शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यातील घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 03:40 IST

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता

आयुष्यभर नोकरी करूनही स्वत:चे घर घेता न आल्याची खंत आणि पुरेसे शिक्षण दिल्यानंतरही मुलांच्या भविष्याची सतावणारी चिंता यातून वांद्रे येथील सरकारी वसाहतीत एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवल्याची घटना सुन्न करणारी आहे. मुंबईसारख्या महानगरात एकीकडे उंच इमले आणि अब्जाधीशांची वाढती संख्या दिसत असली, तरी त्याखाली रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्यांच्या किंवा फक्त एकाच्याच नोकरीवर चालणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्याचा डोलारा किती पोकळ होत चालला आहे, याचे भीषण वास्तव समोर आणणारी आहे. महागडे होत गेलेले, तरीही जगण्यासाठी उपयोगी न पडणारे शिक्षण; उच्च शिक्षणानंतरही नोकरीची भ्रांत, सध्या असलेल्या नोकºया किती टिकतील याबद्दलची अनिश्चितता, परवडणाºया घरांचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले स्वप्न यातून जगण्यावर उदासीनतेची दाट छाया पसरलेली आहे. जवळपास ३५ टक्के मुंबईकर अशा निराशेच्या गर्तेत हेलकावे घेत असल्याची आकडेवारी मध्यंतरी समोर आली होती. त्यातून मुंबापुरीच नव्हे, तर तिच्या परिघातील सारी महानगरे ओढग्रस्तीचे, तणावाखालील जीवन जगत असल्याचे ढळढळीत वास्तव उघड झाले होते. असह्य होत असलेल्या धावपळीत कुटुंबातील सदस्यांचीच चौकशी करण्याइतकी फुरसत नसल्याने परस्परांची चौकशी करून धीर देणे, संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलासा देणे, ‘हेही दिवस जातील,’ असे सांगत सांत्वन करण्यासाठी हक्काचे कोणी नसल्याने जगण्यातील ही घुसमट साचत जाते. ती असह्य झाल्यावर आयुष्य संपवण्याच्या वळणावर घेऊन जाते. आत्महत्या हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही, हे पटत असूनही भविष्यात जर अंधकार दिसत असेल तर कोणत्या आशेच्या किरणाकडे पाहून दिवस ढकलायचे, याचा मार्ग सापडत नाही. वांद्रे येथील कुटुंबातील कर्ता सरकारी नोकरीत असला आणि पत्नी दळणाच्या कामातून कुटुंबाला हातभार लावत असली, तरी त्यातून मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही ही खंत, दुसºया मुलाचे शिक्षण; दोन्ही मुलांच्या भविष्याची पोखरत गेलेली चिंता यातून कुटुंबाने आयुष्यच खुडून टाकले. प्रामाणिकपणे नोकरी करून आयुष्यातले अनेक प्रश्न सुटत नाहीत, अशी काहीशी अवस्था या कुटुंबाची झाली. आहे त्या स्थितीत जगता येत नाही आणि परिस्थिती आमूलाग्र बदलेल असा कोणता मार्ग समोर दिसत नाही, अशा कोंडीत हे कुटुंब सापडले. त्यातून शहरी मध्यमवर्गीयांची जगण्याची कमी होत गेलेली उमेद, क्षीण होत गेलेली सहनशक्ती, मनाची ढासळलेली ताकद यामुळे कचकड्याच्या बनलेल्या जगण्यावर दाटलेले हे मळभ परस्परांच्या सहकार्यानेच दूर करण्याची गरज आहे.