शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

तिसऱ्या पर्यायाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:52 IST

काँग्रेस व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांनी शेतक-यांचा भ्रमनिरास केल्याचा आरोप करीत, आता पुन्हा एकदा तिस-या पर्यायासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा पर्याय कितपत सक्षम ठरेल, हे काळच ठरविणार आहे.

-राजेश शेगोकारकाँग्रेस व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांनी शेतक-यांचा भ्रमनिरास केल्याचा आरोप करीत, आता पुन्हा एकदा तिस-या पर्यायासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा पर्याय कितपत सक्षम ठरेल, हे काळच ठरविणार आहे.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निराश केल्याने, जनतेने २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पारडयात सत्तेच दान टाकले. नवे सरकार नवी धोरणे राबवून सामान्यांना दिलासा देईल अन् शेतकºयांमध्ये उमेद निर्माण करेल, अशी आशा बाळगलेल्या जनतेची निराशाच झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस अन् भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बळीराजाच्या मुलांनी एकत्र येऊन नवा राजकीय पर्याय निर्माण करावा, असा निर्णय नागपुरात लोकजागर अभियानातर्फे आयोजित शेतकरी नेते, विचारवंत, बुद्धिजीवी यांच्या सभेत घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सुमारे शंभरएक नेते, चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले होते. लोकजागरचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर हे या बैठकीचे निमंत्रक होते.शेतकरी नेते अमर हबीब, राम नेवले, प्रा. शरद पाटील, प्रा. श्रीकांत तराळ, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे, ललित बहाळे, गजानन अमदाबादकर आदींचा सहभाग असलेल्या किसान फ्रंटच्या माध्यमातून या नव्या पर्यायासाठी किमान समान कार्यक्रम ठरवावा, अशी सूचना या बैठकीमध्ये समोर आली. सोबतच लोकजागरच्या माध्यमातून नवा पर्याय देण्याचा हेतूने ‘शंभर युवा महाराष्ट्र नवा’ हा संकल्प मांडत येत्या विधानसभा निवडणुकीत शंभर युवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्धार करण्यात आला. दुसरीकडे राज्यातील ४० शेतकरी संघटनांचा समावेश असलेल्या सुकाणू समितीनेही तिसरा पर्याय देण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे प्रमुख रघुनाथ दादा पाटील यांनी सध्या राज्यभर दौरा सुरू केला आहे.शेतकरी जागर यात्रेच्या निमित्ताने ते तिसºया पर्यायाची जुळवणी अन् पायाभरणीही करत आहेत. त्यासाठीच भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात १० मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो आंदोलन छेडण्याचे रणशिंग त्यांनी फुंकले आहे. या तिसºया पर्यायांना बळ देण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने अराजकीय मंचही स्थापन झाला आहे. भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांच्यासह काँगे्रस-राकाँचे नेते त्यामध्ये सहभागी असले तरी, या मंचची खरी ताकद शेतकरीच आहे. हा मंच १ मे रोजी कोल्हापुरात, तर ७ मे रोजी अकोल्यात आंदोलन छेडणार आहे. तिसºया पर्यायाच्या शोधात वेगवेगळ्या पातळीवर हे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न करणारे एकत्र आले अन् निश्चित असा किमान समान कार्यक्रम ठरवून, त्यांनी संघटितरीत्या सत्ताधाºयांना आव्हान दिले तरच सक्षम तिसरा पर्याय निर्माण होऊ शकेल. निवडणूक लढविणे हे आता सोपे काम राहिलेले नाही. सत्ताधाºयांच्या विरोधातील असंतोष संघटित होऊन, तो एकाच पर्यायाच्या मागे उभा राहिला, तर कदाचित बदल दिसेलही; मात्र तिसरा पर्याय देण्यासाठीच तीन-तीन पर्यायांची स्पर्धा सुरू झाली, तर भविष्यात चळवळीवर विश्वास असणाºयांच्या शेतातही निराशेचेच पीक येईल, याची जाण अन् भान या पर्यायांच्या धुरिणांना येणे आवश्यक आहे.