शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सरकार टिकणं.. सरकार कोसळणं.. सब मोहमाया है !

By सचिन जवळकोटे | Updated: December 11, 2020 06:53 IST

Political News : हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या.. इंद्रांनी नारदाला आदेश दिला.

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर) 

इंद्र महाराजांनी नारदाला ‘झूम कॉल’ केला; तेव्हा तिकडून ‘पडलंऽऽ कोसळलंऽऽ... वाचलंऽऽ टिकलंऽऽ’ असले काहीतरी असंबद्ध शब्द कानावर पडू लागले. महाराज दचकले. तेव्हा गडबडून जात नारद उत्तरले, ‘मी मंत्रालयाजवळून बोलतोय. गेल्या एक वर्षापासून असेच संवाद महाराष्ट्रात ऐकू येताहेत. उजव्या कानात पडलं असं ऐकू येतं, तर डाव्या कानात टिकलं असं.’ ‘मग हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर नेमकं कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या. वाटल्यास हातात बूम घेऊन चॅनलवाले पत्रकार बना.  माईकचे स्वामी बना.’ हे ऐकताच चेहरा कसाबसा करत मुनी म्हणाले, ‘स्वामी नको अन्‌ गोस्वामीही. ‘आत’ बसायची सवय नाही मला. मी असाच फिरतो.’...मग नारद  ‘रौतां’ना भेटायला गेले. ‘संजयराव आहेत काय ? हे सरकार कुणामुळं टिकलं हे विचारायचंय मला,’ ..पेनमध्ये शाई भरत त्यांचा शिपाई ठसक्यात उत्तरला, ‘माझ्यामुळंच टिकलं की. मी दिलेल्या पेनमधून ते जे लिहीत गेले, त्यामुळं आमच्या साहेबांच्या साहेबांना ताकद मिळाली. त्यामुळंच सरकार टिकलं.’आता याच्या ‘साहेबांचे साहेब’ म्हणजे उद्धो की थोरले काका, यावर डोकं खाजवत नारद मुनी गायकवाडांच्या ‘वर्षा’ताईंकडे गेले.  ‘मी आठ-नऊ महिने शाळेची घंटा वाजू दिली नाही म्हणून सरकारच्या धोक्याची घंटा वाजली नाही. माझ्यामुळंच सरकार वाचलं’, हे ताईंचं गणित काही मुनींना पटलं नाही. शेजारीच उभारलेल्या ‘बच्चूभाऊं’नाही आवडलं नाही. आजकाल ‘ताईं’चे अनेक निर्णय ‘भाऊं’ना आवडत नाहीत हा भाग वेगळा. मुनी तिथून ‘अजितदादां’कडं गेले. ‘साठीनंतरची राजकीय प्रगल्भता अन्‌ सार्वजनिक भाषणातली सभ्यता’ हे पुस्तक मन लावून वाचण्यात ‘दादा’ दंग होते. त्यांना विचारलं, तरीही ते गप्पच राहिले. खूप काही बोलायचं होतं, तरीही ते तोंड मिटून चूप राहिले. वर्षभरातल्या त्यांच्या  ‘मौना’तच मुनींना सरकार टिकण्याचं उत्तर सापडलं. ते मग ‘मातोश्री’वर गेले. तिथं ‘लाईव्ह’ची तयारी सुरू होती. सिंहासनासमोर कायमस्वरूपी लावलेल्या कॅमेऱ्याची साफसफाई करत फोटोग्राफर राजेश पुटपुटला, ‘मी रोज इथं व्यवस्थित लाईव्ह करतोय म्हणूनच सरकार टिकलंय.’मग नारद ‘देवेंद्रपंतां’कडं गेले. तिथं एक टेलर जाकिटांच्या बिलाची लिस्ट घेऊन उभा होता. ‘गेल्या वर्षभरापासून दर महिन्याला माझ्याकडून नवीन शपथविधीचे जाकीट शिवून घेतले गेलेत.  बिनकामाचा ताप.’ टेलरचा सात्विक  संताप पाहून नारदांनी मग तिथून काढता पाय घेतला. ‘चंदूदादा कोथरूडकरां’ची भेट घेतली. ते मोबाईलवर ‘कोल्हापूरचे मुश्रीफभाई आज आपल्याबद्दल अजून नवीन काय-काय बोलले,’ याची विचारणा करत होते. ‘सरकार कधी पडणार?’ या मुनींच्या प्रश्नावर त्रासून दादा म्हणाले, ‘अगोदर विधानपरिषदेला आमची माणसं का पडली, याचा शोध घेऊ द्या.. मग नंतर बघूऽऽ’नारदांना वाटेत ‘रामदास’ भेटले. दाढी खाजवताना नेहमीप्रमाणं त्यांना कवितेचे चार शब्द  आठवले, ‘सरकार पाडने के वास्ते मुंबै में जंत्री.. दिल्ली में बैठकू, मै खाता निवांत संत्री!’ अखेर कंटाळून मुनी बारामतीला पोहोचले. बंगल्याबाहेर  ‘थोरले काकां’चा पीए उभारला होता. मुनींच्या आगमनाचा हेतू अगोदरच त्याला समजला होता. त्यानं त्याचा अंदाज घेतला. छाती पुढं काढून हळूच सांगितलं, ‘हे सरकार पडलं तर माझ्यामुळंच पडणार. मी जर रोजच्या रोज साहेबांचा मोबाईल चार्जिंग करून ठेवला नाही तर तो बंद पडणार. मग रौतांचा संपर्क तुटणार. कोणत्या फायलीवर कशा सह्या करायच्या हे सीएमना नाही कळणार. सगळा गोंधळ उडणार... अशी सगळी परिस्थिती होणार अन्‌ सरकार धपाऽऽकदिशी पडणार.’  या अचाट गोष्टीवर अवाक्‌ होत मुनींनी थेट इंद्रांना झूम कॉल केला, ‘महाराऽऽज, हे सरकार ज्यांनी अस्तित्वात आणलं ते थोरले काकाच... अन्‌ हे सरकार पाडूही शकतील तेही केवळ थोरले काकाच. हेच या सृष्टीतील अंतिम सत्य. बाकी सब मोहमाया. नारायणऽऽ नारायणऽऽ’   

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारण