शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

राजकारणाचा ठाणे पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:57 IST

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला.

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला. त्यातूनच भाजपाविरोधाच्या नव्या राजकीय ठाणे पॅटर्नचा उदय झाला आहे. लोकसभा, विधानसभेनंतर ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा ज्या शत-प्रतिशत यशाकडे घोडदौड करत होता, त्याला लगाम घालण्याचे काम या पॅटर्नने केल्यामुळे विरोधी पक्षांनी ठरवले तर ते सामायिक राजकीय युद्धाचा एकत्रित मुकाबला करू शकतात, या कल्पनेनेच अनेकांच्या बाहूंत दहा हत्तींचे बळ आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आपलाच वरचश्मा राहावा, यासाठी भाजपाने आक्रमक सुरुवात केली आणि श्रमजीवी संघटनेला सोबत घेत चतूर राजकीय खेळीही केली. सरकारच्या धोरणांबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी लगोलग काही निर्णयही घेतले गेले, पण त्याहीपुढे दोन पावले जात विरोधकांनी एकत्र दिलेली लढाई हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला. सरकारविरोधात नाराजी असणे वेगळे आणि त्यावर फुंकर घालून तिचे राजकीय लाभात रूपांतर करणे वेगळे. असा लाभ मिळवला जाणार नाही, याचा चोख बंदोबस्त भाजपाने यापूर्वी केला. विरोधक एकत्र नसल्याचा फायदा उठवला. पण ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्ष काही कमावण्यासाठी काही गमावण्यास तयार झाला; विरोधकांसाठी काही मतदारसंघ सोडून देण्याची लवचीकता दाखवत गेला. त्यातूनच ‘भाजपालाही तुम्ही हरवू शकता’ हा धडा त्यांना शिकायला मिळाला. राजकीय तडजोडीचे निर्णय घेण्यास काँग्रेसने विलंब लावल्याने त्यांना अल्प लाभावर संतुष्ट व्हावे लागले; त्या तुलनेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या लाभाचे धनी झाले. खासकरून शेतकºयांतील, वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांतील नाराजीचे भाजपाविरोधी मतांत रूपांतर करण्याची किमया सत्तेत असूनही शिवसेनेलाही साधता आली आणि कधी नव्हे इतका तो पक्ष ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात रूजला. या ठाणे पॅटर्नच्या धोक्याची घंटा भाजपाने आतापासूनच ऐकायला हवी. त्यानुसार भूमिका बदलायला हवी. स्थानिक पातळीवरील निवडणुका, त्यातील मुद्दे जरी भिन्न असले आणि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीपेक्षा त्या लढवण्याची पद्धतही वेगळी असली, तरी ग्रामीण भागातील मतदाराच्या भावनांचा कानोसा त्यातून घेता येतो, हे जरी त्यांनी मान्य केले तरी पुरेसे आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद