शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

राजकारणाचा ठाणे पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:57 IST

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला.

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला. त्यातूनच भाजपाविरोधाच्या नव्या राजकीय ठाणे पॅटर्नचा उदय झाला आहे. लोकसभा, विधानसभेनंतर ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा ज्या शत-प्रतिशत यशाकडे घोडदौड करत होता, त्याला लगाम घालण्याचे काम या पॅटर्नने केल्यामुळे विरोधी पक्षांनी ठरवले तर ते सामायिक राजकीय युद्धाचा एकत्रित मुकाबला करू शकतात, या कल्पनेनेच अनेकांच्या बाहूंत दहा हत्तींचे बळ आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आपलाच वरचश्मा राहावा, यासाठी भाजपाने आक्रमक सुरुवात केली आणि श्रमजीवी संघटनेला सोबत घेत चतूर राजकीय खेळीही केली. सरकारच्या धोरणांबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी लगोलग काही निर्णयही घेतले गेले, पण त्याहीपुढे दोन पावले जात विरोधकांनी एकत्र दिलेली लढाई हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला. सरकारविरोधात नाराजी असणे वेगळे आणि त्यावर फुंकर घालून तिचे राजकीय लाभात रूपांतर करणे वेगळे. असा लाभ मिळवला जाणार नाही, याचा चोख बंदोबस्त भाजपाने यापूर्वी केला. विरोधक एकत्र नसल्याचा फायदा उठवला. पण ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्ष काही कमावण्यासाठी काही गमावण्यास तयार झाला; विरोधकांसाठी काही मतदारसंघ सोडून देण्याची लवचीकता दाखवत गेला. त्यातूनच ‘भाजपालाही तुम्ही हरवू शकता’ हा धडा त्यांना शिकायला मिळाला. राजकीय तडजोडीचे निर्णय घेण्यास काँग्रेसने विलंब लावल्याने त्यांना अल्प लाभावर संतुष्ट व्हावे लागले; त्या तुलनेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या लाभाचे धनी झाले. खासकरून शेतकºयांतील, वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांतील नाराजीचे भाजपाविरोधी मतांत रूपांतर करण्याची किमया सत्तेत असूनही शिवसेनेलाही साधता आली आणि कधी नव्हे इतका तो पक्ष ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात रूजला. या ठाणे पॅटर्नच्या धोक्याची घंटा भाजपाने आतापासूनच ऐकायला हवी. त्यानुसार भूमिका बदलायला हवी. स्थानिक पातळीवरील निवडणुका, त्यातील मुद्दे जरी भिन्न असले आणि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीपेक्षा त्या लढवण्याची पद्धतही वेगळी असली, तरी ग्रामीण भागातील मतदाराच्या भावनांचा कानोसा त्यातून घेता येतो, हे जरी त्यांनी मान्य केले तरी पुरेसे आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद