शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 07:54 IST

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का?

डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव

दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी जिवाच्या आकांताने लढत आहेत. नियमितपणे चार-सहा महिन्यांनी दुधाचे दर पडतात. सरकार त्यावर किरकोळ डागडुजी करते. नंतर पुन्हा भाव कोसळतात. ही ‘संकट आवर्तने’ मूलभूत उपाय न केल्याने वारंवार येत राहतात.

‘किमान स्थिरता’ ही कोणत्याही क्षेत्राच्या प्रगतीची महत्त्वाची पूर्वअट असते. दूध क्षेत्रात अशी स्थिरता नाही. अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली आहे. मात्र, दूध पावडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित असल्याने त्या चढउतारानुसार दुधाचे खरेदीदर चढतात किंवा पडतात. शिवाय ‘फ्लश’ सीजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढल्यामुळेही दुधाचे दर पडतात. महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात १ कोटी ३० लाख लिटर दूध संकलित होते. पैकी ९० लाख लिटर दूध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरजेसाठी वापरले जाते. उरलेल्या किंवा सरप्लस ठरलेल्या ४० लाख लिटर दुधाची पावडर व बटर बनते. महाराष्ट्रात हे ‘रूपांतरित’ होणारे ४० लाख ‘सरप्लस’ दूधच भावातील चढ-उताराचे मुख्य कारण आहे. कारण, त्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर ठरतो.

दुधाला किमान किफायतशीर दर मिळावा ही मागणी आहे. राज्य सरकारने दूध संघ, दूध कंपन्या व सरकारी अधिकारी यांची समिती बनविली. दर तीन महिन्यांचे दूध खरेदी दर जाहीर करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली. पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्याची घोषणाही सरकारने केली. समितीने दुधाला ३४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. सरकारने तसा आदेशही काढला. मात्र, आदेश लागू होताच दूध संघांनी दुधाच्या ‘रिव्हर्स रेट’चा सहारा घेत दर पाडले. नंतर तर आदेश झुगारून देत बेस रेटच ३४ वरून २७पर्यंत खाली आणला. खाद्याचे भाव कमी करा, असे सांगितल्याने नफ्याला चटावलेल्या कंपन्या पशुखाद्याचे भाव कमी करीत नसतात, असे आदेश पाळले जावेत यासाठी ‘कायदा व पर्यायी व्यवस्था’ सरकारकडे हवी. पण, सहकाराचे वाटोळे केल्यामुळे व सरकारी दूधखरेदी, प्रक्रिया व वितरणाची व्यवस्था संपविण्यात आल्यामुळे व ‘महानंद’सारख्या ब्रँडची वाट लावल्यामुळे अशी पुरेशी पर्यायी व्यवस्थाच सरकारकडे आज नाही.

राज्यातील २६ टक्के दूध संकलित करणाऱ्या सहकारी दूध संघांचे काही प्रमाणात ‘नियमन’ करण्याचे कायदेशीर अधिकार सहकार कायद्यांतर्गत सरकारकडे आहेत. मात्र, राज्यातील ७४ टक्के दुधाचे संकलन करणाऱ्या खासगी उद्योगातील नफेखोरीला लगाम लावणारी व्यवस्था सरकारकडे नाही.  वास्तविकत: खासगी दूध उद्योगालाही सरकारी अनुदाने व विकास योजनांचा लाभ झाला असल्याने सरकारी निर्बंध या उद्योगांवर लावणे योग्यच ठरणार आहे. साखर उद्योगाप्रमाणे सहकारी व खासगी दूध उद्योगाचे ‘नियमन’ करणारा कायदा करावा, ही शेतकरी संघर्ष समितीची मागणी आहे. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने साखरेचा एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगची तरतूद असणारा कायदा दुधाला लागू करता येणार नाही, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हे बरोबर नाही. कारण दूध पावडर हा टिकाऊ पदार्थ आहे. शिवाय पाऊच पॅकद्वारे विक्री होणाऱ्या ९० लाख लिटर दुधाची विक्री किंमत वर्षभर साधारणपणे स्थिर किंवा वाढती असते. पदार्थ नाशवंत असला तरी पदार्थाची विक्री किंमत स्थिर असल्याने अर्थशास्त्रीय परिभाषेत तरल दुधाचे नाशवंतत्व संपून जाते.

दुधाचा महापूर आल्याने दर पाडावे लागले असे आपण नेहमी ऐकतो. मात्र, महाराष्ट्रात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. दुग्धविकास मंत्र्यांनीही महाराष्ट्रात ३० टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दूध संकलन केंद्रांवर वजनकाट्यात लूटमार होते. दुधाचे दर फॅट व एसएनएफनुसार ठरतात. मात्र, या बाबी मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर तपासण्याची व्यवस्था राज्यात नाही. कंपन्या वाट्टेल तसे फेरफार करून वजनकाटे व मिल्कोमीटर वापरतात. दूध क्षेत्रातील संकट आवर्तने थांबविण्यासाठी ही लूटमार थांबविण्याची, दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची व यासाठी मूलभूत दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :milkदूध