शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मग जगात आपले मित्र कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:53 IST

कोणत्याही देशाचे जागतिक राजकारणातील वजन व स्थान त्याच्या शस्त्रबळावर व मित्रबळावर निश्चित होते.

- सुरेश द्वादशीवारकोणत्याही देशाचे जागतिक राजकारणातील वजन व स्थान त्याच्या शस्त्रबळावर व मित्रबळावर निश्चित होते. महाशक्तींचे तसे असण्याचा आधारही तोच असतो. भारताची या संदर्भातील आजची स्थिती गंभीरपणे लक्षात घ्यावी अशी आहे. चीन हा त्याचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे असे आपल्या एका माजी संरक्षण मंत्र्याचेच म्हणणे आहे. त्याचे अण्वस्त्रबळ प्रचंड व सैन्यसंख्या ३५ लाखांएवढी आहे. भारताचा तेवढाच कडवा शत्रू पाकिस्तान हा असून त्याच्या शस्त्रागारात २७६ अण्वस्त्रे तर त्याचे सैन्यबळ सात लाखांचे आहे. भारताच्या शस्त्रागारात ११० अण्वस्त्रे असून त्याचे सैन्यबळ साडे तेरा लाखांचे आहे. त्याचमुळे आपली क्षेपणास्त्रे अधिकाधिक शक्तिशाली व वेगवान करून ती शांघायपर्यंत मारा करू शकतील अशी बनविण्याची आपली धडपड आहे. देशाचे संरक्षणविषयक सल्लागार अजित डोवल यांचा त्याविषयीचा आग्रहही प्रसिद्ध आहे. या वास्तवाची येथे चर्चा करण्याचे कारण भारताला खात्रीशीर शत्रू असले तरी विश्वसनीय मित्र नाहीत हे आहे... एकेकाळी रशिया हा भारताचा परंपरागत मित्र होता. पाकिस्तानशी झालेल्या प्रत्येक संघर्षात व काश्मीरविषयीच्या सगळ्या वादात तो ठामपणे भारताच्या बाजूने उभा राहिला. अमेरिकेचा पाकिस्तानशी लष्करी करार (सेन्टो) असतानाही त्या देशाने चीनशी झालेल्या प्रत्येक तणावाच्या वेळी भारताची पाठराखण केली. मध्य आशियातील निम्म्याहून अधिक अरब देश भारताशी व्यापार संबंधाने जोडले होते... दुसºया महायुद्धानंतर जगाचे राजकारण अमेरिका आणि रशिया या दोन शक्तिगटात विभागले गेले. त्यातल्या अमेरिकेसोबत पाकिस्तान तात्काळ गेल्याने व त्याचे सैन्य काश्मिरात भारताशी लढत असल्याने तो गट भारताला जोडता येत नव्हता आणि रशियाचा हुकूमशहा स्टॅलीन हा नेहरू व पटेलांना भांडवलदारांचे हस्तक म्हणत असल्याने (व १९५३ मधील आयुष्याच्या अखेरपर्यंत भारतीय राजदूताला तो भेट नाकारत राहिल्याने) त्याही गोटात भारताला जाता येत नव्हते. ही स्थिती फार पूर्वी ओळखलेल्या नेहरूंनी मग कोणत्याही शक्तिगटात सामील न होता तटस्थ राहण्याचे व प्रत्येक जागतिक प्रश्नावर स्वतंत्र भूमिका घेण्याचे (नॉन-अलाईन्ड) धोरण स्वीकारले. नेहरूंचे मोठेपण हे की जे धोरण त्यांनी गरज म्हणून स्वीकारले ते पुढल्या काळात जगातील १४८ देशांनाही त्यांनी ते स्वीकारायला लावले. आजची ‘नाम’ परिषद त्यातून निर्माण झाली. बडे देश दूर असले तरी नेहरूंनी सारे जग त्यातून भारताला जोडून घेतले... आताची स्थिती वेगळी आहे. रशियन साम्राज्य आणि बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर दोन शक्तिगटांचे राजकारण संपले आणि चीन या नव्या शक्तीचा जगात उदय झाला. जागतिक तणावाची जागा स्थानिक तणावांनी घेतली. या स्थितीत आपला शत्रू नव्याने ओळखणे व निश्चित करणे गरजेचे झाले. रशियाने भारताची साथ सोडली आहे. त्याच्या लष्करी पथकांनी पाकिस्तानी सैनिकांसोबत काश्मीर या भारताच्या प्रदेशात लष्करी कवायती याच वर्षी केल्या. तिकडे चीनने आपला सहा पदरी महामार्ग त्याच्या रेल्वे मार्गासह नेपाळच्या उत्तर सीमेपर्यंत आणून भिडविला. त्याचवेळी अरुणाचल, सिक्कीम, उत्तर प्रदेशचे काही भाग व लद्दाख आपले असल्याचा दावाही त्याने पुढे केला. नेपाळ या भारत व चीन दरम्यानच्या देशात आता सत्तेवर आलेले माओवादी सरकार व त्यातही टी.पी. ओली यांचा बहुसंख्येने निवडला गेलेला चीनवादी पक्ष भारतविरोधी भूमिका घेणारा व चीनशी जास्तीचे सख्य जोडू पाहणारा आहे. २०१५ मध्ये या ओलीनेच भारताशी असलेले नेपाळचे व्यापारी संबंध निम्म्यावर आणले. मध्यंतरी दीड महिनेपर्यंत तराईच्या प्रदेशात नेपाळमध्ये जाणाºया भारतीय मालमोटारींची कोंडीही त्यानेच केली. आता तो तेथे पूर्ण सत्ताधारी झाला आहे. चीनला त्याच्या उत्पादनाच्या वाहतुकीसाठी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावर त्याची बंदरे हवी आहेत. त्यासाठी त्याने काश्मीर व पाकिस्तानातून जाणारा ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाचा औद्योगिक महामार्ग बांधायला घेतला. दुसरीकडे तसाच कॉरिडॉर म्यानमारमधून बंगालच्या उपसागरापर्यंत तो बांधत आहे. भारताची उत्तर, पूर्व व पश्चिम या तिन्ही दिशांनी कोंडी करण्याचा त्याचा हा इरादा उघड आहे. याविषयी रशिया व अमेरिकेने अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. भारतानेही त्याविरुद्ध जोरकस आवाज उठविला नाही... बांगला देशचा जन्मच भारताच्या साहाय्याने झाला. तरीही त्याच्या लष्कराने भारतीय सैनिकांची मुंडकी कापून त्यांचा खेळ करण्याचे क्रौर्य अलीकडे केले. मॉरिशसला ३०० चाच्यांच्या ताब्यातून भारताने मुक्त केले. आता त्या देशाने चीनशी खुल्या व्यापाराचा करार केला आहे आणि श्रीलंकेचे सरकारही तसा करार करायला उत्सुक आहे. भारताभोवतीचे सगळे देश चीनच्या अधीन होत असताना भारताने इस्त्रायलला दूतावासाचा दर्जा दिल्याने सारा मध्य आशिया भारताविरुद्ध गेला आहे. या काळात भारत, द. कोरिया, जपान व आॅस्ट्रेलिया यांची मालिका आपल्या मदतीने संघटित करण्याचा क्लिंटन ते ओबामा यांच्या राजवटींनी केलेला प्रयत्न क्षीण होऊन विस्मरणात गेल्याचे दिसत आहे... चहुबाजूंनी कोंडी होत असतानाच शेजाºयापासूनही वेगळे होण्याची ही स्थिती आहे. तिला तोंड देऊन समर्थपणे उभे राहणे व नेहरू ते इंदिरा यांच्या काळातील भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पुन्हा प्राप्त करणे हे आजचे देशासमोरचे आव्हान आहे.(संपादक, लोकमत, नागपूर)