शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

शिक्षकदेखील झाले सैराट

By admin | Updated: September 1, 2016 05:10 IST

चळवळींचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणीच या जिल्ह्यात झाल्याने सहकार क्षेत्राचे जे मोठे जाळे निर्माण झाले, त्यात साखर कारखाने

चळवळींचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणीच या जिल्ह्यात झाल्याने सहकार क्षेत्राचे जे मोठे जाळे निर्माण झाले, त्यात साखर कारखाने, पतसंस्था, वि.का.संस्था, नागरी सहकारी बँकांचा समावेश आहे. यामुळे नगरचे जे अर्थकारण वाढले, त्यात अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकही आघाडीवर आहे. बँकेत ६१० कोटींच्या ठेवी असून १२ हजार सभासद तर १४ शाखा आहेत. हा पसारा सांभाळायचा म्हणजे राजकारण आलेच. ते करणारे गुरुजी राजकीय पुढाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. बँकेच्या राजकारणात सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ, गुरुमाऊली मंडळ, इब्टा बहुजन आघाडी, ऐक्य मंडळ पुढे आहेत. अनेक वर्षे सदिच्छा मंडळ सत्तास्थानी राहिले आहे. दहा वर्षापूर्वी संजय कळमकर यांच्या माध्यमातून शिक्षक बँकेत सत्तांतर होऊन गुरुकुल मंडळाच्या हाती सत्ता गेली होतीे व त्यानंतर बँकेच्या चाव्या सदिच्छा मंडळाच्या हाती आल्या. याच मंडळात फूट पडली आणि रावसाहेब रोहकले यांच्या गुरूमाऊली मंडळाची निर्मिती झाली. बँकेत आता रोहकले यांच्या गुरुमाऊलीची सत्ता आहे. परंतु गुरुजींचे राजकारण इतक्या टोकाला गेले आहे की पाच वर्षे एकमेकांची उणी-दुणी काढण्यात हे गुरुजी व्यस्त असतात. त्यांना आपल्या शाळेतील कामांचे भानही नसते. शिक्षक नेत्यांच्या डोक्यात केवळ मंडळ व बँकेचेच राजकारण असते. अहमदनगर शिक्षक सहकारी बँकेची ९७ वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सालाबादप्रमाणे शिक्षकांची फ्री स्टाईल पाहायला मिळाली. बँकेची सभा म्हटली की, शिक्षक सैराट झालेले दिसणे, हे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. बँकेच्या वार्षिक सभेची तारीख जाहीर झाली की, शिक्षक मंडळाच्या बैठका आयोजित केल्या जातात. बैठकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या उणीवा शोधण्याचे काम विरोधकांकडून केले जाते. यातून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू होतात. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, पत्रकबाजी सुरू होते. सभेत देखील कोणी काय भूमिका घ्यायची याची तयारी आधीपासून केली जाते. यंदाच्या सभेतदेखील हेच पाहायला मिळाले. दहा वर्षापूर्वी गुरुकुलची सत्ता असताना शिक्षक नेते संजय कळमकर यांना सदिच्छा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. हे प्रकरण त्यावेळी पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. त्यानंतर हेच लोण राज्यभर पसरले. यामागील कारणांचा शोध घेतला तर सहकारातील भ्रष्टाचारच पुढे येतो. शिक्षक बँकेत आतापर्यंत अनेक घोटाळे गाजले आहेत. यात बजाज अलायन्स विमा प्रकरण, कर्मचारी मेहनताना प्रकरण, १२५ कोटी खर्चाची स्ट्राँगरुम व दुरुस्ती, इतर साहित्य खरेदी प्रकरण या शिवाय कोपरगाव शाखेतील ५७ लाखांचा दडपलेला अपहार ही वादग्रस्त प्रकरणे कारणीभूत आहेत. संघटनेचे बळ मोठे असते आणि संघटित वर्ग स्वत:चे म्हणणे मांडू शकतो हे समाजात आपल्याला दिसून येते. यात शिक्षकही मागे नाहीत. यंदाच्या सभेत अनेक गुरुजी मद्यप्राशन करून आले होते. सभेत महिला सदस्यही असतात, याचेही भान त्यांना असू नये? जबाबदारीचे भान सोडून गुरुजी असे सैराटपणे का वागतात? याला शिक्षक नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. आज महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची वाट अतिशय खडतर झाली आहे. अनेक बँका, पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. काही बुडाल्या आहेत. याला कारण भ्रष्टाचार, गैरव्यवहारच आहे. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक नेत्यानी बँकेच्या विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा ही बँकही डबघाईस येईल, यात शंका नाही. चर्चा करून प्रश्न सोडविता येतात. सभेत केवळ गोंधळ, हाणामारीने प्रश्न सुटत नसतात. यासाठी गुरुजींनी इतका सैराटपणा करणे योग्य नाही. - अनिल लगड