शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

जगण्यातील घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 03:40 IST

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता यातून वांद्रे येथील सरकारी वसाहतीत एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवल्याची घटना सुन्न करणारी आहे. मुंबईसारख्या महानगरात एकीकडे उंच इमले आणि अब्जाधीशांची वाढती संख्या दिसत असली, तरी त्याखाली रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्यांच्या किंवा फक्त एकाच्याच नोकरीवर चालणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्याचा डोलारा किती पोकळ होत चालला आहे, याचे भीषण वास्तव समोर आणणारी आहे. महागडे होत गेलेले, तरीही जगण्यासाठी उपयोगी न पडणारे शिक्षण; उच्च शिक्षणानंतरही नोकरीची भ्रांत, सध्या असलेल्या नोकºया किती टिकतील याबद्दलची अनिश्चितता, परवडणाºया घरांचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले स्वप्न यातून जगण्यावर उदासीनतेची दाट छाया पसरलेली आहे. जवळपास ३५ टक्के मुंबईकर अशा निराशेच्या गर्तेत हेलकावे घेत असल्याची आकडेवारी मध्यंतरी समोर आली होती. त्यातून मुंबापुरीच नव्हे, तर तिच्या परिघातील सारी महानगरे ओढग्रस्तीचे, तणावाखालील जीवन जगत असल्याचे ढळढळीत वास्तव उघड झाले होते. असह्य होत असलेल्या धावपळीत कुटुंबातील सदस्यांचीच चौकशी करण्याइतकी फुरसत नसल्याने परस्परांची चौकशी करून धीर देणे, संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलासा देणे, ‘हेही दिवस जातील,’ असे सांगत सांत्वन करण्यासाठी हक्काचे कोणी नसल्याने जगण्यातील ही घुसमट साचत जाते. ती असह्य झाल्यावर आयुष्य संपवण्याच्या वळणावर घेऊन जाते. आत्महत्या हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही, हे पटत असूनही भविष्यात जर अंधकार दिसत असेल तर कोणत्या आशेच्या किरणाकडे पाहून दिवस ढकलायचे, याचा मार्ग सापडत नाही. वांद्रे येथील कुटुंबातील कर्ता सरकारी नोकरीत असला आणि पत्नी दळणाच्या कामातून कुटुंबाला हातभार लावत असली, तरी त्यातून मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही ही खंत, दुसºया मुलाचे शिक्षण; दोन्ही मुलांच्या भविष्याची पोखरत गेलेली चिंता यातून कुटुंबाने आयुष्यच खुडून टाकले. प्रामाणिकपणे नोकरी करून आयुष्यातले अनेक प्रश्न सुटत नाहीत, अशी काहीशी अवस्था या कुटुंबाची झाली. आहे त्या स्थितीत जगता येत नाही आणि परिस्थिती आमूलाग्र बदलेल असा कोणता मार्ग समोर दिसत नाही, अशा कोंडीत हे कुटुंब सापडले. त्यातून शहरी मध्यमवर्गीयांची जगण्याची कमी होत गेलेली उमेद, क्षीण होत गेलेली सहनशक्ती, मनाची ढासळलेली ताकद यामुळे कचकड्याच्या बनलेल्या जगण्यावर दाटलेले हे मळभ परस्परांच्या सहकार्यानेच दूर करण्याची गरज आहे.