शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तर दुष्ट राज्य सुरू होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:20 IST

सर्वसामान्य माणूस त्याचे आयुष्य स्वत:च हक्काचे घर आणि मुलांची लग्न, कुटुंब या स्वप्नांभोवती गुंफत असतो. काबाडकष्ट करून मिळणाऱ्या पगारावर घर उभे करता येत नाही हे लक्षात आले तर प्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेवूनही पैसे उभे करणारी या राज्यात लाखो कुटुंब आहेत.

सर्वसामान्य माणूस त्याचे आयुष्य स्वत:च हक्काचे घर आणि मुलांची लग्न, कुटुंब या स्वप्नांभोवती गुंफत असतो. काबाडकष्ट करून मिळणाऱ्या पगारावर घर उभे करता येत नाही हे लक्षात आले तर प्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेवूनही पैसे उभे करणारी या राज्यात लाखो कुटुंब आहेत. मात्र अशांची बिल्डरांकडून फसवणूक होऊ लागल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. खिडकीतून बाहेर पहाल तर समुद्र दिसेल, झाडी दिसेल अशा जाहिराती राजरोस येऊ लागल्या, प्रत्यक्षात खिडकीतून नाले दिसू लागले. लोकांना दाखवायचे एक आणि द्यायचे एक, ही वृत्ती वाढली. कारपेट एरियानुसारच घरांचे दर ठरले पाहिजेत हा कायदा असूनही प्रत्यक्षात सुपर बिल्टअपनुसार दर आकारले जाऊ लागले. आजही यात बदल झालेला नाही. बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आवक होते हे लक्षात आल्याने माफियागिरी वाढली. बिल्डर होण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नसते. आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, संशोधक अशा अनेक व्यवसायासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. पण बिल्डर होण्यासाठी पैसा आणि मोक्याच्या ठिकाणी जागा असली की कुणालाही बिल्डर होता येते, हा समज दृढ झाला आणि त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले. हे रोखण्याची मागणी होऊ लागली आणि त्यातून ‘महारेरा’ या कायद्याचा जन्म काँग्रेस, राष्टÑवादीच्या काळात झाला. हा कायदा करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य होते. मात्र त्याच्या अंमलबजावणीत विलंब झाला. राज्यात सत्तातंर झाले आणि पुढे केंद्र सरकारने राज्याच्या कायद्यातील अनेक कठोर तरतुदी मवाळ करीत नवा कायदा आणला. तो राज्यातील भाजपा सरकारने स्वीकारला. घराचे स्वप्न पहाणाºया मध्यमवर्गीय जनतेला आणि नियमानुसार काम करणाºया बिल्डरांना दिलासा देत हा कायदा अस्तित्वात आला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा राज्यातील सगळ्या गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक केले गेले. त्यासाठी मुदतही दिली गेली. ठराविक मुदतीत नोंदणी झाली नाही म्हणून मुदतवाढ दिली गेली. त्यानंतर ज्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पांची नोंदणी केली नसेल असे लोक कोण आहेत हे शोधून त्यांंच्यावर याच कायद्यानुसार कारवाया करण्याची जबाबदारी ‘महारेरा’ची होती. मात्र ज्यांनी आपल्याकडे नोंदणी केली त्यांच्याच तक्रारी ऐकून घेण्याची भूमिका ‘महारेरा’ने घेतली आणि ज्यांनी नोंदणी केली नाही असे सगळेच बिल्डर ‘महारेरा’च्या कायद्यातून जणू अभय मिळाल्यासारखे वागू लागले. ज्या अपेक्षेने हा कायदा आणला गेला त्या अपेक्षांवर तो उतरतो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी या कायद्याची अंमलबजावणी करणाºया अधिकाºयांवर असताना त्यांनीच तक्रार घेऊन आलेल्या लोणावळ्याच्या व्यक्तीला ‘नोंदणी नसलेले बांधकाम प्रकल्प आपल्या अखत्यारीत येत नाहीत’ असे सांगून त्याची बोळवण केली. ‘महारेरा’ने असे ‘सिलेक्टिव्ह’ काम करणे अपेक्षित नाही. हा सरळ सरळ हात झटकण्याचा प्रकार आहे. ज्याने तक्रार केली ते व्यवसायाने वकील होते म्हणून ते मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकले. मात्र न्यायालयाने कान उपटल्यानंतर नोंदणी नसलेले प्रकल्पही आमच्या कक्षेत येतील असे ‘महारेरा’ने न्यायालयाला सांगितले. पण न्यायालयाने सांगेपर्यंत ‘महारेरा’ गप्प का बसले? कायद्याची अंमलबजावणी करणारेच जर असे वागू लागले तर पुन्हा घराचे स्वप्न पाहणाºया सर्वसामान्यांनी जायचे कुणाकडे, असा प्रश्न तयार होईल. हा नवीन कायदा सामान्य मध्यमवर्गीयांचे आशास्थान आहे अशावेळी त्याची अंमलबजावणी करणाºयांनी जास्त संवेदनशीलतेने याकडे पाहणे आवश्यक आहे अन्यथा हा कायदा आणि त्याचे पालन होते की नाही पाहणारे यांचेच नवे दुष्ट राज्य सुरू होईल.

टॅग्स :Homeघर