शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सहानुभूती मोर्चा

By admin | Updated: September 28, 2016 05:07 IST

लोकशाहीने देशातील प्रत्येक नागरिकाला जी काही मूलभूत स्वातंत्र्ये बहाल केली आहेत त्यात संचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य आणि निषेध स्वातंत्र्य यांचाही समावेश होत असल्याने

लोकशाहीने देशातील प्रत्येक नागरिकाला जी काही मूलभूत स्वातंत्र्ये बहाल केली आहेत त्यात संचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य आणि निषेध स्वातंत्र्य यांचाही समावेश होत असल्याने यातील संचार स्वातंत्र्याचा लाभ घेत काही उच्चपदस्थ संचार करीत छगन भुजबळ यांना कारागृहात किंवा इस्पितळात जाऊन भेटत असतील तर मग भुजबळांच्या सुटकेसाठी मोर्चा काढण्याचे, त्यात ‘आगे बढो’ किंवा तत्सम घोषणा देण्याचे व त्या माध्यमातून भुजबळांप्रती सहानुभूती व्यक्त करण्याचे त्यांच्या समर्थकांचे स्वातंत्र्य कसे बरे हिरावून घेता येईल? भुजबळांवर भ्रष्टाचारापासून पैशाच्या अफरातफरीपर्यंत अनेक आरोप आहेत पण त्यातील एकही अद्याप सिद्ध झालेला नाही. किंबहुना एकही खटला अजून उभादेखील राहिलेला नाही. आणि जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर सारे निर्दोष आणि निष्पाप असतात असे न्यायतत्त्वच सांगते. त्या न्यायाने भुजबळांच्या संपर्कात राहाण्यात पाप नाही, अनैतिकता नाही आणि कायद्याचा भंगही नाही. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली ज्यांना कठोर सजा झाली आहे आणि जे जामिनावर सुटले आहेत त्यातील काही देशाचे राजकारण ढवळून काढत आहेत तर काही गुन्हेगारी साम्राज्याचा डोलारा सांभाळत आहेत. पण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या कथित प्रतिष्ठितांना कोणी बोल लावीत नसताना मोर्चा काढू पाहाणाऱ्यांना अपशकुन करण्याचे काय कारण बरे? या नियोजित मोर्चाचे स्वरुप केवळ सहानुभूती मोर्चा असेच राहणार असल्याने त्याच्या माध्यमातून न्यायसंस्थेवर दबाब आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचे गृहीत धरणे म्हणजे देशातील न्यायव्यवस्था दबावप्रवण असल्याचे मान्य करणे. त्यात न्यायसंस्थेचा चक्क अपमान आहे. मुळात भुजबळ पडद्यामागे गेल्याने त्यांच्या मातुल जिल्ह्यातील केवळ त्यांचे समर्थकच नव्हे, तर राष्ट्रवादीचे अन्य नेते आणि कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा ५६ परगण्यांचा मुलुख आहे व कोणत्याही एका परगण्याचा सुलतान दुसऱ्या परगण्यात जाऊन कारभार चालवू शकत नाही हे वास्तव आहे. परिणामी भुजबळांच्या नावे भाळी तिलक लावून कोणी कारभार करु पाहात असेल तर करु द्यावा की!