शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

म्हणूनच चावटपणा

By admin | Updated: April 4, 2016 02:34 IST

संपूर्ण विश्वच आज दहशतवादाच्या सावटाखाली सापडलेले असताना योगायोगाने चीनला अद्याप त्याचा उपसर्ग पोहोचलेला नसल्याने आणि भारतावर वचक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला कुरवाळणे

संपूर्ण विश्वच आज दहशतवादाच्या सावटाखाली सापडलेले असताना योगायोगाने चीनला अद्याप त्याचा उपसर्ग पोहोचलेला नसल्याने आणि भारतावर वचक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला कुरवाळणे त्या देशाला गरजेचे वाटत असल्याने तो देश वारंवार असा चावटपणा करीत असला पाहिजे. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर अलीकडेच झालेल्या घातपाती हल्ल्याचे कारस्थान जैश-ए-मुहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर यानेच घडवून आणल्याचे ठोस पुरावे भारतापाशी आहेत. भारतात याआधी झालेल्याही अशाच अनेक घातपाती कृत्यांचे पितृत्वदेखील त्याच्याचकडे जाते. परिणामी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) जशी ‘जैशे’वर आंतरराष्ट्रीय बंदी लादली आहे, तशीच ती मसूदवरदेखील लादावी असा प्रस्ताव भारताने या संघटनेकडे पाठविला होता. संघटनेच्या सुरक्षा समितीच्या पाच कायम सदस्य देशांपैकी चौघांचा या प्रस्तावाला पाठिंबा असताना, चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करून युनोला याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यास भाग पाडले. सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यांमध्ये भारताचा समावेश केला जाण्यास पुन्हा चीनच विरोध करीत असून, त्यामागेही त्या देशाचे पाकला कुरवाळणे हेच कारण आहे. अन्यथा चीनला मसूद अझरचा पुळका येण्याचे काहीच कारण नाही. बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरावर गेल्या पंधरवड्यात जो भीषण घातपाती हल्ला झाला त्यानंतर लगेचच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी तिथे पोहोचले आणि त्यावेळी बोलताना त्यांनी युनोवर सडकून टीका केली. अतिरेकी आणि घातपाती कारवायांचे गांभीर्य अद्याप युनोच्या लक्षातच आलेले नाही असे ते म्हणाले. युनोवर वरचष्मा असलेल्या अमेरिकेत ९/११ होईपर्यंत भारतात होत असलेल्या घातपाती कारवाया म्हणजे साधा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे अशीच अमेरिकेची आणि म्हणून युनोची धारणा होती. पंतप्रधानांचा हा युक्तिवाद अंमळ सैल करायचा तर जोवर खुद्द चीनला अतिरेकी कारवायांचे चटके बसत नाहीत तोवर तो देशही असाच चावटपणा करीत राहील हे गृहीत धरायचे.