शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची चव न्यारी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

जगभरातले पदार्थ लोकप्रिय होत असताना महाराष्ट्रीयन पदार्थांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे पदार्थ वेगवेगळ््या पद्धतीने कसे देता येतील, याचा विचार करायला हवा.

- भक्ती सोमणजगभरातले पदार्थ लोकप्रिय होत असताना महाराष्ट्रीयन पदार्थांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे पदार्थ वेगवेगळ््या पद्धतीने कसे देता येतील, याचा विचार करायला हवा. येणाऱ्या नवीन वर्षात महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांना वेगळा साज चढवून, तेही लोकप्रिय करण्याचा संकल्प करू या!गेल्या आठवड्यात पार्टीसाठी मैत्रिणींबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दोन खूप मोठ्या टेबलवर बुफे लावला होता. वेगवेगळ््या देशांच्या पदार्थांबरोबरच तिथे चक्क वडा पाव, पिठलं भाकरी, अळुवडी, कोथिंबीर वडी, वालाची उसळ, मसालेभात, अळूची भाजी हे पदार्थ होते. हे पदार्थ खाण्यासाठी परदेशी नागरिकांची खूपच गर्दी होते. या लोकांचा हे पदार्थ खातानाचा उत्साह आणि प्रतिक्रिया पाहून याबाबत चौकशी केल्यावर, तिथल्या शेफने हे पदार्थ आमच्याकडे नेहमी असतात असे सांगतानाच, पिठलं-भाकरी जेव्हा असेल, त्या वेळी तर लोकांची जास्त गर्दी असते, असेही सांगितले. यावरून हे लक्षात आले की, महाराष्ट्रीयन पदार्थ जर त्याची चव न बदलता वेगळे प्रयोग करत लोकांना दिले, तर ते लोकप्रिय होऊ शकतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांताची वेगळी खासियत आहे, तसेच एखादा पदार्थ खूप वेगवेगळ््या पद्धतीने केला जातो. त्यामुळे चवीत फरक पडतो, पण चव अजिबात न बदलता हे पदार्थ केले, तर ते आणखी लोकप्रिय होऊ शकतात, असे खाद्यक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच या क्षेत्रातील तज्ज्ञ महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांबाबत करत असलेले वेगवेगळे प्रयोग यशस्वी होतात. पुरणपोळीबाबतीत तर सध्या वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. चॉकलेट, स्ट्रोबेरी, गुलकंद अशा २१ प्रकारच्या पुरणपोळ््या सध्या डोंबिवलीत मिळत आहेत. अनेक तज्ज्ञ यात प्रयोगही करत आहेत. पुरणपोळी तुपावर भाजताना त्यात थोडा संत्र्याचा रस घातला, तर त्याला आंबट गोड चव येते. हा पदार्थ सुझेट (२४९ी३३ी) या फ्रेंच डेझर्टशी खूप साधर्म्य साधणारा आहे. त्यामुळे अशी वेगळ््या पद्धतीची पुरणपोळी लोकांना आवडते, असे सेलिब्रिटी शेफ नीलेश लिमये यांनी सांगितले. पदार्थाची चव न बदलता तो वेगळेपणाने देण्याचा प्रयत्न करत असलेल्या नीलेश यांनी असे अनेक प्रयोग केले आहेत. नेहमीप्रमाणे तयार होणाऱ्या मोदकाचा आकार बदलून ते उकडवून झाल्यावर तव्यावर ते थोडेसे परतले की, खरपूसपणा येतो. त्यात वरून चॉकलेट सॉस घातल्यावर हे मोदकही एकदम वेगळे लागतात. तर कोथिंबीर वडी ही आपल्या पद्धतीनेच करायची. त्याचा आकार लांबट ठेवून तिला नाव मात्र सिलेंट्रो फिंगर्स द्यायचे. मेक्सिकन नाव असलेली ही चविष्ट कोथिंबीर वडी लोकप्रिय आहे, असे नीलेश सांगतात. असे विविध पदार्थांबाबत करता येऊ शकते. मुगाची डाळ, तांदूळ आणि भाज्या एकत्र करून आपण जी खिजडी करतो, ती परदेशात केजरी (‘ीॅिी१ीी) या नावाने केली जाते. म्हणजेच खिचडीवरही वेगवेगळे प्रयोग करत, त्याची मूळ चव न बदलू देता, ती लोकप्रिय होऊ शकेल. अरेबिक हमस खाल्लेल्या अनेकांना हा पदार्थ खाताना मेतकुटाची आठवण येते. मेतकूट हा पौष्टिक प्रकार. त्यामुळे त्याची माहिती सांगून पौष्टिक चटणी म्हणून त्याचा उपयोग करता येऊ शकतो. त्यात वेगळा प्रयोग म्हणूनही, थोडेसे आलं लसूण पेस्ट, मीठ असे एकत्र करता येईल. अळूवडी करताना त्यात डाळीच्या पिठाबरोबरच नॉनव्हेजचे वा ड्रायफ्रूट्सचे मिश्रण स्टफ्ड करता येईल. असेच थालीपीठ, सोलकढी, भाजणीचे वडे, अळूचं फदफदं, अंबाडीची भाजी, अशा विविध पदार्थांबाबतीत करता येईल. मात्र, यासाठी कल्पकतेची गरज खूप लागेल, यात शंकाच नाही. जाता जाता - गेल्या वर्षी लंडनच्या फूड फेस्टिव्हलमध्ये चमचमीत पदार्थ म्हणून दादर येथील 'आस्वाद' हॉटेलच्या मिसळीने बाजी मारली. त्यामुळे साहजिकच मिसळ चर्चेचा विषय बनली. म्हणूनच की काय, आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिथे जगभरातले पदार्थ मिळतात, तिथे आता आस्वादच्या मिसळीनेही जागा पटकावली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर ही बाब मराठी मनाला खरच आनंद देणारी आहे. भाकरीला आधुनिक स्पर्शवेगवेगळ््या पिठांचा वापर करत होणाऱ्या भाकरीची वेगळ््या पद्धतीने मांडणी करता येऊ शकते. तंदूरमध्ये छोट्या-छोट्या भाकऱ्या ग्रील करायच्या, तसेच नेहमीप्रमाणे पिठलं करून त्यात थोडं मॅयोनिज टाकायचं. स्टाटर म्हणून हा प्रकार द्यायचा. 'इंडियन कॉटेज सँडविच' या नावाने एकदा प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी हा पदार्थ दिला होता. त्यासाठी त्यांनी तयार भाकऱ्या चौकोनी आकारात कापून त्यावर सँडविचप्रमाणे लोणी, हिरवी चटणी लावून मध्ये झुणका स्टफ केला. वरून पालकाचे पान ठेवून त्यावर दुसरा भाकरीचा तुकडा ठेवला. त्याचे प्रेझेंटेशन आणि चवही सुंदर असल्याने उत्सुकतेने खाल्लेल्या या प्रकाराची शिफारस लोकांनी पुन्हा केली. अशी कल्पकता महाराष्ट्रीय पदार्थांबाबतीत नेहमी असली, तर ते पदार्थ नक्कीच जगभरात जातील, असा विश्वास विष्णूजी व्यक्त करतात. सध्या चिज आणि भाज्या घालून केलेला भाकरी पिझ्झा हा प्रकारही लोकप्रिय होत आहे.