शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यातील घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 03:40 IST

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता यातून वांद्रे येथील सरकारी वसाहतीत एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवल्याची घटना सुन्न करणारी आहे. मुंबईसारख्या महानगरात एकीकडे उंच इमले आणि अब्जाधीशांची वाढती संख्या दिसत असली, तरी त्याखाली रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्यांच्या किंवा फक्त एकाच्याच नोकरीवर चालणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्याचा डोलारा किती पोकळ होत चालला आहे, याचे भीषण वास्तव समोर आणणारी आहे. महागडे होत गेलेले, तरीही जगण्यासाठी उपयोगी न पडणारे शिक्षण; उच्च शिक्षणानंतरही नोकरीची भ्रांत, सध्या असलेल्या नोकºया किती टिकतील याबद्दलची अनिश्चितता, परवडणाºया घरांचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले स्वप्न यातून जगण्यावर उदासीनतेची दाट छाया पसरलेली आहे. जवळपास ३५ टक्के मुंबईकर अशा निराशेच्या गर्तेत हेलकावे घेत असल्याची आकडेवारी मध्यंतरी समोर आली होती. त्यातून मुंबापुरीच नव्हे, तर तिच्या परिघातील सारी महानगरे ओढग्रस्तीचे, तणावाखालील जीवन जगत असल्याचे ढळढळीत वास्तव उघड झाले होते. असह्य होत असलेल्या धावपळीत कुटुंबातील सदस्यांचीच चौकशी करण्याइतकी फुरसत नसल्याने परस्परांची चौकशी करून धीर देणे, संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलासा देणे, ‘हेही दिवस जातील,’ असे सांगत सांत्वन करण्यासाठी हक्काचे कोणी नसल्याने जगण्यातील ही घुसमट साचत जाते. ती असह्य झाल्यावर आयुष्य संपवण्याच्या वळणावर घेऊन जाते. आत्महत्या हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही, हे पटत असूनही भविष्यात जर अंधकार दिसत असेल तर कोणत्या आशेच्या किरणाकडे पाहून दिवस ढकलायचे, याचा मार्ग सापडत नाही. वांद्रे येथील कुटुंबातील कर्ता सरकारी नोकरीत असला आणि पत्नी दळणाच्या कामातून कुटुंबाला हातभार लावत असली, तरी त्यातून मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही ही खंत, दुसºया मुलाचे शिक्षण; दोन्ही मुलांच्या भविष्याची पोखरत गेलेली चिंता यातून कुटुंबाने आयुष्यच खुडून टाकले. प्रामाणिकपणे नोकरी करून आयुष्यातले अनेक प्रश्न सुटत नाहीत, अशी काहीशी अवस्था या कुटुंबाची झाली. आहे त्या स्थितीत जगता येत नाही आणि परिस्थिती आमूलाग्र बदलेल असा कोणता मार्ग समोर दिसत नाही, अशा कोंडीत हे कुटुंब सापडले. त्यातून शहरी मध्यमवर्गीयांची जगण्याची कमी होत गेलेली उमेद, क्षीण होत गेलेली सहनशक्ती, मनाची ढासळलेली ताकद यामुळे कचकड्याच्या बनलेल्या जगण्यावर दाटलेले हे मळभ परस्परांच्या सहकार्यानेच दूर करण्याची गरज आहे.