शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

विकासाचे ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:51 IST

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या विमानतळाच्या कामाची पायाभरणी झाली. त्यामुळे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. नवीमुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाबरोबरच मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकआणि प्रस्तावित उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे आता नवी मुंबईहेदेखील खºया अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनणार आहे. नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे मुंबई महानगर क्षेत्रात विमानाने प्रवास करणाºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिवर्ष ४५ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. २०३४ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विमान प्रवाशांची संख्या प्रतिवर्षी १०० दशलक्ष किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी हाताळणे शक्य असल्याने मुंबईच्याछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हीकाळाची गरज बनली होती. अनेक अडथळ्यांमुळे या प्रकल्पासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रालाही सुगीचे दिवस येतील, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक, विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष विमानाच्या उड्डाणाला २०२० साल उजाडण्याची शक्यता आहे. या दोन वर्षांत विमानतळाच्या कामामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपाचे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. पर्यायाने नवी मुंबईसह मुंबई प्रादेशिक क्षेत्राच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे. त्या दिशेने विकासाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र या प्रक्रियेत राज्याच्या विकासाऐवजी केवळ बांधकाम व्यावसायिक, विकासकांनीच स्व‘विकासा’चे टेकआॅफ घेऊ नये, याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.