शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या पात्रता यादीत विदर्भातील एकही विद्यापीठ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:19 IST

नागपूर मध्य भारताचे एज्युकेशनल हब होऊ पाहात आहे. आयआयएम, ट्रीपल-आयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, सिम्बॉयसिस, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था नागपुरात येऊ घातल्या आहेत.

नागपूर मध्य भारताचे एज्युकेशनल हब होऊ पाहात आहे. आयआयएम, ट्रीपल-आयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, सिम्बॉयसिस, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था नागपुरात येऊ घातल्या आहेत. यातील काही सुरुही झाल्या आहेत. मात्र देशात विकसित केल्या जाणा-या २० जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या पात्रता यादीत विदर्भातील एकाही विद्यापीठाचा नंबर लागला नाही. ‘वर्ल्ड क्लास’ विद्यापीठासाठी लागणा-या निकषात येथील आठ शासकीय आणि एक अभिमत यापैकी एकही विद्यापीठात बसत नसल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव मागितला नाही. त्यामुळे वर्ल्ड होण्यासाठी नेमके काय करावे लागते भाऊ, असा वैदर्भीय सवाल येथील विद्यापीठांच्या कट्ट्यावर गमतीने विचारला जात आहे. मुळात जिथे ‘क्लास’ (नियमित वर्ग) होत नाही. प्राध्यापक विद्यादान करण्याऐवजी राजकारणात जास्त सक्रिय असतात. जिथे पीएचडी केवळ फॅशन आणि नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी उपयोगात आणली जाते. केवळ वेतनवाढीसाठी तिचा उपयोग केला जातो अशा विद्यापीठांपासून आणि तिथे काम करणा-या प्राध्यापकांपासून ‘वर्ल्ड क्लास’च्या अपेक्षा करणे चुकीचेच होईल. ‘वर्ल्ड क्लास’ होण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन, अद्यावत शिक्षण पद्धती, हाऊसफुल्ल कॅम्पस आणि ज्ञानगंगेचा अविरत प्रवाह सुरू असावा लागतो. मात्र आमच्या विद्यापीठात आज हे होते का ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गत दोन वर्षांपासून विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरू आणि प्राध्यापकांना हाच प्रश्न करीत आहेत. मात्र सारेच निरुत्तर आहेत. गत तीन वर्षांपासून नागपूर विद्यापीठातील कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. पदभरती रखडली आहे. कोहचाडे गेला तरी त्याचे अनुयायी अजूनही कायम आहेत. ते गुणवाढीचा वारसा चालवित आहेत. अशात वर्ल्ड क्लासच्या पात्रतेची अपेक्षा कशी करायची? हीच स्थिती देशमुखी थाटात वावरणाºया अमरावती विद्यापीठाची आहे. आदिवासींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गडचिरोली विद्यापीठाला पदभरती घोटाळ्याचा डाग लागला आहे. जॅकने लागलेल्या प्राध्यापक आणि अघिकाºयांपासून गुणवत्तेची अपेक्षा करणे चुकीचे होईल. जे कृषी विद्यापीठ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अजूनही दहा कलमी कार्यक्रम देऊ शकले नाही, त्यांच्यापासून वर्ल्ड क्लासचा आग्रह कसा धरायचा? माफसू विदर्भात जागतिक धवलक्रांती करेल, असा ढोल वाजला. धवलक्रांती तर दूरच सातत्याने घटणाºया पशूंच्या संख्येवर ते तोडगा काढू शकले नाही.

टॅग्स :universityविद्यापीठ