शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

स्वामी : भाजपाचे अनियंत्रित क्षेपणास्त्र

By admin | Updated: June 25, 2016 02:38 IST

स्फोटक विधाने आणि बेलगाम आरोप ही भारतीय राजकारणातली सुब्रह्मण्यम स्वामी यांची विशेष ख्याती. भाजपाची खासदारकी मिळवल्यावर एक अनियंत्रित क्षेपणास्त्र अशी आता त्यांची नवी ओळख आहे

सुरेश भटेवरा, (राजकीय संपादक, लोकमत)स्फोटक विधाने आणि बेलगाम आरोप ही भारतीय राजकारणातली सुब्रह्मण्यम स्वामी यांची विशेष ख्याती. भाजपाची खासदारकी मिळवल्यावर एक अनियंत्रित क्षेपणास्त्र अशी आता त्यांची नवी ओळख आहे. पण त्यांचे खरे टार्गेट अर्थमंत्री अरूण जेटली आहेत व जेटली विरोधकांचे बळ त्यांच्या पाठीशी आहे. स्वामी आणि अरूण जेटली यांचे पूर्वीपासूनच संबंध चांगले नाहीत. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वामींना जेटलींच्या विरोधामुळे दिल्लीतून भाजपाची उमेदवारी मिळू शकली नाही. मोदी सरकारमध्ये अर्थ खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी त्यांना आशा होती. जेटलींच्या विरोधामुळे हा प्रयोगही फसला. तेव्हापासून स्वामींनी एकीकडे पंतप्रधान मोदींची तारीफ तर दुसरीकडे जेटलींच्या अर्थ मंत्रालयावर लागोपाठ हल्ले असे सत्र सुरू केले. पण जेटलींच्या इच्छेविरूध्द राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात अखेर स्वामी यशस्वी ठरले तेव्हा भाजपाच्या अंतर्गत राजकारणात बदलत्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. संसदेत सोनिया गांधींवर थेट आरोप करण्यासाठी स्वामींचा वापर होईल, या हेतूने त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व मोदींनी बहाल केले. तथापि ७६ वर्षांचे स्वामी दुधारी शस्त्रासारखे आहेत. दररोज नवा शत्रू बनवणे हा त्यांचा जुना छंद आहे. त्यांच्या उपद्व्यापी कृत्यांना मोदी सरकारने वेळीच लगाम घातला नाही तर विरोधकांपेक्षाही अधिक तीव्रतेने हे शस्त्र सरकारचा घात करील, या शक्यतेचे पुरेसे पुरावे स्वामींच्या अलीकडच्या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहेत. भूतकाळातले दाखले द्यायचे तर स्वामी ज्या ज्या पक्षांबरोबर होते, त्या तमाम पक्षांना त्यांनी पुरेपूर खड्ड्यात घातले. उदाहरणेच द्यायची तर १९७७ साली स्वामी मुंबईतून जनता पक्षाचे खासदार होते. अवघ्या २८ महिन्यात हा पक्ष सत्तेतून पायउतार झाला. नांगरधारी शेतकरी हे या पक्षाचे निशाण हाती घेतलेले ते एकटेच भारतात उरले. १९९९ साली वाजपेयींचे सरकार अवघ्या एक मताने सत्तेतून गेले. सरकार पाडण्यासाठी जयललिता आणि सोनियांची भेट घडवणारे मुख्य मध्यस्थ तेच होते. त्यापूर्वी जयललितांवरही स्वामींनी बऱ्याच आरोपांचे कुभांड रचले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये स्वामींना आयुष्यात प्रथमच केंद्रीय मंत्रिपद मिळाले ते केवळ या सरकारला असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे. अवघे १00 दिवस हे सरकार टिकले. त्यानंतर राज्यसभेत शिरण्यासाठी स्वामींना काँग्रेसचे सहकार्य हवे होते. ते मिळाले नाही म्हणून सोनिया गांधींशी त्यांनी उभा दावा मांडला. काँग्रेसचे त्यामुळे काही बिघडले नाही. राजकीय नेता कसा नसावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे सुब्रह्मण्यम स्वामी. विरोधकांवर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले करण्यासाठी सध्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे माध्यम त्यांनी निवडले आहे. याखेरीज कट्टरपंथी हिंदुत्ववादी असा स्वामींचा नवा अवतार आहे. अयोध्येत राम मंदीर उभारण्याच्या जुन्या मोहिमेचे सध्या ते स्वयंघोषित नेते आहेत. सोशल मीडियावर तासनतास आपल्या विकृतींची भूक भागविणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना म्हणूनच स्वामी आपले हिरोे वाटतात. स्वामींनी आसारामबापूंच्या समर्थकांचे पाठबळ आपल्याला मिळावे म्हणून अनेक आरोपांचा सामना करणाऱ्या आसारामबापूंचीही यापूर्वी पाठराखण केली आहे. थोडक्यात स्वामी अ‍ॅसेट ऐवजी लायबिलिटी अधिक आहेत.रघुराम राजन यांच्या मुदतवाढीचा विषय संपुष्टात आल्यानंतर स्वामींनी अचानक अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर हल्ला चढवला. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी सुब्रह्मण्यम यांची अथवा त्यांनी सुचवलेल्या व्यक्तीची नियुक्ती होऊ नये हा बहुदा स्वामींचा त्यामागे हेतू असावा. या पदाच्या स्पर्धेत तूर्त अरूंधती भट्टाचार्याचे नाव पुढे आहे. त्याचे श्रेयही बहुदा स्वामीच घेतील. राजन यांच्या नकारामुळे मोदी सरकारच्या तटबंदीची पहिली वीट ढासळली. नादान की दोस्ती जानका खतरा....! या उक्तीनुसार न जाणो भविष्यात मोदी सरकारला भगदाड पाडण्यातही स्वामींचे अनगाईडेड मिसाईलच कारणीभूत ठरेल.