शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मग अजंदुजं का?

By admin | Updated: May 26, 2016 04:16 IST

महाराष्ट्रातील सध्याची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता दारुच्या कारखान्यांना पाण्याचा एक थेंबदेखील देऊ नये अशी मागणी करणारी एक जनहित याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या

महाराष्ट्रातील सध्याची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता दारुच्या कारखान्यांना पाण्याचा एक थेंबदेखील देऊ नये अशी मागणी करणारी एक जनहित याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यालाच चार खडे बोल सुनावले आहेत. आधी अशीच याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे सादर झाली असता त्या न्यायालयाने साठ टक्क््यांच्या पाणी कपातीचा आदेश दिला होता. परंतु याचिकाकर्त्याचा आग्रह शंभर टक्क््यांचा असल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याला फटकारताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या साठ टक्के कपातीलाही काही आधार नाही असे सांगून अशा प्रश्नांमध्ये तारतम्य बाळगणे गरजेचे असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. ‘तुम्ही प्रसिद्धीसाठी याचिका सादर केली का’ असा रोकडा सवाल करुन याचिका मागे घ्या असेही खंडपीठाने खडसावले. मुळात उच्च वा सर्वोच्च न्यायालयात कोणतीही याचिका थेट सुनावणीसाठी घेतली जात नाही. मध्ये एक चाळणी असते. अशा जनहित याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केल्या जातात असे न्यायालयांना वाटत असेल तर मधल्या चाळणीतच त्या अडकल्या जायला हव्या. तसे होईल तर प्रलंबित कज्ज्यांच्या संख्येत थोडीफार घट तर होईल. अर्थात मुद्दा तो नाही. औरंगाबाद खंडपीठाने साठ टक्के कपातीचा जो आदेश दिला त्यावर प्रहार करताना कोणताही आधार नसलेले असे आदेश देणे म्हणजे सरकारच्या धोरण निश्चितीवर अतिक्रमण करण्यासारखे आहे आणि आम्ही ते करणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले. या खंडपीठाची जी भूमिका तीच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची असेल तर मग या भूमिकेचे व्यापक स्वागत होऊ शकेल. पण वास्तव काही वेगळेच सांगत असते. सरकारशी संबंधित अनेक धोरणात्मक बाबींमध्ये न्यायालये सक्रीय होऊन हस्तक्षेप करीत असतात. त्याचे सर्वात मोठे आणि अगदी अलीकडचे जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा (नीट) संपूर्ण देशात अनिवार्य करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय. तो बदलावा किमानपक्षी त्यात वर्षभरापुरती का होईना सवलत द्यावी म्हणून अनेक राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे रदबदली करुन पाहिली पण न्यायालय आपल्या भूमिकेवर ठाम. शिक्षण हा राज्यघटनेच्या सामाईक यादीतील विषय आणि या विषयाशी संबंधित निर्णय म्हणजे सरकारने घ्यावयाचे धोरणात्मक निर्णय. असे असताना न्यायालयाने आपले आडमुठेपण सोडले नाही व अखेरीस सरकारला अध्यादेश जारी करुन मार्ग काढावा लागला. या अध्यादेशाला आव्हान दिले जाण्याची शक्यता असल्याने त्यावेळी न्यायालय काय भूमिका घेते हेच आता पाहायचे.