शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मनाचिये गुंथी - घामाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:20 IST

गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते.

- डॉ. रामचंद्र देखणेगीतेच्या चौथ्या अध्यायाच्या अनुषंगाने कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्थांचे चिंतन घडते; तर पाचव्या अध्यायात ‘नैष्कर्म्य’ अवस्थेचेही वर्णन केले आहे. कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया होय. या कर्मात चित्त ओतणे म्हणजे ‘विकर्म’ होय. म्हणजेच चित्तशोधनासाठी जी कर्मे करावयाची त्यांना गीता ‘विकर्म’ अशी संज्ञा देते. आपण नमस्काराची क्रिया करतो. पण त्या नमस्कारात आतून जर मन विनम्र झाले नसेल तर क्रिया व्यर्थ होय. विनोबाजींनी सुरेख दृष्टांत दिला आहे. शंकराच्या पिंडीवर धार धरून अभिषेक चालला आहे. पण चित्त जर अभिषेकामध्ये नसेल, ते जर दुसरीकडेच भरकटत असेल तर अभिषेक घडेल काय? अभिषेकाच्या जलधारेबरोबर मानसिक चिंतनाची धार अखंड ओतली जात असेल तरच त्या अभिषेकाला किंमत आहे. म्हणजेच चित्त ओतून केलेला अभिषेक हे नुसते अभिषेकाचे कर्म न राहता ते ‘विकर्म’ ठरेल आणि अशा बाह्य कर्माशी आतून चित्तशुद्धीचे कर्म जोडले गेले तर निष्काम कर्मयोग घडतो.हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल ते स्वधर्माचरण शुष्क राहील. त्याला निष्कामतेची फळे-फुले येणार नाहीत. अशा कर्मात विकर्म ओतले म्हणजे ‘अकर्म’ होते. कर्म सहजपणे बाहेर पडते. मुलावर प्रेम करणे, त्याला वाढविणे, पोसणे हे मातेचे सहजकर्म असते. तेच ‘अकर्म’ होय. माऊली ज्ञानदेव म्हणतात,‘‘अगा करितेन वीण कर्म ।तेचित ते नैष्कर्म्य ।’’ पुढे-पुढे तर या सहज कर्मातही कर्म करणारा मी आहे असा भावही न ठेवता जे कर्म घडते तेच ‘नैष्कर्म्य’ होय. कर्म, कर्मातून विकर्म, विकर्मातून अकर्म आणि पुढे नैष्कर्म्य स्थितीला जाणे म्हणजे कर्मातील आनंदाची एके क पायी गाठीत कर्मानंदावर आरूढ होणे होय.खरे तर, कर्म आणि श्रम यातून जीवन वेलीला प्रसन्नतेची फुले लागतात आणि ही श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. प्रभूची वाट पाहत प्रभू पूजेसाठी शबरीने आणलेली फुले पाहून रामाने विचारले, ‘ही फुले रात्रीच्या वेळीही एवढी प्रफुल्लित कशी?’ त्यावर शबरीने दिलेले उत्तर फार उद्बोधक आहे.ती म्हणाली, ‘प्रभू, फार वर्षांपूर्वी इथे मतंग ऋषींचा आश्रम होता. या ऋषींनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आश्रमात सरपण आणण्यासाठी साºया शिष्यांना सांगितले. पण कुणीच ऐकले नाही, शेवटी वयोवृद्ध ऋषी खांद्यावर कुºहाड टाकून सरपण आणायला निघाले. त्यांच्या पाठोपाठ सारे शिष्यही निघाले. दोन दिवस त्या सर्वांनी भरपूर श्रमदान केले. सरपण तोडताना हे अक्षरश: घामाघूम झाले. त्यांच्या श्रमाचे घाम या भूमीवर पडले आणि त्या घामाच्या बिंदूतून ही फुले जन्माला आली. म्हणून ती नित्य प्रफुल्लित राहिली. श्रमाची फुले नित्य प्रफुल्लित असतात. ती स्वत:ही प्रफुल्लित असतात.