शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

रोटरी ‘अन्नपूर्णा’ची अखंडित दहा वर्षे

By राजा माने | Updated: August 4, 2017 00:38 IST

मुला-बाळांना वाढविण्यात आयुष्य वेचल्यानंतरही निराधार व विकलांग बनलेल्या माता-पित्यांची आधाराची काठी बनण्याचे काम सोलापूर रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना करीत आहे. तिची आज दशकपूर्ती...समाजातील कोणत्याही आर्थिकस्तरात वार्धक्य आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. आयुष्यभर कष्ट वेचायचे आणि मुला-बाळांना वाढवायचे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली की, केवळ ...

मुला-बाळांना वाढविण्यात आयुष्य वेचल्यानंतरही निराधार व विकलांग बनलेल्या माता-पित्यांची आधाराची काठी बनण्याचे काम सोलापूर रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना करीत आहे. तिची आज दशकपूर्ती...समाजातील कोणत्याही आर्थिकस्तरात वार्धक्य आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. आयुष्यभर कष्ट वेचायचे आणि मुला-बाळांना वाढवायचे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली की, केवळ कर्तव्यपूर्तीचा आनंद उराशी जतन करत राहायचे. त्या आनंदापर्यंत पोहोचताना शरीराने सोसलेल्या वेदना आणि वाढलेल्या वयाने निसर्गत:च डोक्यावर लादलेले आरोग्याच्या समस्यांचे ओझे वहायचे! या प्रवासात मुला-बाळांनी साथ दिली तर ठीक नाही तर निराधार बनून उपासमारीच्या खाईत निपचित पडायचे. दुर्दैवाने असे जीवन जगावे लागलेल्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. सरकारने त्यावर कायद्याचे हत्यार उगारले तरी प्रबोधन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याशिवाय त्या खाईतून बाहेर काढणे शक्य होणार नाही.खरं तर या सामाजिक प्रश्नांवर कायदा हा एकमेव उपाय नाही, याची जाणीव झाल्यानेच अनेक सामाजिक संस्था वृद्ध, विकलांग आणि निराधार लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येत असताना आपण अनुभवतो. नेमक्या याच प्रश्नाचे गांभीर्य ८१ वर्षांची सेवा परंपरा असलेल्या सोलापूरच्या रोटरी क्लबने दहा वर्षांपूर्वीच जाणले. २००७ साली तत्कालीन अध्यक्ष राज मणियार आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी या प्रश्नांवर कृतिशील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर सुबत्ता आणि वैभवात जगलेल्या वृद्ध माता-पित्यांना बाजारबुणग्या नात्या-गोत्यांनी वाºयावर सोडल्यानंतर त्यांचा आधार म्हणून आपली संस्था पुढे आली पाहिजे, या भावनेतून ते कामाला लागले. आचार्य किशोरजी व्यास यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘अन्नपूर्णा’ ही निराधारांच्या मुखात खात्रीचा घास भरविणारी योजना साकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक चळवळींचे अभ्यासक प्रा. विलास बेत यांच्या मदतीने विद्यार्थ्यांची फळी तयार करून अशा निराधार माता-पित्यांचा शोध घेण्यात आला. त्या शोधातूनच शंभर वृद्ध माता-पित्यांची निवड करण्यात आली. राज मणियार, जयेश पटेल, या उपक्रमाचे अध्यक्ष खुशाल देढिया, किशोर चंडक यांच्यासारखी मंडळी जिद्दीने कामाला लागली. दररोज सकाळ-संध्याकाळ शंभर जणांना दर्जेदार जेवण घरपोच देणे ही सोपी गोष्ट नव्हती. अन्नधान्यापासून स्वयंपाक व डबे वितरणाच्या यंत्रणेपर्यंत प्रत्येक ठिकाणी खर्चाची बाजू होती. रोटरीचे सर्व सदस्य आर्थिक बाजू सक्षम बनविण्यासाठी पुढे सरसावले. पहिल्या वर्षी ‘सुगरण’ या संस्थेच्या मीनाबेन शहा यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मोठ्या निष्ठेने स्वयंपाकाची जबाबदारी पेलली. त्यानंतर या कामाला दिशा देण्याचे काम उद्योगवर्धिनी महिला गटाचे काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान व शुभांगी बुवा यांनी केले. त्यांनी दिलेल्या दिशेमुळेच आजवर एकही दिवस वृद्धांना मिळणाºया भोजनात खंड पडलेला नाही.या कामाला शिस्तबद्ध आणि पारदर्शी राखण्यासाठी रोटरी क्लबने एक विशेष समिती कार्यरत केली. ती समिती या योजनेच्या दैनंदिन व्यवहाराकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देते. सोलापूर रोटरी क्लबला ७५ वर्षे झाल्यानिमित्ताने एक विशेष टपाल पाकीट डाक खात्यामार्फत काढण्यात आले होते. त्या पाकिटावरही ‘अन्नपूर्णा’ योजनेला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले. दरवर्षी या योजनेवर सुमारे १२ लाख रुपये खर्च होतो. या खर्चाची जुळणी करण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीच्या एक वर्षाच्या अन्नदानाचा आठ हजार ५० रुपये एवढा खर्च येतो. हे गणित ध्यानात घेऊन देणगीदारांना आवाहन करण्यात येते.लाभार्थ्यांची वेळोवेळी करावी लागणारी निवड, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत कराव्या लागणाºया आरोग्य तपासण्या व औषधे, जेवणाची भांडी तसेच चादरीसह सर्व कपडे या बाबींची विशेष काळजी घेण्यात येते. रोटरी कम्युनिटी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून निधी संकलन व अन्नपूर्णा योजनेची वाटचाल अखंडित राखली जाते. या योजनेच्या यशाचे खरे वाटेकरी म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सेवाभावी वृत्तीने काम करणारे रिक्षाचालक कुमार पाटील व शरणय्या हिरेमठ यांचा! अशाच सेवाभावी लोकांमुळे ‘अन्नपूर्णा’ सोलापूरची नवी ओळख ठरत आहे.