शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

प्राप्तिकर प्रक्रिया सोपी करता करता अधिकच किचकट..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 07:45 IST

प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची सरसकट मर्यादा १२ लाख रुपये न करता ‘किरकोळ सवलती’ची तरतूद केलेली असल्यामुळे कर आकारणी क्लिष्ट झालेली आहे.

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक

नवे प्राप्तिकर विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी आणले जाईल, नवी रचना सर्वसामान्य प्राप्तिकरदात्यांना समजण्यास अत्यंत सुलभ, सुटसुटीत व सोपी असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात. तशी ती खरंच आहे का?

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे घटणाऱ्या वास्तव उत्पन्नाचे प्रमाण लक्षात घेऊन त्या आधारावर प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करणे तसेच   बचतीला व गुंतवणुकीला प्राप्तिकरात सवलत देणे या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे जुन्या प्राप्तिकर कायद्याचा आत्मा. नवीन प्राप्तिकर विधेयकात या बाबींना स्थान नाही. नवीन प्राप्तिकर कायदा लागू करण्यामागे  प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत फारशी वाढ न करता जुन्या करप्रणालीतील ७० प्रकारच्या वजावटी रद्द करून प्राप्तिकरापासून मिळणाऱ्या उत्पन्नात कायमस्वरूपात फार मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, हा सरकारचा  उद्देश दिसतो. 

नवीन करप्रणालीत दिलेल्या सवलतींमुळे सरकारचे पुढच्या वर्षी एक लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सरकारचे म्हणणे असले, तरी प्राप्तिकराच्या उत्पन्नात वाढ करणारी कोणतीही नवीन तरतूद केलेली नसताना तसेच प्राप्तिकरदात्यांची संख्या एक कोटीने कमी होणार असतानाही प्रत्यक्ष उत्पन्नात मात्र १३.१४ टक्क्यांची वाढ होणार आहे.  जुन्या कायद्यातील ७० प्रकारच्या वजावटींचा लाभ घेणाऱ्या प्राप्तिकरदात्यांची संख्या कमी होईल. अर्थातच, त्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे सरकारच्या उत्पन्नात होणारी घट कमी होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

सरकारने प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा १२ लाख रुपये न करता ‘सूट’ देण्याच्या रकमेत वाढ करून त्याद्वारे १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नाही, अशी तरतूद केली आहे.  १२ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सर्व प्राप्तिकरदात्यांना ही ‘सूट’ मिळणार नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा चार लाख रुपयेच असेल. त्यामुळे १२ लाख रुपयांपेक्षा थोडेही उत्पन्न जास्त झाल्यास  चार लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागणार, हे लक्षात घेऊन सरकारने ‘किरकोळ सवलती’ची (मार्जिनल बेनिफिट) तरतूद केलेली आहे.  त्यामुळे सर्वसामान्य प्राप्तिकरदात्यांच्या बाबतीत करआकारणी अत्यंत क्लिष्ट झालेली आहे.

’किरकोळ सवलत’ म्हणजे करदायित्व हे किमान करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाहून अधिक असता कामा नये. उदा. १२ लाख ७० हजार रुपये उत्पन्न असल्यास त्यांना केवळ ७० हजार रुपयांच्या जादा उत्पन्नावर ७०,५०० रुपये प्राप्तिकर भरावा लागतो. या ‘किरकोळ सूट’मुळे संबंधित करदात्याला १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ७० हजार रुपयेच प्राप्तिकरापोटी भरावे लागतील व केवळ ५०० रुपयांची ‘किरकोळ सवलत’ त्यांना मिळेल. प्रत्यक्षात या ७० हजार रुपयांच्या प्राप्तिकरावर  ४ टक्के दराने शिक्षण व आरोग्य सेस भरावा लागेल. म्हणजेच  ७० हजार रुपयांच्या जादा उत्पन्नावर ७२,८०० रुपये प्राप्तिकर भरावा लागेल. सध्या ‘किरकोळ सवलत’ मिळण्यासाठीची मर्यादा साधारणत: १२,७०,५८० रुपये आहे. त्यामुळे सरकारने जर प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा सर्वांसाठी १२ लाख रुपये केली तर ‘किरकोळ सवलती’सारख्या क्लिष्ट तरतुदीची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे करआकारणी सोपी होईल. प्राप्तिकर आकारणीच्या टप्प्यांची (slabs) संख्या कमी ठेवून ते टप्पे पाचच्या पटीत असणे आवश्यक असते. परंतु, प्राप्तिकर विधेयकात (किरकोळ सवलतीच्या उपटप्प्यासहित)  आठ टप्पे   आहेत. 

सरकारला प्राप्तिकर कायदा खरोखरच सोपा करायचा असल्यास सरकारने प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा १२ लाख रुपये करून १२ लाख रुपयांपेक्षा जास्त ते २० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, २० लाख रुपयांपेक्षा जास्त ते ३० लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के व ३० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के दराने प्राप्तिकर आकारणे योग्य होईल.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स