शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा ठाणे पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:57 IST

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला.

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला. त्यातूनच भाजपाविरोधाच्या नव्या राजकीय ठाणे पॅटर्नचा उदय झाला आहे. लोकसभा, विधानसभेनंतर ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा ज्या शत-प्रतिशत यशाकडे घोडदौड करत होता, त्याला लगाम घालण्याचे काम या पॅटर्नने केल्यामुळे विरोधी पक्षांनी ठरवले तर ते सामायिक राजकीय युद्धाचा एकत्रित मुकाबला करू शकतात, या कल्पनेनेच अनेकांच्या बाहूंत दहा हत्तींचे बळ आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आपलाच वरचश्मा राहावा, यासाठी भाजपाने आक्रमक सुरुवात केली आणि श्रमजीवी संघटनेला सोबत घेत चतूर राजकीय खेळीही केली. सरकारच्या धोरणांबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी लगोलग काही निर्णयही घेतले गेले, पण त्याहीपुढे दोन पावले जात विरोधकांनी एकत्र दिलेली लढाई हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला. सरकारविरोधात नाराजी असणे वेगळे आणि त्यावर फुंकर घालून तिचे राजकीय लाभात रूपांतर करणे वेगळे. असा लाभ मिळवला जाणार नाही, याचा चोख बंदोबस्त भाजपाने यापूर्वी केला. विरोधक एकत्र नसल्याचा फायदा उठवला. पण ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्ष काही कमावण्यासाठी काही गमावण्यास तयार झाला; विरोधकांसाठी काही मतदारसंघ सोडून देण्याची लवचीकता दाखवत गेला. त्यातूनच ‘भाजपालाही तुम्ही हरवू शकता’ हा धडा त्यांना शिकायला मिळाला. राजकीय तडजोडीचे निर्णय घेण्यास काँग्रेसने विलंब लावल्याने त्यांना अल्प लाभावर संतुष्ट व्हावे लागले; त्या तुलनेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या लाभाचे धनी झाले. खासकरून शेतकºयांतील, वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांतील नाराजीचे भाजपाविरोधी मतांत रूपांतर करण्याची किमया सत्तेत असूनही शिवसेनेलाही साधता आली आणि कधी नव्हे इतका तो पक्ष ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात रूजला. या ठाणे पॅटर्नच्या धोक्याची घंटा भाजपाने आतापासूनच ऐकायला हवी. त्यानुसार भूमिका बदलायला हवी. स्थानिक पातळीवरील निवडणुका, त्यातील मुद्दे जरी भिन्न असले आणि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीपेक्षा त्या लढवण्याची पद्धतही वेगळी असली, तरी ग्रामीण भागातील मतदाराच्या भावनांचा कानोसा त्यातून घेता येतो, हे जरी त्यांनी मान्य केले तरी पुरेसे आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद