शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या पात्रता यादीत विदर्भातील एकही विद्यापीठ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:19 IST

नागपूर मध्य भारताचे एज्युकेशनल हब होऊ पाहात आहे. आयआयएम, ट्रीपल-आयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, सिम्बॉयसिस, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था नागपुरात येऊ घातल्या आहेत.

नागपूर मध्य भारताचे एज्युकेशनल हब होऊ पाहात आहे. आयआयएम, ट्रीपल-आयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, सिम्बॉयसिस, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था नागपुरात येऊ घातल्या आहेत. यातील काही सुरुही झाल्या आहेत. मात्र देशात विकसित केल्या जाणा-या २० जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या पात्रता यादीत विदर्भातील एकाही विद्यापीठाचा नंबर लागला नाही. ‘वर्ल्ड क्लास’ विद्यापीठासाठी लागणा-या निकषात येथील आठ शासकीय आणि एक अभिमत यापैकी एकही विद्यापीठात बसत नसल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव मागितला नाही. त्यामुळे वर्ल्ड होण्यासाठी नेमके काय करावे लागते भाऊ, असा वैदर्भीय सवाल येथील विद्यापीठांच्या कट्ट्यावर गमतीने विचारला जात आहे. मुळात जिथे ‘क्लास’ (नियमित वर्ग) होत नाही. प्राध्यापक विद्यादान करण्याऐवजी राजकारणात जास्त सक्रिय असतात. जिथे पीएचडी केवळ फॅशन आणि नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी उपयोगात आणली जाते. केवळ वेतनवाढीसाठी तिचा उपयोग केला जातो अशा विद्यापीठांपासून आणि तिथे काम करणा-या प्राध्यापकांपासून ‘वर्ल्ड क्लास’च्या अपेक्षा करणे चुकीचेच होईल. ‘वर्ल्ड क्लास’ होण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन, अद्यावत शिक्षण पद्धती, हाऊसफुल्ल कॅम्पस आणि ज्ञानगंगेचा अविरत प्रवाह सुरू असावा लागतो. मात्र आमच्या विद्यापीठात आज हे होते का ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गत दोन वर्षांपासून विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरू आणि प्राध्यापकांना हाच प्रश्न करीत आहेत. मात्र सारेच निरुत्तर आहेत. गत तीन वर्षांपासून नागपूर विद्यापीठातील कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. पदभरती रखडली आहे. कोहचाडे गेला तरी त्याचे अनुयायी अजूनही कायम आहेत. ते गुणवाढीचा वारसा चालवित आहेत. अशात वर्ल्ड क्लासच्या पात्रतेची अपेक्षा कशी करायची? हीच स्थिती देशमुखी थाटात वावरणाºया अमरावती विद्यापीठाची आहे. आदिवासींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गडचिरोली विद्यापीठाला पदभरती घोटाळ्याचा डाग लागला आहे. जॅकने लागलेल्या प्राध्यापक आणि अघिकाºयांपासून गुणवत्तेची अपेक्षा करणे चुकीचे होईल. जे कृषी विद्यापीठ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अजूनही दहा कलमी कार्यक्रम देऊ शकले नाही, त्यांच्यापासून वर्ल्ड क्लासचा आग्रह कसा धरायचा? माफसू विदर्भात जागतिक धवलक्रांती करेल, असा ढोल वाजला. धवलक्रांती तर दूरच सातत्याने घटणाºया पशूंच्या संख्येवर ते तोडगा काढू शकले नाही.

टॅग्स :universityविद्यापीठ