शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उन्हाची तीव्रता वाढते आहे, जागरूक असायला हवे!

By किरण अग्रवाल | Updated: February 26, 2023 13:42 IST

The intensity of summer is increasing, be aware : उन्हाळा हा घशाला कोरड पाडणारा असतो, तसा माणुसकीची परीक्षा पाहणाराही असतो.

- किरण अग्रवाल 

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची ओरड तर वाढते आहेच, शिवाय घराघरात भरून असलेला कापूस व शेतावरील सोयाबीन, तुरीचे कुटार पाहता आगीच्या घटना कशा टाळता येतील यासाठी यंत्रणांसह ग्रामस्थांनाही अलर्ट राहावे लागेल. हे बघतांना माणुसकीच्या नात्याने मुक्या जीवांची काळजीही घ्यावी लागेल.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असेल याची जाणीव व्हावी; पण ती जाणीव सरकारी यंत्रणांना मात्र झालेली दिसत नाही हे दुर्दैव. उन्हाळ्याकडे फक्त पाणीटंचाईच्या दृष्टिकोनातूनच पाहून चालणारे नसते, तर एकूणच आरोग्य व ठिकठिकाणी लागणाऱ्या आगीच्या घटना पाहता ''अलर्ट'' मोडवर राहून काम करणे अपेक्षित असते, परंतु ते होताना दिसत नाही.

मागे याच स्तंभात उन्हाळ्याच्या अनुषंगाने जाणवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची चर्चा करण्यात आली होती. उन्हाळा सुरूही झाला, पण टंचाई निवारण आराखड्याचे कागदपत्र काही हाले ना, अशी यासंदर्भातली स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाने यासंदर्भात संवेदनशील राहत उपाययोजना करायला हव्यात. महत्त्वाचे म्हणजे पाणीटंचाईकडे लक्ष वेधून झाले आहेच, आता त्या व्यतिरिक्तच्या इतर बाबींकडेही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. विशेषता उन्हाच्या तीव्रतेने अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यासाठी अग्निशमन यंत्रणेपासून सर्वच संबंधितांनी जागरूक असणे गरजेचे बनले आहे.

आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यात जंगल क्षेत्र मोठे आहे. दोन दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या संग्रामपूर तालुक्याच्या अंबाबारवा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वणवा पेटला, यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. दर उन्हाळ्यात या आगी लागत असतात. मागच्या वर्षीही याच परिसरात म्हणजे सोनबर्डी वर्तुळातील करमाळा परिसरात मोठी आग लागून सुमारे 47 हेक्टर क्षेत्रफळावरील वनसंपदा नष्ट झाली होती. बरे, सोनबर्डी वर्तुळातच वारंवार आगी का लागतात हे देखील तपासायला हवे पण तितक्या गांभीर्याने विचारच कोणी करीत नाही. शिवाय फक्त आग व वनसंपदेचे नुकसान एवढ्या मर्यादित भूमिकेतून याकडे पाहता येऊ नये. या जंगलावर अवलंबून असणारे वन्य घटक, पशुपक्षी व त्यांचा अधिवास या अशा घटनांमुळे धोक्यात येतो व उघड्यावर पडतो ही बाब यात अधिक महत्वाची आहे.

जंगलांचेच काय, ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये शेतातून काढला गेलेला कापूस भरून पडलेला आहे. आता चांगला भाव मिळेल, थोडा वेळ थांबू असा विचार करत करत दिवस उलटत आहेत, पण भाव नसल्याने कापूस अनेकांच्या घरात पडून आहे. अनेकांच्या शेतात, खळ्यावर सोयाबीन, तुरीचे कुटार पडलेले आहे. उन्हाचा चटका इतका तीव्र आहे की जराशी ठिणगी अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. दोनच दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्याच्या पारस परिसरात मनारखेड येथे एका पडीक शेताला आग लागून तेथील सोयाबीन व तुरीच्या कुटाराची गंजी खाक झाली. अशा घटना घडल्यावर अग्निशामक यंत्रणा धावून जातात व आग आटोक्यात आणतात, पण यात बळीराजाचे जे नुकसान होते ते भरून निघत नाही.

उन्हाळा हा घशाला कोरड पाडणारा असतो, तसा माणुसकीची परीक्षा पाहणाराही असतो. आपण मनुष्याच्या तृष्णेची चिंता अधिक वाहतो, परंतु मुक्या जीवांचे काय? यातही पाळीव प्राण्यांची काळजी बळीराजाकडून घेतली जाते, पण अन्य पशु पक्षांचे काय? पाण्याअभावी कासावीस होऊन जीव सोडून देण्याखेरीस त्यांच्याकडे पर्याय नसतो. आपण ''वसुधैव कुटुम्बकम''ची संस्कृती व संस्कार जपणारे आहोत. तेव्हा आणखी उन्हाळा तीव्र होण्याची वाट न पाहता आतापासूनच जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व चार दाण्यांची व्यवस्था करायला हवी. अकोल्यामध्ये भल्या पहाटे रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किट, टोस्ट खाऊ घालण्याची मानवीयता मोठ्या प्रमाणात दिसून येते. तिला अधिक विस्तृत करीत उन्हाळ्यात मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल. घरातील लहान लेकरांना आपण ही जबाबदारी दिली तर त्यांच्यावर भूतदयेचा संस्कारही होईल व ते आवडीने हे काम करतीलही.

सारांशात, उन्हाची दाहकता लक्षात घेता सरकारी यंत्रणांनी गतिमान होत आवश्यक ती टंचाई निवारणाची कामे केली व सामान्य जणांनीही माणुसकीच्या नात्याने पशुपक्ष्यांसाठी घराच्या अंगणात किंवा टेरेसवर पाण्याची व्यवस्था केली तर या दाहकतेची तीव्रता काहीशी कमी करता येणे नक्कीच शक्य आहे. चला त्यासाठी सारे मिळून प्रयत्न करूया...