शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

न्यायातही समता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:15 IST

या देशात स्त्री हीच स्त्रीची खरी विरोधक आहे. राजस्थानात बालविवाह बंदी घालणारे कायदे कधी अंमलात येत नाहीत. अल्पवयीन मुलांना शारीरिक मेहनतीची कामे न देणारे कायदे अंमलात येत नाहीत.

मुंबईच्या हाजीअली दर्ग्याच्या मजारीपर्यंत स्त्रियांना प्रवेश देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला, तेव्हा स्त्रियांना मिळालेला समतेचा आणखी एक अधिकार म्हणून सरकार व समाजानेही त्याचे स्वागत केले. (तो अधिकार मिळणे स्त्रियांचा दर्जा व घटनेचा हक्क म्हणून आवश्यकही होते) पुढे तीन वेळा ‘तलाक’ म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याचा मुस्लीम पुरुषांचा धर्मदत्त अधिकार संसदेने रद्द केला व तसा तलाक देणारा अपराधी असेल, असे जाहीर केले. त्याही गोष्टीचे स्वागत सरकार व त्यांचा पक्ष यांनी भरभरून केले.

देशात एकच व समान नागरी कायदा असावा, ही भूमिका घटनेच्या निर्देशकतत्त्वात (प्रकरण चौथे) नमूद केले आहे. मात्र, तिचा अंमल अजून झाला नाही, पण तो लवकर व्हावा, हा हिंदुत्ववाद्यांएवढाच देशातील पुरोगामी चळवळींचाही आग्रह आहे. ज्या-ज्या गोष्टी मुसलमान समाजात वा अल्पसंख्याक वर्गात सुधारणा घडवून आणणाऱ्या आहेत, त्या अलीकडच्या काळात हिरिरीने केल्या गेल्या. मात्र, त्या वेळी दिसलेला सरकार, भाजपा व त्यांचा परिवार यांचा उत्साह हिंदू वा बहुसंख्य समाजात तशाच दुरुस्त्या करण्याबाबत त्यांनी दाखविला नाही. उलट तो करणाºयांना अडथळे आणून अडविण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. शनिशिंगणापूरच्या देवस्थानात स्त्रियांना पूजेचा हक्क मिळावा, म्हणून पुरोगामी स्त्रियांना चळवळ उभी करावी लागली. ओडिशातील भगवान जगन्नाथ मंदिरात अजूनही सर्वधर्मीयांना प्रवेश नाही. त्या मंदिराच्या व्यवस्थापकांनी प्रत्यक्ष इंदिरा गांधींनाच त्यासाठी विरोध केला होता. त्या वेळी त्या मात्र शांत राहिल्या व रस्त्यावरूनच ईश्वराचे दर्शन घेऊन तेथून दूर गेल्या. अल्पसंख्य समाजातील सामाजिक सुधारणांविषयीचा जेवढा आग्रह येथे धरला जातो, तेवढा तो बहुसंख्य समाजातील दुरुस्त्यांबाबत मात्र धरला जात नाही, तेव्हा हे आग्रह सुधारणांसाठी असतात की अल्पसंख्य वर्गांना डिवचण्यासाठी असतात, असा प्रश्न पडतो. केरळातील शबरीमाला मंदिराबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात आणण्यात केंद्र सरकार जो निरुत्साह दाखविते आहे, तो पाहता आपले सुधारणाविषयक धोरणही धार्मिकदृष्ट्या पक्षपाती व अल्पसंख्याकांवरील रोषातून निश्चित केले जाते काय, असा हा प्रश्न आहे. शबरीमाला मंदिरात सर्व वयाच्या स्त्रियांना प्रवेश मिळाला पाहिजे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने समतेच्या अधिकारानुसार दिला आहे. तर ज्या वयात स्त्रिया रजस्वला होऊ शकतात, त्या वयातील स्त्रियांना त्यात प्रवेश देणार नाही, अशी तेथील कडव्या हिंदुत्ववाद्यांची भूमिका आहे. ही भूमिका स्त्रीविरोधी आहे, हिंदू स्त्रियांचा अपमान करणारी आहे आणि समतेच्या अधिकाराविरुद्ध जाणारी आहे, हे ठाऊक असूनही त्यांनी ती रेटली आहे. त्यासाठी शेकडो लोकांनी एक प्रतिगामी आंदोलन करून तुरुंगवास पत्कारला आहे. केरळचे डावे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाजूने आहे व तो अधिकार स्त्रियांना असला पाहिजे, असेच त्यांना वाटत आहे, पण त्याच्या मागे तेथील संघ परिवार नाही, केंद्र सरकार नाही आणि त्या सरकारातील ‘सिनेमेवाल्या’ स्त्रियाही नाहीत.

या देशात स्त्री हीच स्त्रीची खरी विरोधक आहे, असे कधी-कधी म्हटले जाते ते याचसाठी. राजस्थानात बालविवाह बंदी घालणारे कायदे कधी अंमलात येत नाहीत. अल्पवयीन मुलांना शारीरिक मेहनतीची कामे न देणारे कायदे अंमलात येत नाहीत. त्यातही जे कायदे आपल्या समाजाच्या सोयीचे व आपले जुनाटपण टिकविणारे असतात, ते कायम राहावे, असाच आपल्या लोकांचा आग्रह असतो. झालेच तर तसे कायदे होऊनही ते अंमलात येणार नाहीत, अशीच त्यांची भूमिका असते. मात्र, तेच अल्पसंख्य वर्गांबाबत झाले वा केले गेले की, त्यांचे स्वागत होते आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रहही मोठा असतो. आपला समाज व देश मनाने अजून एकात्म झाला नाही वा तो तसा व्हावा, असे येथील अनेकांना वाटत नाही, याचाच हा पुरावा आहे. कायदे व्हावे, ते ‘त्यांच्या’साठी सुधारणा करायच्या, तर त्या ‘त्यांच्यात’ आम्ही मात्र आहोत तसेच राहू. आम्ही आमच्या माणसांना सुधारणा वा समता सांगणार नाही. न्यायाचाही समान आग्रह धरणार नाही, अशी भूमिका समाज व देश यांच्यातील दुही कायम ठेवणारी असते व आहे. दुर्दैव याचे की, काही लोकांना ही दुहीच त्यांच्या राजकीय फायद्यासाठी टिकविणे आवश्यक वाटते. हे कधी बदलणार व त्याला किती काळ द्यावा लागणार?

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक