शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सरकार टिकणं.. सरकार कोसळणं.. सब मोहमाया है !

By सचिन जवळकोटे | Updated: December 11, 2020 06:53 IST

Political News : हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या.. इंद्रांनी नारदाला आदेश दिला.

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर) 

इंद्र महाराजांनी नारदाला ‘झूम कॉल’ केला; तेव्हा तिकडून ‘पडलंऽऽ कोसळलंऽऽ... वाचलंऽऽ टिकलंऽऽ’ असले काहीतरी असंबद्ध शब्द कानावर पडू लागले. महाराज दचकले. तेव्हा गडबडून जात नारद उत्तरले, ‘मी मंत्रालयाजवळून बोलतोय. गेल्या एक वर्षापासून असेच संवाद महाराष्ट्रात ऐकू येताहेत. उजव्या कानात पडलं असं ऐकू येतं, तर डाव्या कानात टिकलं असं.’ ‘मग हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर नेमकं कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या. वाटल्यास हातात बूम घेऊन चॅनलवाले पत्रकार बना.  माईकचे स्वामी बना.’ हे ऐकताच चेहरा कसाबसा करत मुनी म्हणाले, ‘स्वामी नको अन्‌ गोस्वामीही. ‘आत’ बसायची सवय नाही मला. मी असाच फिरतो.’...मग नारद  ‘रौतां’ना भेटायला गेले. ‘संजयराव आहेत काय ? हे सरकार कुणामुळं टिकलं हे विचारायचंय मला,’ ..पेनमध्ये शाई भरत त्यांचा शिपाई ठसक्यात उत्तरला, ‘माझ्यामुळंच टिकलं की. मी दिलेल्या पेनमधून ते जे लिहीत गेले, त्यामुळं आमच्या साहेबांच्या साहेबांना ताकद मिळाली. त्यामुळंच सरकार टिकलं.’आता याच्या ‘साहेबांचे साहेब’ म्हणजे उद्धो की थोरले काका, यावर डोकं खाजवत नारद मुनी गायकवाडांच्या ‘वर्षा’ताईंकडे गेले.  ‘मी आठ-नऊ महिने शाळेची घंटा वाजू दिली नाही म्हणून सरकारच्या धोक्याची घंटा वाजली नाही. माझ्यामुळंच सरकार वाचलं’, हे ताईंचं गणित काही मुनींना पटलं नाही. शेजारीच उभारलेल्या ‘बच्चूभाऊं’नाही आवडलं नाही. आजकाल ‘ताईं’चे अनेक निर्णय ‘भाऊं’ना आवडत नाहीत हा भाग वेगळा. मुनी तिथून ‘अजितदादां’कडं गेले. ‘साठीनंतरची राजकीय प्रगल्भता अन्‌ सार्वजनिक भाषणातली सभ्यता’ हे पुस्तक मन लावून वाचण्यात ‘दादा’ दंग होते. त्यांना विचारलं, तरीही ते गप्पच राहिले. खूप काही बोलायचं होतं, तरीही ते तोंड मिटून चूप राहिले. वर्षभरातल्या त्यांच्या  ‘मौना’तच मुनींना सरकार टिकण्याचं उत्तर सापडलं. ते मग ‘मातोश्री’वर गेले. तिथं ‘लाईव्ह’ची तयारी सुरू होती. सिंहासनासमोर कायमस्वरूपी लावलेल्या कॅमेऱ्याची साफसफाई करत फोटोग्राफर राजेश पुटपुटला, ‘मी रोज इथं व्यवस्थित लाईव्ह करतोय म्हणूनच सरकार टिकलंय.’मग नारद ‘देवेंद्रपंतां’कडं गेले. तिथं एक टेलर जाकिटांच्या बिलाची लिस्ट घेऊन उभा होता. ‘गेल्या वर्षभरापासून दर महिन्याला माझ्याकडून नवीन शपथविधीचे जाकीट शिवून घेतले गेलेत.  बिनकामाचा ताप.’ टेलरचा सात्विक  संताप पाहून नारदांनी मग तिथून काढता पाय घेतला. ‘चंदूदादा कोथरूडकरां’ची भेट घेतली. ते मोबाईलवर ‘कोल्हापूरचे मुश्रीफभाई आज आपल्याबद्दल अजून नवीन काय-काय बोलले,’ याची विचारणा करत होते. ‘सरकार कधी पडणार?’ या मुनींच्या प्रश्नावर त्रासून दादा म्हणाले, ‘अगोदर विधानपरिषदेला आमची माणसं का पडली, याचा शोध घेऊ द्या.. मग नंतर बघूऽऽ’नारदांना वाटेत ‘रामदास’ भेटले. दाढी खाजवताना नेहमीप्रमाणं त्यांना कवितेचे चार शब्द  आठवले, ‘सरकार पाडने के वास्ते मुंबै में जंत्री.. दिल्ली में बैठकू, मै खाता निवांत संत्री!’ अखेर कंटाळून मुनी बारामतीला पोहोचले. बंगल्याबाहेर  ‘थोरले काकां’चा पीए उभारला होता. मुनींच्या आगमनाचा हेतू अगोदरच त्याला समजला होता. त्यानं त्याचा अंदाज घेतला. छाती पुढं काढून हळूच सांगितलं, ‘हे सरकार पडलं तर माझ्यामुळंच पडणार. मी जर रोजच्या रोज साहेबांचा मोबाईल चार्जिंग करून ठेवला नाही तर तो बंद पडणार. मग रौतांचा संपर्क तुटणार. कोणत्या फायलीवर कशा सह्या करायच्या हे सीएमना नाही कळणार. सगळा गोंधळ उडणार... अशी सगळी परिस्थिती होणार अन्‌ सरकार धपाऽऽकदिशी पडणार.’  या अचाट गोष्टीवर अवाक्‌ होत मुनींनी थेट इंद्रांना झूम कॉल केला, ‘महाराऽऽज, हे सरकार ज्यांनी अस्तित्वात आणलं ते थोरले काकाच... अन्‌ हे सरकार पाडूही शकतील तेही केवळ थोरले काकाच. हेच या सृष्टीतील अंतिम सत्य. बाकी सब मोहमाया. नारायणऽऽ नारायणऽऽ’   

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारण