शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

मनाचिये गुंथी - घामाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:20 IST

गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते.

- डॉ. रामचंद्र देखणेगीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते. आपण नमस्काराची क्रिया करतो. पण त्या नमस्कारात आतून जर मन विनम्र झाले नसेल तर क्रिया व्यर्थ होय. विनोबाजींनी सुरेख दृष्टांत दिला आहे. शंकराच्या पिंडीवर धार धरून अभिषेक चालला आहे. पण चित्त जर अभिषेकामध्ये नसेल, ते जर दुसरीकडेच भरकटत असेल तर अभिषेक घडेल काय? अभिषेकाच्या जलधारेबरोबर मानसिक चिंतनाची धार अखंड ओतली जात असेल तरच त्या अभिषेकाला किंमत आहे. म्हणजेच चित्त ओतून केलेला अभिषेक हे नुसते अभिषेकाचे कर्म न राहता ते ‘विकर्म’ ठरेल आणि अशा बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग घडतो.हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल ते स्वधर्माचरण शुष्क राहील. त्याला निष्कामतेची फळे-फुले येणार नाहीत. अशा कर्मात विकर्म ओतले म्हणजे ‘अकर्म’ होते. कर्म सहजपणे बाहेर पडते. मुलावर प्रेम करणे, त्याला वाढविणे, पोसणे हे मातेचे सहजकर्म असते. तेच ‘अकर्म’ होय. माऊली ज्ञानदेव म्हणतात,‘‘अगा करितेन वीण कर्म ।तेचित ते नैष्कर्म्य ।’’ पुढे-पुढे तर या सहज कर्मातही कर्म करणारा मी आहे असा भावही न ठेवता जे कर्म घडते तेच ‘नैष्कर्म्य’ होय. कर्म, कर्मातून विकर्म, विकर्मातून अकर्म आणि पुढे नैष्कर्म्य स्थितीला जाणे म्हणजे कर्मातील आनंदाची एके क पायी गाठीत कर्मानंदावर आरूढ होणे होय.खरे तर, कर्म आणि श्रम यातून जीवन वेलीला प्रसन्नतेची फुले लागतात आणि ही श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. प्रभूची वाट पाहत प्रभू पूजेसाठी शबरीने आणलेली फुले पाहून रामाने विचारले, ‘ही फुले रात्रीच्या वेळीही एवढी प्रफुल्लित कशी?’ त्यावर शबरीने दिलेले उत्तर फार उद्बोधक आहे.ती म्हणाली, ‘प्रभू, फार वर्षांपूर्वी इथे मतंग ऋषींचा आश्रम होता. या ऋषींनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आश्रमात सरपण आणण्यासाठी साºया शिष्यांना सांगितले. पण कुणीच ऐकले नाही, शेवटी वयोवृद्ध ऋषी खांद्यावर कुºहाड टाकून सरपण आणायला निघाले. त्यांच्या पाठोपाठ सारे शिष्यही निघाले. दोन दिवस त्या सर्वांनी भरपूर श्रमदान केले. सरपण तोडताना हे अक्षरश: घामाघूम झाले. त्यांच्या श्रमाचे घाम या भूमीवर पडले आणि त्या घामाच्या बिंदूतून ही फुले जन्माला आली. म्हणून ती नित्य प्रफुल्लित राहिली. श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. ती स्वत:ही प्रफुल्लित असतात.