शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

विकासाचे ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:51 IST

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जात आहे. २२६८ हेक्टरवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च करून देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी या विमानतळाच्या कामाची पायाभरणी झाली. त्यामुळे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. नवीमुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाबरोबरच मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकआणि प्रस्तावित उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे आता नवी मुंबईहेदेखील खºया अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनणार आहे. नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे मुंबई महानगर क्षेत्रात विमानाने प्रवास करणाºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिवर्ष ४५ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. २०३४ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विमान प्रवाशांची संख्या प्रतिवर्षी १०० दशलक्ष किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी हाताळणे शक्य असल्याने मुंबईच्याछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हीकाळाची गरज बनली होती. अनेक अडथळ्यांमुळे या प्रकल्पासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रालाही सुगीचे दिवस येतील, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक, विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष विमानाच्या उड्डाणाला २०२० साल उजाडण्याची शक्यता आहे. या दोन वर्षांत विमानतळाच्या कामामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपाचे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. पर्यायाने नवी मुंबईसह मुंबई प्रादेशिक क्षेत्राच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे. त्या दिशेने विकासाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र या प्रक्रियेत राज्याच्या विकासाऐवजी केवळ बांधकाम व्यावसायिक, विकासकांनीच स्व‘विकासा’चे टेकआॅफ घेऊ नये, याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.