शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ते चिंचेचे झाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:20 IST

‘ते चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ या मराठी भावगीतात भलेही चिनार वृक्षाचे गुणगान गायले असले तरी चिंचही काही कमी नाही. किंबहुना चिंचेचा भाव वधारला आहे. शिवाय चिनार हा काश्मीरपुरता मर्यादित. त्याचे सौंदर्य असेलही, पण चिंचेच्या चवीची त्याला काय सर येणार? चिंच येथेच बाजी मारत नाही, तर बाजारातही तिचा भाव ...

‘ते चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ या मराठी भावगीतात भलेही चिनार वृक्षाचे गुणगान गायले असले तरी चिंचही काही कमी नाही. किंबहुना चिंचेचा भाव वधारला आहे. शिवाय चिनार हा काश्मीरपुरता मर्यादित. त्याचे सौंदर्य असेलही, पण चिंचेच्या चवीची त्याला काय सर येणार? चिंच येथेच बाजी मारत नाही, तर बाजारातही तिचा भाव कायम वधारलेला असतो. ‘पैसे दिले, चिंचोके नाही’ असे म्हणत आपण चिंचोक्याला क्षुल्लक समजत असलो तरी याच चिंचोक्यांचा भाव ज्वारीपेक्षाही जास्त आहे. हे सारे चिंचेचे गुणगान यासाठी की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी ‘शिवाई’ नावाचे एक नवीन वाण शोधून काढले. दहा वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना यश मिळाले. अशा संशोधनाला वेळ द्यावा लागतो. शिवाय चिकाटीही हवी. चिंचेमध्ये टार्टारिक अ‍ॅसिड हा महत्त्वाचा घटक जो आंबटपणाचे प्रमाण ठरवतो. चिंचेचे हे वाण सरस असण्याचे कारण म्हणजे तिचे वजन, गराचे प्रमाण आणि उत्पादन याबाबतीत ती सरस ठरते. हे संशोधन कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. कोणत्याही नवीन मान्यता मिळविण्यासाठी काही निकष आहेत. प्रामुख्याने प्रस्थापित वाणांपेक्षा उत्पादन जास्त असले पाहिजे. कृषी विद्यापीठाच्या औरंगाबादस्थित हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने यापूर्वी शोधून काढलेल्या नं. २६३ या वाणापेक्षा ‘शिवाई’ हे वाण १५ टक्के जास्त उत्पादन देणारे ठरले आहे. शाश्वत स्रोत. फळबागा या उत्पन्नाचे कायमचे साधन होऊ शकतात. त्यातही चिंचेचे महत्त्व अनन्यसाधारण. मराठवाड्यातील भूम-परंड्याचा परिसर, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पूर्वी विवाह ठरविताना शेतात चिंचेची झाडे किती, असा प्रश्न केला जाई. कारण ते हमखास उत्पन्नाचे साधन होते. आज आम्हाला झटपट पैसा हवा आहे, त्यामुळे चिंच लागवडीकडे कल कमी झाला आहे. हे उत्पादन लवकर कसे मिळविता येईल, यादृष्टीनेही संशोधन होण्याची गरज आहे. परवाच दादाजी खोब्रागडे या ‘बेअरफूट इनोव्हेटर’चा मृत्यू झाला. ज्याने तांदळाच्या जाती शोधल्या होत्या. कृषी विद्यापीठाने ‘शिवाई’ हे वाण शोधले. ते शेतकºयांसाठी उपयुक्त आहे. म्हणून अशाच संशोधनाची विद्यापीठांकडून गरज आहे. असे मूलगामी संशोधनच शेतीचे बिघडलेले अर्थशास्त्र सुधारण्यात मदत करू शकेल. मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता, त्यापाठोपाठ डॉ. संजय पाटीलचे संशोधन शेती व शेतकºयांसाठी आश्वासक म्हणता येईल. पाण्याअभावी शेती हे शाश्वत उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही आणि कोरडवाहू शेती शाश्वत करण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. शाश्वत शेतीच्या संकल्पनेला मूर्तरूप मिळण्यासाठी नैसर्गिक साधनांची उपलब्धता, पर्यावरण पोषकता हे घटक महत्त्वाचे ठरतात. सध्याच्या ग्लोबल वार्मिंगच्या काळात तर ऋतुचक्र बिघडण्याचे प्रमाण अधिक. रोहिण्या बरसल्या आणि मान्सून उंबरठ्यावर आला. ७ जून रोजी त्याचे आगमन म्हणजे मुहूर्त गाठण्याचा प्रकार, असा योग गेल्या बºयाच दिवसांत नव्हता; पण यावर्षी तो जुळून आलेला दिसतो. किंबहुना हा मान्सून एखादा दिवस अगोदरच अवचितपणे दारात येऊन उभा राहील. त्याची ही उभारी, वेग हे पुढचे चार महिने सातत्य टिकवेल का, हा खरा प्रश्न आहे. शाश्वत शेतीचा विचार करताना तो महत्त्वाचा ठरतो. मान्सून वेळेवर आला तरी जुलैमध्ये त्याची दांडी मारण्याची सवय गेल्या काही वर्षांत फार ठळकपणे लक्षात राहते. त्याची गैरहजेरी जेवढी जास्त तेवढे शेतीचे नुकसान जास्त. शाश्वत शेतीचा विचार करताना अशा प्रतिकूल गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी अगोदरच करावी लागते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून फळबाग लागवडीकडे शेतकरी वळतो. एकतर हाती पैसा पडतो, शिवाय बाजारपेठेत मागणीही कायम असते. आता या फळबागांमध्ये अत्यल्प पाणी लागणारे एक फळ म्हणजे चिंच. ज्याची गरज घरोघरी असते; पण त्याच्या बाजारपेठ मूल्याकडे आपण फार लक्ष देत नाही. या नवीन वाणाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून संपूर्ण राज्याला ही संधी चालून आली आहे.