शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

दुष्काळाचा तेरावा महिना

By admin | Updated: January 5, 2015 23:41 IST

२०१५ हे वर्ष विदर्भासाठी दुष्काळावर मात करण्याचे आव्हान घेऊन आले आहे. २०१४ मध्ये पावसाने दीर्घ उघाडीनंतर उशिरा हजेरी लावून विदर्भाला केवळ कापूस व सोयाबीनच्या भरवशावर ठेवले.

२०१५ हे वर्ष विदर्भासाठी दुष्काळावर मात करण्याचे आव्हान घेऊन आले आहे. २०१४ मध्ये पावसाने दीर्घ उघाडीनंतर उशिरा हजेरी लावून विदर्भाला केवळ कापूस व सोयाबीनच्या भरवशावर ठेवले. पेरण्या झाल्या, सोंगणीचा हंगाम जवळ येत असतानाच परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून हातातोंडाशी आलेला घासही काढून घेतला. उत्पादनात प्रचंड घट आली, बाजारभाव पडले, शेतीत घातलेली रक्कमही हाती आली नाही अन् पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचे तांडव सुरू झाले. नव्या सरकारने पॅकेजची घोषणा केली. रब्बीला काही आधार मिळेल असे वाटत असतानाच दुष्काळाच्या परिस्थितीत गारपिटीचा तेरावा महिना उगवला व रब्बीचा हंगाम उद्ध्वस्त झाला. अशा दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना उभारी देण्याचे आव्हान आता येऊन ठेपले आहे.फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये दीर्घकालीन उपाययोजनांवर सर्वाधिक भर आहे, ते स्वागतार्हही आहे. मात्र आता तहान लागली असताना विहीर खणून होईपर्यंत वेळ देणे म्हणजे आणखी काही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट बघायची का? असा संतप्त प्रश्न मनात येतो. सोयाबीन, कापूस या महत्त्वाच्या पिकांचा उतारा आला नाही. त्यामुळे हेक्टरी मदतीची अपेक्षा होती त्याला पूर्णविराम देत नव्या सरकारने घोषणांची बरसात केली. कापसाचा भाव असो की धानाचा प्रश्न जुन्या सरकारच्याच धोरणावर हे सरकार चालत असल्याने दिलासा मिळालाच नाही. पॅकेजमध्ये जागोजागी इतके ‘लिकेज’ ठेवले आहेत की, शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचणार कधी, हा संशोधनाचाच प्रश्न आहे.अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या भागात चार दिवसांपूर्वी झालेली गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे नव्या संकटाची भर पडली आहे. पंचनामे सुरू आहेत. एक-दोन दिवसात नुकसानीचा अंदाज हाती येईल. मात्र तोपर्यंत किमान मदत जाहीर करण्याची गरज सरकारमधील कुठल्याच मंत्र्याला वाटत नाही, ही खेदाची बाब आहे. धान उत्पादक शेतकरी संकटातपूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था मोठी बिकट आहे. पाऊस कमी आल्यामुळे धानाचे पीक गेले. ज्यांच्याकडे सिंचनाच्या सोयी होत्या, त्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांची सरकारने अक्षरश: थट्टा केली. भंडारा जिल्ह्यातील फक्त सात गावांची पैसेवारी ५० पैशाखाली पूर्वी दाखविण्यात आली होती. आंदोलने, निदर्शने झाल्यानंतर त्यात नंतर १६४ गावांचा समावेश करण्यात आला. सरकारी अधिकारी कसे निर्दयीपणे काम करतात, त्याचा हा नमुना आहे. लोक पेटून उठल्यानंतरच सरकारचे पैसेवारीचे निकष का बदलतात? ज्या अधिकाऱ्यांनी ही गंभीर चूक केली, त्यांच्यावर सरकारने कारवाई का केली नाही? कार्यालयात बसून पैसेवारी ठरविणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या हातात नांगर-वखर दिल्याशिवाय त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही.काँग्रेसचे सत्यशोधनकाँग्रेसने विरोधकांच्या भूमिकेत जात दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठित केली असून, ती समिती आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. १५ वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने केलेल्या उपाययोजना या शेती व शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरल्या नाहीत, असेच म्हणावे लागेल. काँग्रेसची ही समिती गावागावांत फिरून शेतकऱ्यांची मते जाणून घेणार आहे. सत्तेत असताना कुठे होता नेताजी? आमचा टाहो कधी कानावर आला नाही का? शेतकऱ्यांच्या अशा संतप्त प्रश्नांना सामोरे जाण्याची मनाची तयारी काँग्रेस नेत्यांनी आधीच करायला हवी एवढा आक्रोश बळीराजाच्या मनात आहे. काँग्रेस नेत्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेला राग पाहून भाजपच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी सुखावून जाण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रामाणिकपणे लक्ष दिले नाही तर पुढे तुमचीही अशीच गत होऊ शकते.- गजानन जानभोर