शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

ते चिंचेचे झाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:20 IST

‘ते चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ या मराठी भावगीतात भलेही चिनार वृक्षाचे गुणगान गायले असले तरी चिंचही काही कमी नाही. किंबहुना चिंचेचा भाव वधारला आहे. शिवाय चिनार हा काश्मीरपुरता मर्यादित. त्याचे सौंदर्य असेलही, पण चिंचेच्या चवीची त्याला काय सर येणार? चिंच येथेच बाजी मारत नाही, तर बाजारातही तिचा भाव ...

‘ते चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ या मराठी भावगीतात भलेही चिनार वृक्षाचे गुणगान गायले असले तरी चिंचही काही कमी नाही. किंबहुना चिंचेचा भाव वधारला आहे. शिवाय चिनार हा काश्मीरपुरता मर्यादित. त्याचे सौंदर्य असेलही, पण चिंचेच्या चवीची त्याला काय सर येणार? चिंच येथेच बाजी मारत नाही, तर बाजारातही तिचा भाव कायम वधारलेला असतो. ‘पैसे दिले, चिंचोके नाही’ असे म्हणत आपण चिंचोक्याला क्षुल्लक समजत असलो तरी याच चिंचोक्यांचा भाव ज्वारीपेक्षाही जास्त आहे. हे सारे चिंचेचे गुणगान यासाठी की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी ‘शिवाई’ नावाचे एक नवीन वाण शोधून काढले. दहा वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना यश मिळाले. अशा संशोधनाला वेळ द्यावा लागतो. शिवाय चिकाटीही हवी. चिंचेमध्ये टार्टारिक अ‍ॅसिड हा महत्त्वाचा घटक जो आंबटपणाचे प्रमाण ठरवतो. चिंचेचे हे वाण सरस असण्याचे कारण म्हणजे तिचे वजन, गराचे प्रमाण आणि उत्पादन याबाबतीत ती सरस ठरते. हे संशोधन कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. कोणत्याही नवीन मान्यता मिळविण्यासाठी काही निकष आहेत. प्रामुख्याने प्रस्थापित वाणांपेक्षा उत्पादन जास्त असले पाहिजे. कृषी विद्यापीठाच्या औरंगाबादस्थित हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने यापूर्वी शोधून काढलेल्या नं. २६३ या वाणापेक्षा ‘शिवाई’ हे वाण १५ टक्के जास्त उत्पादन देणारे ठरले आहे. शाश्वत स्रोत. फळबागा या उत्पन्नाचे कायमचे साधन होऊ शकतात. त्यातही चिंचेचे महत्त्व अनन्यसाधारण. मराठवाड्यातील भूम-परंड्याचा परिसर, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पूर्वी विवाह ठरविताना शेतात चिंचेची झाडे किती, असा प्रश्न केला जाई. कारण ते हमखास उत्पन्नाचे साधन होते. आज आम्हाला झटपट पैसा हवा आहे, त्यामुळे चिंच लागवडीकडे कल कमी झाला आहे. हे उत्पादन लवकर कसे मिळविता येईल, यादृष्टीनेही संशोधन होण्याची गरज आहे. परवाच दादाजी खोब्रागडे या ‘बेअरफूट इनोव्हेटर’चा मृत्यू झाला. ज्याने तांदळाच्या जाती शोधल्या होत्या. कृषी विद्यापीठाने ‘शिवाई’ हे वाण शोधले. ते शेतकºयांसाठी उपयुक्त आहे. म्हणून अशाच संशोधनाची विद्यापीठांकडून गरज आहे. असे मूलगामी संशोधनच शेतीचे बिघडलेले अर्थशास्त्र सुधारण्यात मदत करू शकेल. मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता, त्यापाठोपाठ डॉ. संजय पाटीलचे संशोधन शेती व शेतकºयांसाठी आश्वासक म्हणता येईल. पाण्याअभावी शेती हे शाश्वत उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही आणि कोरडवाहू शेती शाश्वत करण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. शाश्वत शेतीच्या संकल्पनेला मूर्तरूप मिळण्यासाठी नैसर्गिक साधनांची उपलब्धता, पर्यावरण पोषकता हे घटक महत्त्वाचे ठरतात. सध्याच्या ग्लोबल वार्मिंगच्या काळात तर ऋतुचक्र बिघडण्याचे प्रमाण अधिक. रोहिण्या बरसल्या आणि मान्सून उंबरठ्यावर आला. ७ जून रोजी त्याचे आगमन म्हणजे मुहूर्त गाठण्याचा प्रकार, असा योग गेल्या बºयाच दिवसांत नव्हता; पण यावर्षी तो जुळून आलेला दिसतो. किंबहुना हा मान्सून एखादा दिवस अगोदरच अवचितपणे दारात येऊन उभा राहील. त्याची ही उभारी, वेग हे पुढचे चार महिने सातत्य टिकवेल का, हा खरा प्रश्न आहे. शाश्वत शेतीचा विचार करताना तो महत्त्वाचा ठरतो. मान्सून वेळेवर आला तरी जुलैमध्ये त्याची दांडी मारण्याची सवय गेल्या काही वर्षांत फार ठळकपणे लक्षात राहते. त्याची गैरहजेरी जेवढी जास्त तेवढे शेतीचे नुकसान जास्त. शाश्वत शेतीचा विचार करताना अशा प्रतिकूल गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी अगोदरच करावी लागते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून फळबाग लागवडीकडे शेतकरी वळतो. एकतर हाती पैसा पडतो, शिवाय बाजारपेठेत मागणीही कायम असते. आता या फळबागांमध्ये अत्यल्प पाणी लागणारे एक फळ म्हणजे चिंच. ज्याची गरज घरोघरी असते; पण त्याच्या बाजारपेठ मूल्याकडे आपण फार लक्ष देत नाही. या नवीन वाणाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून संपूर्ण राज्याला ही संधी चालून आली आहे.