शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

शिक्षकदेखील झाले सैराट

By admin | Updated: September 1, 2016 05:10 IST

चळवळींचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणीच या जिल्ह्यात झाल्याने सहकार क्षेत्राचे जे मोठे जाळे निर्माण झाले, त्यात साखर कारखाने

चळवळींचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणीच या जिल्ह्यात झाल्याने सहकार क्षेत्राचे जे मोठे जाळे निर्माण झाले, त्यात साखर कारखाने, पतसंस्था, वि.का.संस्था, नागरी सहकारी बँकांचा समावेश आहे. यामुळे नगरचे जे अर्थकारण वाढले, त्यात अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकही आघाडीवर आहे. बँकेत ६१० कोटींच्या ठेवी असून १२ हजार सभासद तर १४ शाखा आहेत. हा पसारा सांभाळायचा म्हणजे राजकारण आलेच. ते करणारे गुरुजी राजकीय पुढाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. बँकेच्या राजकारणात सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ, गुरुमाऊली मंडळ, इब्टा बहुजन आघाडी, ऐक्य मंडळ पुढे आहेत. अनेक वर्षे सदिच्छा मंडळ सत्तास्थानी राहिले आहे. दहा वर्षापूर्वी संजय कळमकर यांच्या माध्यमातून शिक्षक बँकेत सत्तांतर होऊन गुरुकुल मंडळाच्या हाती सत्ता गेली होतीे व त्यानंतर बँकेच्या चाव्या सदिच्छा मंडळाच्या हाती आल्या. याच मंडळात फूट पडली आणि रावसाहेब रोहकले यांच्या गुरूमाऊली मंडळाची निर्मिती झाली. बँकेत आता रोहकले यांच्या गुरुमाऊलीची सत्ता आहे. परंतु गुरुजींचे राजकारण इतक्या टोकाला गेले आहे की पाच वर्षे एकमेकांची उणी-दुणी काढण्यात हे गुरुजी व्यस्त असतात. त्यांना आपल्या शाळेतील कामांचे भानही नसते. शिक्षक नेत्यांच्या डोक्यात केवळ मंडळ व बँकेचेच राजकारण असते. अहमदनगर शिक्षक सहकारी बँकेची ९७ वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सालाबादप्रमाणे शिक्षकांची फ्री स्टाईल पाहायला मिळाली. बँकेची सभा म्हटली की, शिक्षक सैराट झालेले दिसणे, हे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. बँकेच्या वार्षिक सभेची तारीख जाहीर झाली की, शिक्षक मंडळाच्या बैठका आयोजित केल्या जातात. बैठकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या उणीवा शोधण्याचे काम विरोधकांकडून केले जाते. यातून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू होतात. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, पत्रकबाजी सुरू होते. सभेत देखील कोणी काय भूमिका घ्यायची याची तयारी आधीपासून केली जाते. यंदाच्या सभेतदेखील हेच पाहायला मिळाले. दहा वर्षापूर्वी गुरुकुलची सत्ता असताना शिक्षक नेते संजय कळमकर यांना सदिच्छा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. हे प्रकरण त्यावेळी पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. त्यानंतर हेच लोण राज्यभर पसरले. यामागील कारणांचा शोध घेतला तर सहकारातील भ्रष्टाचारच पुढे येतो. शिक्षक बँकेत आतापर्यंत अनेक घोटाळे गाजले आहेत. यात बजाज अलायन्स विमा प्रकरण, कर्मचारी मेहनताना प्रकरण, १२५ कोटी खर्चाची स्ट्राँगरुम व दुरुस्ती, इतर साहित्य खरेदी प्रकरण या शिवाय कोपरगाव शाखेतील ५७ लाखांचा दडपलेला अपहार ही वादग्रस्त प्रकरणे कारणीभूत आहेत. संघटनेचे बळ मोठे असते आणि संघटित वर्ग स्वत:चे म्हणणे मांडू शकतो हे समाजात आपल्याला दिसून येते. यात शिक्षकही मागे नाहीत. यंदाच्या सभेत अनेक गुरुजी मद्यप्राशन करून आले होते. सभेत महिला सदस्यही असतात, याचेही भान त्यांना असू नये? जबाबदारीचे भान सोडून गुरुजी असे सैराटपणे का वागतात? याला शिक्षक नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. आज महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची वाट अतिशय खडतर झाली आहे. अनेक बँका, पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. काही बुडाल्या आहेत. याला कारण भ्रष्टाचार, गैरव्यवहारच आहे. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक नेत्यानी बँकेच्या विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा ही बँकही डबघाईस येईल, यात शंका नाही. चर्चा करून प्रश्न सोडविता येतात. सभेत केवळ गोंधळ, हाणामारीने प्रश्न सुटत नसतात. यासाठी गुरुजींनी इतका सैराटपणा करणे योग्य नाही. - अनिल लगड