. हा बदलही महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

किमान पंचवीस वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणे सुरू होईल. एखादा कर्मचारी इतकी सेवा करून स्वेच्छेने निवृत्त झाला तरी त्यास किमान निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद नव्या योजनेत करण्यात आली आहे. वाजपेयी सरकार असताना आर्थिक सुधारणांचा भाग आणि निवृत्ती वेतनावर होणाऱ्या मोठ्या खर्चास लगाम घालण्यासाठी संपूर्ण निवृत्ती वेतनच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय १ जून २००५ नंतर सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. तत्पूर्वी सेवेत असलेल्यांना जुन्या पध्दतीने निवृत्ती वेतन आजही देण्यात येते. हीच पध्दत विविध राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होती. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारीदेखील जुनी निवृत्ती वेतन पद्धती लागू करावी, अशी वारंवार मागणी करीत आहेत. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती. काँग्रेससह इंडिया आघाडीने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. या साऱ्याचा दबाव केंद्र सरकारवर आला. पूर्वीप्रमाणे वेतन देण्याऐवजी नवा पर्याय काढण्यात आला. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा वाटादेखील निश्चित करण्यात आला. निवृत्ती वेतनासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जात नव्हती. अलीकडे सातवा वेतन आयोग लागू केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चांगली झाली होती. कर्मचाऱ्यांचा निवृत्ती वेतनासाठी कपातीचा निर्णय मान्य करण्यास त्यामुळे हातभार लागला असावा. कर्मचाऱ्यांनी वेतन कपातीस विरोध केला होता. ती दहा टक्के कपात कायम करीत केंद्र सरकारने काढलेला तोडगा चांगला आहे आणि कर्मचारी संघटनांनीदेखील त्याचे स्वागत केल्याचे वृत्त आले. तेव्हा एका मोठ्या निर्णयाने संघर्ष टळला, हे बरे झाले. सरकारवरचा बोजा थोडा वाढला असला तरी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचेही कौतुक करायला हवे. असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बरी आहे. हा विषय सामाजिक म्हणूनही महत्त्वाचा ठरणार आहे. अन्यथा इतर वर्गात असंतोष पसरला असता.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप