शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

म्हणे, नमाज आणि सूर्यनमस्कार एकच

By admin | Updated: April 1, 2017 00:38 IST

कोणत्याही धर्माची व त्याच्या उपासनेची थट्टा वा त्याविषयीचे ‘अजाण’ म्हणविणारे वा दिसणारे वक्तव्य त्या धर्माच्या श्रद्धांना धक्का

कोणत्याही धर्माची व त्याच्या उपासनेची थट्टा वा त्याविषयीचे ‘अजाण’ म्हणविणारे वा दिसणारे वक्तव्य त्या धर्माच्या श्रद्धांना धक्का देणारे व त्याच्या अनुयायांचा संताप ओढवून घेणारे असते. स्वधर्माविषयीचे प्रेम बाळगणाऱ्यांची तर परधर्माच्या अशा श्रद्धांविषयीची याबाबतची जबाबदारी मोठी व अधिक गंभीर असते. त्यातून अशी बालिश वक्तव्ये करणारी माणसे सत्तापदावर असतील तर त्यांचे तसे वागणे एखाद्या दंगलीला प्रोत्साहन देणारेही ठरत असते. त्याचमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘सूर्यनमस्कार आणि नमाज या दोन्ही गोष्टी सारख्याच असून, त्यातून होणारी व्यायामाची कवायतही सारखीच असते’, असे जे अडाणी व पोरकट विधान केले ते त्यांच्या राज्यातील सगळ्या अल्पसंख्यकांना खोलवर दुखवून गेले आहे. सूर्यनमस्कार ही हिंदू धर्मातील उपासना आहे आणि ती सूर्यदेवाच्या नावाने केली जाते. त्या उपासनेत व्यायामासाठी लागणाऱ्या देहाच्या हालचाली आहेत. पण त्या शरीर कमावण्याएवढ्याच ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या आहेत. याउलट नमाज ही मुसलमान धर्माच्या ‘अल्लाह’ या एकमेव परमेश्वराची उपासना आहे. व्यायाम तीतही आहे. पण तिचे अंतिम पर्यवसान अल्लाहविषयीची आपली श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहचविण्यात होणारे आहे. सूर्य हा अल्ला नाही. किंबहुना हिंदूंच्या सर्व देवदेवतांहून अल्लाहचे स्वरूप वेगळे आहे. शिवाय इस्लामच्या भूमिकेनुसार तो जगाचा एकमेव परमेश्वर आहे. त्यांची उपासनापद्धतीही आपल्या उपासनेहून वेगळी आहे. एखादा गांधी जेव्हा ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ असे म्हणतो तेव्हा तो या सगळ्या धर्म भावनांच्या पल्याड गेलेला असतो आणि त्याची जगभरच्या सर्व धर्मांच्या ईश्वरी रूपांबाबतची धारणा सारखी व श्रद्धेची असते. योगी आदित्यनाथ यासंदर्भात गांधीजींच्या आसपासही फिरकू शकणारे पुढारी नाहीत. त्यांनी नमाजाला सूर्यनमस्कारासोबत बसविणे याचा अर्थ उघड आहे. त्यांच्या मानसिकतेत सूर्यनमस्कार ही हिंदूंची धर्मोपासना मुसलमानांवर लादायची आहे. त्यासाठीच त्यांना अशा वक्तव्यांमधून एका संघर्ष स्पर्धेचा आरंभ करायचा आहे. खरे तर आपल्या धर्माविषयी एकारलेली श्रद्धा बाळगणाऱ्यांनी इतर धर्मांविषयी बोलणेच टाळायचे असते. कारण त्यातून द्वेष आणि तिरस्काराखेरीज काहीच प्रगट होत नाही. हिंदूंएवढीच ही बाब मुसलमान व अन्य धर्मांच्या प्रवचनकारांनीही नीट ध्यानात घेतली पाहिजे. सध्या आदित्यनाथांची व त्यांच्या पक्षाची देशात चलती असल्यामुळे त्यांचे म्हणणे खपून गेले. तरीही आझमखान या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व माजी मंत्र्याने त्यावर आपली प्रतिक्रिया देताना ‘हे आदित्यनाथांनी म्हटले म्हणूनच खपले, हेच मी म्हटले असते तर सरकारने मला बेड्या घातल्या असत्या’ असे उद््गार काढले आहेत. कोणताही मुसलमान नमाज व सूर्यनमस्कार एक आहेत असे म्हणणार नाही. त्यांच्या धर्मोपासनेतील प्रत्येकच बाब हिंदूंहून वेगळी आहे. या दोन धर्माच्या लोकांमध्ये विश्वास व एकात्मता निर्माण करायची तर त्यांच्या उपासनापद्धतीवर हल्ले चढवून वा सूर्यनमस्काराची तुलना नमाजाशी करून चालणार नाही. त्यासाठी त्यांची मने एकत्र आणावी लागतील आणि त्याला लागणारे सामर्थ्य, प्रगल्भपण, उंची, धाडस, सहनशक्ती आणि तयारी आदित्यनाथांपाशी नाही. जे मुसलमान वा ख्रिश्चन धर्माची उपासनास्थळे जमीनदोस्त करण्यात पुढाकार घेतात वा तशा कृत्यांचे समर्थन करतात त्यांना याविषयी बोलण्याचा अधिकारही नसतो. आदित्यनाथांनाही तो नाही. मुसलमान वा अन्य धर्मीयांना आपल्या बहुसंख्येच्या बळावर धाकात ठेवून त्यांच्यावर आपले मत त्यांना लादायचे आहे. त्यांच्या सरकारची एवढ्या दिवसातली वाटचाल आणि त्यांच्या पक्षाचे निवडणूक काळापासूनचे एकधर्मीय धोरण याची साक्ष देणारे आहे. राष्ट्रीय एकात्मता वा हिंदू मुस्लीम ऐक्य आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या संकल्पनांपासून अशा माणसांनी व त्यांच्या संघटनांनी आपले दूरवरचे अंतर आजवर राखले आहे. ते त्यांचे काम नाही आणि तशी जबाबदारी त्यांना पेलणारीही नाही. आदित्यनाथांचे हे वक्तव्य त्याचमुळे अल्पसंख्यकांनी एखाद्या अपमानकारक टवाळीसारखे घेतले आहे व तसे ते त्यांनी घेणे रास्तही आहे. आपली विश्वसनीयता खरी केल्याखेरीज व ती इतरांच्या मनावर ठसविल्याखेरीज अशा महत्त्वाच्या विषयावर पुढाऱ्यांनी बोलायचे नसते. परंतु आदित्यनाथांसमोर मोदींचा आदर्श आहे. मुसलमानांवर बहिष्कार, त्यांच्याविषयीचा दुरावा, त्यांना दिलेला त्रास व प्रसंगी त्यांची केलेली कत्तल हा बहुसंख्यकतावादाला सत्तेपर्यंत पोहचविणारा प्रकार आहे हे त्यांना कळून चुकले आहे. आपली बहुसंख्य जनताही विचार वा कार्यक्रम याहून धर्मश्रद्धा व जातीय संघटन यांच्यासोबत जास्तीची जुळली असल्याने स्वधर्माविषयीचे प्रेम सांगण्याहून परधर्मीयांची अशी टवाळी करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांच्या लाभाचाही होतो. आदित्यनाथांच्या आताच्या नमाजाविषयीच्या भाष्याचे खरे कारण त्यांच्या या लाभकारी राजकारणात दडले आहे हे उघड आहे आणि ते अल्पसंख्यकांएवढेच बहुसंख्येतील जाणकारांनीही गंभीर होऊन समजून घ्यावे असे आहे.