शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

त्यांनी स्वत:च जायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:06 IST

राज्यसभेतील ७१ सदस्यांनी देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्र यांना हटविण्याची मागणी करणारा महाभियोगाचा जो प्रस्ताव सभागृहासमोर आणला

राज्यसभेतील ७१ सदस्यांनी देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्र यांना हटविण्याची मागणी करणारा महाभियोगाचा जो प्रस्ताव सभागृहासमोर आणला तो त्या सभागृहाचे अध्यक्ष व उपराष्टÑपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला असला तरी त्यामुळे दीपक मिश्र यांची जी बेअब्रू व्हायची ती थांबली नाही. त्यांच्यासारख्या उच्च व नैतिक अधिष्ठानाची गरज असलेल्या पीठावर बसणाऱ्या इसमावर संसदेच्या ७१ सभासदांचा आरोप होणे हेच मिश्र यांचे नैतिक अधिष्ठान घालविणारे व कोणताही सामान्य माणूस आणि देशाचा सरन्यायाधीश यांच्या दर्जात कोणताही फरक नसल्याचे सांगणारे आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी दीपक मिश्र हे मनमानी कारभार करणारे गृहस्थ असल्याचे व आपल्या लहरीनुसार हवे ते खटले त्यांना सोयीच्या वाटणाºया न्यायाधीशांकडे सोपविणारे असल्याचे सांगून ते वरिष्ठ न्यायमूर्तींचा अपमान करतात असे म्हटले होते. खरे तर दीपक मिश्र यांनी त्याचवेळी राजीनामा देऊन त्यांचे पद सोडायचे. पण काढल्याशिवाय वा हाकलल्याशिवाय जायचे नाही ही आपल्या राजकारणाची परिपाठी आता न्यायालयानेही स्वीकारली असल्याने तसे काही झाले नाही. परिणामी वाद चालू राहिले आणि न्यायासनाची प्रतिष्ठाही खचत राहिली. मिश्र यांची मुजोरी आणि मोदींचे त्यांना असलेले पाठबळ, त्यांचे पक्षपाती एकारलेपण वाढवितही राहिले. त्यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याच्या चर्चेलाही आता अनेक महिने लोटले आणि एकदाची सह्यांची परिपूर्ती होेऊन तो आणला गेला. यात व्यंकय्या नायडूंनी त्यांना अखेरच्या क्षणी वाचविले. वास्तव हे की न्यायमूर्तींच्या पक्षपातीपणाविषयी साधा संशयही कोणी व्यक्त केला तर त्यांना अस्वस्थ व्हायचे आणि आपल्या पदावर असण्याचा फेरविचारच त्यांनी करायचा. पण तशी नीतिमत्ता फक्त पाश्चात्त्य लोकशाहीत आहे. आपले सारेच व्यवहार सगळे काही खपवून घेण्याएवढे गावंढळ असल्याने ज्यांच्या डोक्यावर संशयाचे डोंगर आहेत तेही पदावर राहतात आणि मुजोरीही करतात. हे इतरांबाबत ठीक. राजकारण्यांना दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जावे लागते. पण न्यायमूर्ती? ते एकदा पदाला चिकटले की निवृत्तीपर्यंत त्याला चिकटूनच राहतात. त्यांना काढायचे तर त्यांच्याविरुद्ध महाभियोग आणावा लागतो. तो संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकूण सभासदांच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाºयांच्या दोन तृतीयांश बहुमताने (यातील जो आकडा मोठा असेल त्याप्रमाणे) मंजूर व्हावा लागतो. त्यानंतर राष्टÑपती त्यांना काढून टाकण्याचा आदेश काढतात. एवढे मोठे संरक्षण पंतप्रधानांच्या पदालाही नाही. त्यामुळे यांचे मनमानीपण आणि मुजोरी असे सारेच चालते आणि खपते. त्याचमुळे आपल्या न्यायमूर्तीपदावर येऊ नयेत अशी माणसे आली. देशाच्या सरन्यायाधीश पदावर आलेले निम्मे न्यायमूर्ती भ्रष्ट होते असे प्रतिज्ञापत्र अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयातच दाखल केले आहे. वर्षे लोटली पण त्याच्या चौकशीला ते न्यायालय तयार होत नाही. निवृत्तीच्या दुसºया दिवशी १०० कोटींची कोठी नव्या दिल्लीत खरेदी करणारे न्यायमूर्ती देशाला ठाऊक आहेत आणि मुंबईतील दारूच्या गुत्त्यांवर मुलींना अश्लील नाच करण्याची परवानगी देणारे न्यायमूर्ती कितीशे कोटींनी गब्बर झाले याची चर्चाही देशात आहे. खासगी शिक्षण संस्थांना हवी तेवढी फी आकारण्याचा व नव्या पिढ्यांची लूट करण्याचा परवाना देणारे न्यायमूर्ती प्रामाणिक कसे असतील? आणि सामूहिक हत्याकांडातले आरोपी एका विशिष्ट धर्माचे असतील तर त्यांना निर्दोष सोडणारे व दुसºया कोणत्या धर्माचे असतील तर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देणारे न्यायमूर्ती पक्षपातीच असतील की नाही? अशावेळी त्यांना घटनेशी एकनिष्ठ राहण्याची, नि:पक्षपातीपणे न्याय देण्याची व नागरिकांना समान कायदा लागू करण्याची त्यांनी घेतलेली शपथ कुठे हरवते? की ती शपथही त्यांनी गीतेवर हात ठेवून खोटे बोलणाºया आरोपींसारखीच कुठल्याही गंभीरपणावाचून घेतली असते? दीपक मिश्र आज इंग्लंड वा अमेरिकेला असते तर रस्त्यावर उभे असलेले दिसले असते. पण हा भारत आहे आणि भारतात सारेच चालत असते!