शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची तीव्रता वाढते आहे, जागरूक असायला हवे!

By किरण अग्रवाल | Updated: February 26, 2023 13:42 IST

The intensity of summer is increasing, be aware : उन्हाळा हा घशाला कोरड पाडणारा असतो, तसा माणुसकीची परीक्षा पाहणाराही असतो.

- किरण अग्रवाल 

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची ओरड तर वाढते आहेच, शिवाय घराघरात भरून असलेला कापूस व शेतावरील सोयाबीन, तुरीचे कुटार पाहता आगीच्या घटना कशा टाळता येतील यासाठी यंत्रणांसह ग्रामस्थांनाही अलर्ट राहावे लागेल. हे बघतांना माणुसकीच्या नात्याने मुक्या जीवांची काळजीही घ्यावी लागेल.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असेल याची जाणीव व्हावी; पण ती जाणीव सरकारी यंत्रणांना मात्र झालेली दिसत नाही हे दुर्दैव. उन्हाळ्याकडे फक्त पाणीटंचाईच्या दृष्टिकोनातूनच पाहून चालणारे नसते, तर एकूणच आरोग्य व ठिकठिकाणी लागणाऱ्या आगीच्या घटना पाहता ''अलर्ट'' मोडवर राहून काम करणे अपेक्षित असते, परंतु ते होताना दिसत नाही.

मागे याच स्तंभात उन्हाळ्याच्या अनुषंगाने जाणवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची चर्चा करण्यात आली होती. उन्हाळा सुरूही झाला, पण टंचाई निवारण आराखड्याचे कागदपत्र काही हाले ना, अशी यासंदर्भातली स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाने यासंदर्भात संवेदनशील राहत उपाययोजना करायला हव्यात. महत्त्वाचे म्हणजे पाणीटंचाईकडे लक्ष वेधून झाले आहेच, आता त्या व्यतिरिक्तच्या इतर बाबींकडेही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. विशेषता उन्हाच्या तीव्रतेने अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यासाठी अग्निशमन यंत्रणेपासून सर्वच संबंधितांनी जागरूक असणे गरजेचे बनले आहे.

आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यात जंगल क्षेत्र मोठे आहे. दोन दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या संग्रामपूर तालुक्याच्या अंबाबारवा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वणवा पेटला, यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. दर उन्हाळ्यात या आगी लागत असतात. मागच्या वर्षीही याच परिसरात म्हणजे सोनबर्डी वर्तुळातील करमाळा परिसरात मोठी आग लागून सुमारे 47 हेक्टर क्षेत्रफळावरील वनसंपदा नष्ट झाली होती. बरे, सोनबर्डी वर्तुळातच वारंवार आगी का लागतात हे देखील तपासायला हवे पण तितक्या गांभीर्याने विचारच कोणी करीत नाही. शिवाय फक्त आग व वनसंपदेचे नुकसान एवढ्या मर्यादित भूमिकेतून याकडे पाहता येऊ नये. या जंगलावर अवलंबून असणारे वन्य घटक, पशुपक्षी व त्यांचा अधिवास या अशा घटनांमुळे धोक्यात येतो व उघड्यावर पडतो ही बाब यात अधिक महत्वाची आहे.

जंगलांचेच काय, ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये शेतातून काढला गेलेला कापूस भरून पडलेला आहे. आता चांगला भाव मिळेल, थोडा वेळ थांबू असा विचार करत करत दिवस उलटत आहेत, पण भाव नसल्याने कापूस अनेकांच्या घरात पडून आहे. अनेकांच्या शेतात, खळ्यावर सोयाबीन, तुरीचे कुटार पडलेले आहे. उन्हाचा चटका इतका तीव्र आहे की जराशी ठिणगी अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. दोनच दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्याच्या पारस परिसरात मनारखेड येथे एका पडीक शेताला आग लागून तेथील सोयाबीन व तुरीच्या कुटाराची गंजी खाक झाली. अशा घटना घडल्यावर अग्निशामक यंत्रणा धावून जातात व आग आटोक्यात आणतात, पण यात बळीराजाचे जे नुकसान होते ते भरून निघत नाही.

उन्हाळा हा घशाला कोरड पाडणारा असतो, तसा माणुसकीची परीक्षा पाहणाराही असतो. आपण मनुष्याच्या तृष्णेची चिंता अधिक वाहतो, परंतु मुक्या जीवांचे काय? यातही पाळीव प्राण्यांची काळजी बळीराजाकडून घेतली जाते, पण अन्य पशु पक्षांचे काय? पाण्याअभावी कासावीस होऊन जीव सोडून देण्याखेरीस त्यांच्याकडे पर्याय नसतो. आपण ''वसुधैव कुटुम्बकम''ची संस्कृती व संस्कार जपणारे आहोत. तेव्हा आणखी उन्हाळा तीव्र होण्याची वाट न पाहता आतापासूनच जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व चार दाण्यांची व्यवस्था करायला हवी. अकोल्यामध्ये भल्या पहाटे रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किट, टोस्ट खाऊ घालण्याची मानवीयता मोठ्या प्रमाणात दिसून येते. तिला अधिक विस्तृत करीत उन्हाळ्यात मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल. घरातील लहान लेकरांना आपण ही जबाबदारी दिली तर त्यांच्यावर भूतदयेचा संस्कारही होईल व ते आवडीने हे काम करतीलही.

सारांशात, उन्हाची दाहकता लक्षात घेता सरकारी यंत्रणांनी गतिमान होत आवश्यक ती टंचाई निवारणाची कामे केली व सामान्य जणांनीही माणुसकीच्या नात्याने पशुपक्ष्यांसाठी घराच्या अंगणात किंवा टेरेसवर पाण्याची व्यवस्था केली तर या दाहकतेची तीव्रता काहीशी कमी करता येणे नक्कीच शक्य आहे. चला त्यासाठी सारे मिळून प्रयत्न करूया...