शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रोटरी ‘अन्नपूर्णा’ची अखंडित दहा वर्षे

By राजा माने | Updated: August 4, 2017 00:38 IST

मुला-बाळांना वाढविण्यात आयुष्य वेचल्यानंतरही निराधार व विकलांग बनलेल्या माता-पित्यांची आधाराची काठी बनण्याचे काम सोलापूर रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना करीत आहे. तिची आज दशकपूर्ती...समाजातील कोणत्याही आर्थिकस्तरात वार्धक्य आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. आयुष्यभर कष्ट वेचायचे आणि मुला-बाळांना वाढवायचे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली की, केवळ ...

मुला-बाळांना वाढविण्यात आयुष्य वेचल्यानंतरही निराधार व विकलांग बनलेल्या माता-पित्यांची आधाराची काठी बनण्याचे काम सोलापूर रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना करीत आहे. तिची आज दशकपूर्ती...समाजातील कोणत्याही आर्थिकस्तरात वार्धक्य आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. आयुष्यभर कष्ट वेचायचे आणि मुला-बाळांना वाढवायचे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली की, केवळ कर्तव्यपूर्तीचा आनंद उराशी जतन करत राहायचे. त्या आनंदापर्यंत पोहोचताना शरीराने सोसलेल्या वेदना आणि वाढलेल्या वयाने निसर्गत:च डोक्यावर लादलेले आरोग्याच्या समस्यांचे ओझे वहायचे! या प्रवासात मुला-बाळांनी साथ दिली तर ठीक नाही तर निराधार बनून उपासमारीच्या खाईत निपचित पडायचे. दुर्दैवाने असे जीवन जगावे लागलेल्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. सरकारने त्यावर कायद्याचे हत्यार उगारले तरी प्रबोधन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याशिवाय त्या खाईतून बाहेर काढणे शक्य होणार नाही.खरं तर या सामाजिक प्रश्नांवर कायदा हा एकमेव उपाय नाही, याची जाणीव झाल्यानेच अनेक सामाजिक संस्था वृद्ध, विकलांग आणि निराधार लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येत असताना आपण अनुभवतो. नेमक्या याच प्रश्नाचे गांभीर्य ८१ वर्षांची सेवा परंपरा असलेल्या सोलापूरच्या रोटरी क्लबने दहा वर्षांपूर्वीच जाणले. २००७ साली तत्कालीन अध्यक्ष राज मणियार आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी या प्रश्नांवर कृतिशील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर सुबत्ता आणि वैभवात जगलेल्या वृद्ध माता-पित्यांना बाजारबुणग्या नात्या-गोत्यांनी वाºयावर सोडल्यानंतर त्यांचा आधार म्हणून आपली संस्था पुढे आली पाहिजे, या भावनेतून ते कामाला लागले. आचार्य किशोरजी व्यास यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘अन्नपूर्णा’ ही निराधारांच्या मुखात खात्रीचा घास भरविणारी योजना साकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक चळवळींचे अभ्यासक प्रा. विलास बेत यांच्या मदतीने विद्यार्थ्यांची फळी तयार करून अशा निराधार माता-पित्यांचा शोध घेण्यात आला. त्या शोधातूनच शंभर वृद्ध माता-पित्यांची निवड करण्यात आली. राज मणियार, जयेश पटेल, या उपक्रमाचे अध्यक्ष खुशाल देढिया, किशोर चंडक यांच्यासारखी मंडळी जिद्दीने कामाला लागली. दररोज सकाळ-संध्याकाळ शंभर जणांना दर्जेदार जेवण घरपोच देणे ही सोपी गोष्ट नव्हती. अन्नधान्यापासून स्वयंपाक व डबे वितरणाच्या यंत्रणेपर्यंत प्रत्येक ठिकाणी खर्चाची बाजू होती. रोटरीचे सर्व सदस्य आर्थिक बाजू सक्षम बनविण्यासाठी पुढे सरसावले. पहिल्या वर्षी ‘सुगरण’ या संस्थेच्या मीनाबेन शहा यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मोठ्या निष्ठेने स्वयंपाकाची जबाबदारी पेलली. त्यानंतर या कामाला दिशा देण्याचे काम उद्योगवर्धिनी महिला गटाचे काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान व शुभांगी बुवा यांनी केले. त्यांनी दिलेल्या दिशेमुळेच आजवर एकही दिवस वृद्धांना मिळणाºया भोजनात खंड पडलेला नाही.या कामाला शिस्तबद्ध आणि पारदर्शी राखण्यासाठी रोटरी क्लबने एक विशेष समिती कार्यरत केली. ती समिती या योजनेच्या दैनंदिन व्यवहाराकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देते. सोलापूर रोटरी क्लबला ७५ वर्षे झाल्यानिमित्ताने एक विशेष टपाल पाकीट डाक खात्यामार्फत काढण्यात आले होते. त्या पाकिटावरही ‘अन्नपूर्णा’ योजनेला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले. दरवर्षी या योजनेवर सुमारे १२ लाख रुपये खर्च होतो. या खर्चाची जुळणी करण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीच्या एक वर्षाच्या अन्नदानाचा आठ हजार ५० रुपये एवढा खर्च येतो. हे गणित ध्यानात घेऊन देणगीदारांना आवाहन करण्यात येते.लाभार्थ्यांची वेळोवेळी करावी लागणारी निवड, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत कराव्या लागणाºया आरोग्य तपासण्या व औषधे, जेवणाची भांडी तसेच चादरीसह सर्व कपडे या बाबींची विशेष काळजी घेण्यात येते. रोटरी कम्युनिटी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून निधी संकलन व अन्नपूर्णा योजनेची वाटचाल अखंडित राखली जाते. या योजनेच्या यशाचे खरे वाटेकरी म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सेवाभावी वृत्तीने काम करणारे रिक्षाचालक कुमार पाटील व शरणय्या हिरेमठ यांचा! अशाच सेवाभावी लोकांमुळे ‘अन्नपूर्णा’ सोलापूरची नवी ओळख ठरत आहे.