शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सहानुभूती मोर्चा

By admin | Updated: September 28, 2016 05:07 IST

लोकशाहीने देशातील प्रत्येक नागरिकाला जी काही मूलभूत स्वातंत्र्ये बहाल केली आहेत त्यात संचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य आणि निषेध स्वातंत्र्य यांचाही समावेश होत असल्याने

लोकशाहीने देशातील प्रत्येक नागरिकाला जी काही मूलभूत स्वातंत्र्ये बहाल केली आहेत त्यात संचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य आणि निषेध स्वातंत्र्य यांचाही समावेश होत असल्याने यातील संचार स्वातंत्र्याचा लाभ घेत काही उच्चपदस्थ संचार करीत छगन भुजबळ यांना कारागृहात किंवा इस्पितळात जाऊन भेटत असतील तर मग भुजबळांच्या सुटकेसाठी मोर्चा काढण्याचे, त्यात ‘आगे बढो’ किंवा तत्सम घोषणा देण्याचे व त्या माध्यमातून भुजबळांप्रती सहानुभूती व्यक्त करण्याचे त्यांच्या समर्थकांचे स्वातंत्र्य कसे बरे हिरावून घेता येईल? भुजबळांवर भ्रष्टाचारापासून पैशाच्या अफरातफरीपर्यंत अनेक आरोप आहेत पण त्यातील एकही अद्याप सिद्ध झालेला नाही. किंबहुना एकही खटला अजून उभादेखील राहिलेला नाही. आणि जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर सारे निर्दोष आणि निष्पाप असतात असे न्यायतत्त्वच सांगते. त्या न्यायाने भुजबळांच्या संपर्कात राहाण्यात पाप नाही, अनैतिकता नाही आणि कायद्याचा भंगही नाही. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली ज्यांना कठोर सजा झाली आहे आणि जे जामिनावर सुटले आहेत त्यातील काही देशाचे राजकारण ढवळून काढत आहेत तर काही गुन्हेगारी साम्राज्याचा डोलारा सांभाळत आहेत. पण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या कथित प्रतिष्ठितांना कोणी बोल लावीत नसताना मोर्चा काढू पाहाणाऱ्यांना अपशकुन करण्याचे काय कारण बरे? या नियोजित मोर्चाचे स्वरुप केवळ सहानुभूती मोर्चा असेच राहणार असल्याने त्याच्या माध्यमातून न्यायसंस्थेवर दबाब आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचे गृहीत धरणे म्हणजे देशातील न्यायव्यवस्था दबावप्रवण असल्याचे मान्य करणे. त्यात न्यायसंस्थेचा चक्क अपमान आहे. मुळात भुजबळ पडद्यामागे गेल्याने त्यांच्या मातुल जिल्ह्यातील केवळ त्यांचे समर्थकच नव्हे, तर राष्ट्रवादीचे अन्य नेते आणि कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा ५६ परगण्यांचा मुलुख आहे व कोणत्याही एका परगण्याचा सुलतान दुसऱ्या परगण्यात जाऊन कारभार चालवू शकत नाही हे वास्तव आहे. परिणामी भुजबळांच्या नावे भाळी तिलक लावून कोणी कारभार करु पाहात असेल तर करु द्यावा की!