शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सरकार टिकणं.. सरकार कोसळणं.. सब मोहमाया है !

By सचिन जवळकोटे | Updated: December 11, 2020 06:53 IST

Political News : हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या.. इंद्रांनी नारदाला आदेश दिला.

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर) 

इंद्र महाराजांनी नारदाला ‘झूम कॉल’ केला; तेव्हा तिकडून ‘पडलंऽऽ कोसळलंऽऽ... वाचलंऽऽ टिकलंऽऽ’ असले काहीतरी असंबद्ध शब्द कानावर पडू लागले. महाराज दचकले. तेव्हा गडबडून जात नारद उत्तरले, ‘मी मंत्रालयाजवळून बोलतोय. गेल्या एक वर्षापासून असेच संवाद महाराष्ट्रात ऐकू येताहेत. उजव्या कानात पडलं असं ऐकू येतं, तर डाव्या कानात टिकलं असं.’ ‘मग हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर नेमकं कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या. वाटल्यास हातात बूम घेऊन चॅनलवाले पत्रकार बना.  माईकचे स्वामी बना.’ हे ऐकताच चेहरा कसाबसा करत मुनी म्हणाले, ‘स्वामी नको अन्‌ गोस्वामीही. ‘आत’ बसायची सवय नाही मला. मी असाच फिरतो.’...मग नारद  ‘रौतां’ना भेटायला गेले. ‘संजयराव आहेत काय ? हे सरकार कुणामुळं टिकलं हे विचारायचंय मला,’ ..पेनमध्ये शाई भरत त्यांचा शिपाई ठसक्यात उत्तरला, ‘माझ्यामुळंच टिकलं की. मी दिलेल्या पेनमधून ते जे लिहीत गेले, त्यामुळं आमच्या साहेबांच्या साहेबांना ताकद मिळाली. त्यामुळंच सरकार टिकलं.’आता याच्या ‘साहेबांचे साहेब’ म्हणजे उद्धो की थोरले काका, यावर डोकं खाजवत नारद मुनी गायकवाडांच्या ‘वर्षा’ताईंकडे गेले.  ‘मी आठ-नऊ महिने शाळेची घंटा वाजू दिली नाही म्हणून सरकारच्या धोक्याची घंटा वाजली नाही. माझ्यामुळंच सरकार वाचलं’, हे ताईंचं गणित काही मुनींना पटलं नाही. शेजारीच उभारलेल्या ‘बच्चूभाऊं’नाही आवडलं नाही. आजकाल ‘ताईं’चे अनेक निर्णय ‘भाऊं’ना आवडत नाहीत हा भाग वेगळा. मुनी तिथून ‘अजितदादां’कडं गेले. ‘साठीनंतरची राजकीय प्रगल्भता अन्‌ सार्वजनिक भाषणातली सभ्यता’ हे पुस्तक मन लावून वाचण्यात ‘दादा’ दंग होते. त्यांना विचारलं, तरीही ते गप्पच राहिले. खूप काही बोलायचं होतं, तरीही ते तोंड मिटून चूप राहिले. वर्षभरातल्या त्यांच्या  ‘मौना’तच मुनींना सरकार टिकण्याचं उत्तर सापडलं. ते मग ‘मातोश्री’वर गेले. तिथं ‘लाईव्ह’ची तयारी सुरू होती. सिंहासनासमोर कायमस्वरूपी लावलेल्या कॅमेऱ्याची साफसफाई करत फोटोग्राफर राजेश पुटपुटला, ‘मी रोज इथं व्यवस्थित लाईव्ह करतोय म्हणूनच सरकार टिकलंय.’मग नारद ‘देवेंद्रपंतां’कडं गेले. तिथं एक टेलर जाकिटांच्या बिलाची लिस्ट घेऊन उभा होता. ‘गेल्या वर्षभरापासून दर महिन्याला माझ्याकडून नवीन शपथविधीचे जाकीट शिवून घेतले गेलेत.  बिनकामाचा ताप.’ टेलरचा सात्विक  संताप पाहून नारदांनी मग तिथून काढता पाय घेतला. ‘चंदूदादा कोथरूडकरां’ची भेट घेतली. ते मोबाईलवर ‘कोल्हापूरचे मुश्रीफभाई आज आपल्याबद्दल अजून नवीन काय-काय बोलले,’ याची विचारणा करत होते. ‘सरकार कधी पडणार?’ या मुनींच्या प्रश्नावर त्रासून दादा म्हणाले, ‘अगोदर विधानपरिषदेला आमची माणसं का पडली, याचा शोध घेऊ द्या.. मग नंतर बघूऽऽ’नारदांना वाटेत ‘रामदास’ भेटले. दाढी खाजवताना नेहमीप्रमाणं त्यांना कवितेचे चार शब्द  आठवले, ‘सरकार पाडने के वास्ते मुंबै में जंत्री.. दिल्ली में बैठकू, मै खाता निवांत संत्री!’ अखेर कंटाळून मुनी बारामतीला पोहोचले. बंगल्याबाहेर  ‘थोरले काकां’चा पीए उभारला होता. मुनींच्या आगमनाचा हेतू अगोदरच त्याला समजला होता. त्यानं त्याचा अंदाज घेतला. छाती पुढं काढून हळूच सांगितलं, ‘हे सरकार पडलं तर माझ्यामुळंच पडणार. मी जर रोजच्या रोज साहेबांचा मोबाईल चार्जिंग करून ठेवला नाही तर तो बंद पडणार. मग रौतांचा संपर्क तुटणार. कोणत्या फायलीवर कशा सह्या करायच्या हे सीएमना नाही कळणार. सगळा गोंधळ उडणार... अशी सगळी परिस्थिती होणार अन्‌ सरकार धपाऽऽकदिशी पडणार.’  या अचाट गोष्टीवर अवाक्‌ होत मुनींनी थेट इंद्रांना झूम कॉल केला, ‘महाराऽऽज, हे सरकार ज्यांनी अस्तित्वात आणलं ते थोरले काकाच... अन्‌ हे सरकार पाडूही शकतील तेही केवळ थोरले काकाच. हेच या सृष्टीतील अंतिम सत्य. बाकी सब मोहमाया. नारायणऽऽ नारायणऽऽ’   

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारण