शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

...म्हणूनच सत्काराचे त्यांना अप्रूप नाही

By गजानन जानभोर | Updated: November 7, 2017 03:54 IST

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले.

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले. केशवदास पुन्हा घरी परतले नाहीत. घरचे म्हणाले, ‘परत चल’. केशवदासांनी सांगितले, ‘‘घरी येऊन तरी काय करु? मला इथेच राहायचे आहे, गुरुदेवांच्या सेवेत’’ राष्टÑसंतांचे अनेक सहकारी, अनुयायी नंतर आसक्तीच्या वाटेने गेले. काहींनी गुरुदेवांच्या नामस्मरणातून शिक्षणसंस्था उभारल्या तर काही राजकारणी झालेत अन् भगव्या टोप्या घालून सभा, संमेलनात मिरवू लागले. गुरुदेवभक्तांची निष्ठा आणि राष्टÑसंतांवरील लोकश्रद्धेचे भांडवल करीत ही मंडळी पुढे गडगंजही झाली. केशवदास मात्र गुरुदेवांजवळच अविचल, अनासक्त राहिले. आश्रमातील सकाळच्या ध्यानात, संध्याकाळच्या प्रार्थनेत केशवदास नित्यनेमाने येतात. किरकोळ बांधा, बेताची उंची आणि एक पाय अधू... आपले अस्तित्व जाणवू न देता एका कोपºयात त्यांचे ध्यान लागलेले... गुरुदेव सेवा मंडळांच्या कार्यक्रमांतही ते मंचावर थांबत नाहीत, मंडपाबाहेर मुलांना पुस्तकं वाटताना दिसतात.केशवदास राष्ट्रसंतांचे सहकारी. महाराजांच्या भाषणाची ते टिपणे काढायचे. त्यातून ३० पुस्तकं प्रसिद्ध झालीत. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव हे त्यांचे गाव. वडील लहानपणीच वारले, आई मजुरीला जायची. लहानग्या केशवदासला दारिद्र्यासोबतच अस्पृश्यतेचे चटकेही बसायचे. आपल्या सारख्याच हाडामासाच्या माणसांना ग्लासात पाणी आणि आपल्याला ओंजळीत का? कुणाच्या घरचे लग्न असेल तर आपण शेवटच्या पंक्तीतच का बसावे? केशवदासला हे प्रश्न अस्वस्थ करायचे. भजनांचा छंद होताच. चवथीत असताना अभंगही लिहिले. ते दाखवण्यासाठी केशवदास मित्राजवळ गेला. मित्र म्हणाला, ‘अभंग महापुरुषांनी लिहायचे. आपण लिहिणे पाप आहे’. दुसºया दिवशी त्याने तुळशीसमोर सर्व अभंग जाळून टाकले. ‘हा विटाळ कशासाठी’? केशवदासचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच गावालगत तुकडोजी महाराजांचा एक कार्यक्रम होता. केशवदासने महाराजांना गाठले, ‘मला गुरुमंत्र द्या’ महाराज म्हणाले, ‘सर्वांचे कल्याण कर, हाच गुरुमंत्र तुझ्यासाठी’. ग्रामस्वच्छतेचा मंत्र अंगिकारून केशवदास गावपरिसरात काम करू लागला. केशवदासची सातवीनंतर शाळा सुटली आणि मग पुढचे आयुष्य राष्टÑसंतांच्या कार्याकडे कायमचे प्रवाहित झाले.राष्ट्रसंतांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर हा देश समजून घ्यावा, असे एक दिवस वाटले आणि केशवदास तडक भारत भ्रमणाला निघाले. १९५८ ते ६० असे दोन वर्ष, पदयात्रेचे अंतर ४,६०० किमी. एक अपंग मुलगा एकटाच फिरतो, साºयांनाच आश्चर्य वाटायचे. पदयात्रेच्या काळात एक मूल्य ते आवर्जून जपायचे, भूक लागली की संबंधितांच्या घरी श्रमदान करून त्यानंतरच माधुकरी मागायची. तरुणांसाठी संस्कार शिबिरे, ग्रामस्वराज्याचे प्रयोग राबवून केशवदासांनी शेकडो गावांना आदर्श केले. ‘ग्रामगीता जीवन विकास परीक्षा’ त्यांनीच सुरू केली. राष्ट्रसंतांनी त्यांना ‘प्राचार्य’ ही उपाधी दिली, ती यासाठीच. संतत्वाच्या असंख्य कसोट्यांवर उत्तीर्ण होऊनही या निष्काम कर्मयोग्याने आपल्यातील सामान्यपण कधी ढळू दिले नाही. हा माणूस कोणत्या मातीतून जन्मास आला, ठाऊक नाही, पण त्याच्या लोकसेवेचा प्रपंच अनासक्त आहे आणि जगणे विशुद्ध आहे. म्हणूनच आश्रमात झालेल्या परवाच्या सत्काराचे त्यांना अप्रूपही वाटत नाही.(gajanan.janbhor@lokmat.com)