शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - घामाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:20 IST

गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते.

- डॉ. रामचंद्र देखणेगीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते. आपण नमस्काराची क्रिया करतो. पण त्या नमस्कारात आतून जर मन विनम्र झाले नसेल तर क्रिया व्यर्थ होय. विनोबाजींनी सुरेख दृष्टांत दिला आहे. शंकराच्या पिंडीवर धार धरून अभिषेक चालला आहे. पण चित्त जर अभिषेकामध्ये नसेल, ते जर दुसरीकडेच भरकटत असेल तर अभिषेक घडेल काय? अभिषेकाच्या जलधारेबरोबर मानसिक चिंतनाची धार अखंड ओतली जात असेल तरच त्या अभिषेकाला किंमत आहे. म्हणजेच चित्त ओतून केलेला अभिषेक हे नुसते अभिषेकाचे कर्म न राहता ते ‘विकर्म’ ठरेल आणि अशा बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग घडतो.हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल ते स्वधर्माचरण शुष्क राहील. त्याला निष्कामतेची फळे-फुले येणार नाहीत. अशा कर्मात विकर्म ओतले म्हणजे ‘अकर्म’ होते. कर्म सहजपणे बाहेर पडते. मुलावर प्रेम करणे, त्याला वाढविणे, पोसणे हे मातेचे सहजकर्म असते. तेच ‘अकर्म’ होय. माऊली ज्ञानदेव म्हणतात,‘‘अगा करितेन वीण कर्म ।तेचित ते नैष्कर्म्य ।’’ पुढे-पुढे तर या सहज कर्मातही कर्म करणारा मी आहे असा भावही न ठेवता जे कर्म घडते तेच ‘नैष्कर्म्य’ होय. कर्म, कर्मातून विकर्म, विकर्मातून अकर्म आणि पुढे नैष्कर्म्य स्थितीला जाणे म्हणजे कर्मातील आनंदाची एके क पायी गाठीत कर्मानंदावर आरूढ होणे होय.खरे तर, कर्म आणि श्रम यातून जीवन वेलीला प्रसन्नतेची फुले लागतात आणि ही श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. प्रभूची वाट पाहत प्रभू पूजेसाठी शबरीने आणलेली फुले पाहून रामाने विचारले, ‘ही फुले रात्रीच्या वेळीही एवढी प्रफुल्लित कशी?’ त्यावर शबरीने दिलेले उत्तर फार उद्बोधक आहे.ती म्हणाली, ‘प्रभू, फार वर्षांपूर्वी इथे मतंग ऋषींचा आश्रम होता. या ऋषींनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आश्रमात सरपण आणण्यासाठी साºया शिष्यांना सांगितले. पण कुणीच ऐकले नाही, शेवटी वयोवृद्ध ऋषी खांद्यावर कुºहाड टाकून सरपण आणायला निघाले. त्यांच्या पाठोपाठ सारे शिष्यही निघाले. दोन दिवस त्या सर्वांनी भरपूर श्रमदान केले. सरपण तोडताना हे अक्षरश: घामाघूम झाले. त्यांच्या श्रमाचे घाम या भूमीवर पडले आणि त्या घामाच्या बिंदूतून ही फुले जन्माला आली. म्हणून ती नित्य प्रफुल्लित राहिली. श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. ती स्वत:ही प्रफुल्लित असतात.