शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

केजरीवालांना सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 03:26 IST

जनतेचा नेता किंवा प्रतिनिधी कधीही सदारड्या किंवा कुरकुऱ्या असून चालत नाही, तर तो सतत सळसळता आणि उत्साही असावा लागतो हे कुणीतरी त्या अरविंद केजरीवालांना सांगण्याची गरज आहे.

जनतेचा नेता किंवा प्रतिनिधी कधीही सदारड्या किंवा कुरकुऱ्या असून चालत नाही, तर तो सतत सळसळता आणि उत्साही असावा लागतो हे कुणीतरी त्या अरविंद केजरीवालांना सांगण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे त्यांच्या रोजच्या रडारडीचे आवडते गंतव्य. मुळात त्या दोघांची कोणत्याही निकषांवर बरोबरी होऊ शकत नाही. तरीही केजरीवाल ती करतात. करोत. पण आता त्यांनी अगदी नव्याने केलेला आरोप म्हणजे मोदी त्यांना जीवे मारणार आहेत. स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झालेल्या व्यक्तीला सतत असेच काहीसे भास होत असतात असे म्हणतात. केजरीवाल त्यातले नाहीत हे खरे पण त्यांना जिथे तिथे मोदी दिसतात. शिवाय सततची कुरकुर आहेच. आपल्या अनेक आमदारांवर मोदी सरकार कुऱ्हाड चालवीत असल्याचा त्यांचा आरोप सुरु असतानाच त्यांचे एक खासदार भगवंत मान यांचे प्रकरण उपटले. हे मान नकलाकार आहेत. पण राजकारणातही ते बहुधा त्याच पेशात वावरत असावेत. संसद आवाराचे चित्रीकरण करुन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे उडवले असा त्यांच्यावर आरोप आहे. त्या आरोपावरुन त्यांनी एकीकडे दिलगिरी व्यक्त करुन त्यांच्या फेसबुक खात्यावर टाकलेले प्रस्तुतचे चित्रीकरण तर काढून टाकले पण दुसरीकडे पाच पानी पत्र पाठवून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि तिसरीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना आरोपी करा अशी मागणी केली. पठाणकोटच्या हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यानंतर मोदींनी त्या तळास भेट देणाऱ्या ज्या पाकी गटाला परवानगी दिली त्या गटात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचे काही माजी हेर होते. शिरजोरी बहुधा यालाच म्हणत असावेत. मान प्रकरणामुळेही आपल्याला दिल्लीत अडकून पडावे लागले असे केजरीवाल म्हणतात. त्यांना तूर्त दिल्लीतून बाहेर पडून पंजाब आणि नंतर गोवा ही दोन राज्ये पादाक्रांत करायची आहेत. तशी इच्छा बाळगणे हा एक राजकारणी म्हणून त्यांचा हक्कच आहे. पण मुळात पंजाब ही शूरवीरांची भूमी. तिथे त्यांना नवज्योत सिद्धू गवसले असले तरी त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून लोक सदा रडक्या केजरीवालांना स्वीकारतील अशी आशा मात्र बाळगता येणार नाही.