शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सर्वच मतदारसंघांत मतविभाजनाची चिंता

By किरण अग्रवाल | Updated: April 7, 2024 11:48 IST

Loksabha Election 2024 : अकोला व बुलढाण्यात स्वकीय, सहयोगी पक्षीयांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी रोखता येईल की नाही यावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत़

- किरण अग्रवाल

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननीची प्रक्रिया आटोपली असून, आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेल्या स्वकीयांची मनधरणी कुठे कुठे आणि कितपत सफल होते याबाबतची उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे, विशेषतः अकोला व बुलढाण्यात यामुळे होऊ शकणाऱ्या मतविभाजनाचा धोका दुर्लक्षिता येणारा नसून, सहयोगी पक्षांमधील नाराजीही उघड होणारी आहे.

अर्ज माघारीसाठी अवघा एकच दिवस हाती असून, स्वकीयांबरोबरच इतरही काही मातब्बरांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकल्याने प्रस्थापित पक्ष व उमेदवारांचे धाबे दणाणलेले आहे. अकोल्यात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले भाजपचे नेते, दोनवेळा आमदार राहिलेले नारायणराव गव्हाणकर तसेच बुलढाणा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, भाजपचे नेते, तीनवेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांच्या माघारीचे काय, हे अजून गुलदस्त्यात आहे. गव्हाणकर यांना अकोल्यातून भाजपची उमेदवारी अपेक्षित होती ती मिळालेली नाही. बुलढाण्यात महाआघाडी अंतर्गत काँग्रेसला, तर महायुती अंतर्गत भाजपला जागा सुटणे अपेक्षित होते; परंतु तसे न झाल्याने पाटील व शिंदे यांनी अपक्ष उमेदवाऱ्या दाखल केल्या आहेत. या तिघांची समजूत काढली जाईलही कदाचित, पण तसे झाले अगर न झाले तरी संबंधितांची व त्या त्या पक्षांमध्ये दिसून येत असलेली नाराजी खरेच व पूर्णांशाने दूर होऊ शकेल का? हाच खरा प्रश्न आहे.

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात मुख्यत्वे तिरंगी लढत होऊ घातली आहे, पण गव्हाणकर रिंगणात कायम राहिले तर ती चौरंगीही बनेल. अर्थात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात येऊन आंबेडकर यांच्यासाठी अजूनही चर्चेचे दार उघडे असल्याचे सांगितले असले आणि तिकडे दिल्लीत पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक यांनीही त्यासाठीची तयारी दर्शविली आहे. मात्र खुद्द काँग्रेस व वंचितमध्येही याकडे गांभीर्याने बघितले जाताना दिसत नाही, त्यामुळे नेमके कोणाच्या मताचे विभाजन होणार हाच यंदा अकोल्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

बुलढाण्यात स्वकीयांची मनधरणी सफल झाली तरी शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव व उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांच्यात शेतकरी युवा नेते रविकांत तुपकर, सहकारातील नेते संदीप शेळके यांच्या अपक्ष उमेदवारीने रंग भरले गेले आहेत. वंचितचे वसंत मगर यांचीही उमेदवारी आहेच. उमेदवारांशी निगडित प्रादेशिक अस्मितेचे मुद्देही येथे परिणामकारक ठरत आले आहेत. त्यादृष्टीनेही आतापासूनच आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे विविध कारणातून होणारे मत विभाजन सर्वांसाठीच डोकेदुखीचे ठरणार आहे.

यवतमाळ सोबतच्या वाशिममध्ये तर महायुतीमधील शिंदेसेनेच्या राजश्री पाटील व महाआघाडीतील उद्धवसेनेचे संजय देशमुख हे दोघे यवतमाळकडील असल्याने वाशिमकरांचा उत्साह काठावर आलेला दिसत आहे. वंचितनेही यवतमाळकडीलच सुभाष पवार यांना अगोदर उमेदवारी जाहीर केली होती, परंतु ऐनवेळी वाशिम जिल्ह्यातील अभिजित राठोड यांचे नाव नक्की झाल्याने त्यांनी अर्ज दाखल केला होता. छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला, अन्यथा त्यांच्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन घडू शकले असते. काही स्थानिक अपक्ष रिंगणात आहेत. माघारी नंतर त्यातील किती कायम राहतात व ते कितपत मत विभाजन घडवू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी पक्षीय उमेदवारांसाठी स्थानिक नेतृत्व किती निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे मेहनत घेतात यावरही सारे अवलंबून राहणार आहे.

सारांशात, स्वकीयांची कायम राहू शकणारी बंडखोरी असो, की अपक्षांची उमेदवारी; यातून घडणारे मतविभाजन मातब्बरांच्या जय-पराजयाचे समीकरण बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकते. सर्व शक्ती पणास लावलेल्या उमेदवारांना व त्यांच्या पक्षांना त्यामुळेच धडकी भरणे स्वाभाविक ठरले आहे.