शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सर्जिकल स्ट्राइक हा अंतिम पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:50 IST

एअर सर्जिकल स्ट्राइक यशस्वी झाले, हे अभिनंदनीय आहे़ तरी भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने अंतिम आणि निर्णायक नाही, हे लक्षात घेतले ...

एअर सर्जिकल स्ट्राइक यशस्वी झाले, हे अभिनंदनीय आहे़ तरी भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने अंतिम आणि निर्णायक नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. भारत-पाक दरम्यानचा हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न राजकीय मार्गानेच सोडविला, तर अंतिम निर्णय प्राप्त होऊ शकतो आणि त्याकरिता अपेक्षित प्रयत्न झाले पाहिजेत़ गेल्या अनेक वर्षांपासून भारत-पाक दरम्यान बॉक्सिंगचा खेळ सुरू असून सारे विश्व त्यांचे अंपायर आहे, ही परिस्थिती अशीच चालू राहाणार नाही, याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सन १९७१ नंतर भारताने एलओसी दरम्यान ही कारवाई केली आहे. त्यावर पाकिस्तान आता प्रत्युत्तर कारवाई करणार, हे स्वाभाविक आहे. तशी तयारी भारतानेही करायला हवी, परंतु या सर्व परिस्थितीत देशातील जनतेला, विशेषत: सीमा भागातील जनतेला जे भोगावे लागते, त्याचा विचार करून अंतिम निर्णयास आणि तेही राजकीय मार्गाने पोहोचणे अत्यावश्यक आहे, तरच दोन्ही देशांतील नागरिकांचा नाहक बळी जाणार नाही. भारत-पाक उभय देशांत सुसंवाद साधण्यासाठी भारत-पाक शांतता मैत्री समितीचा एक प्रयत्न झाला आहे. त्याला यश येण्यासाठी काही काळ द्यावा लागेल, परंतु हा प्रयत्न उभय देशांनी संहारापेक्षा संवादाला महत्त्व देऊन राजकीय पाठबळाने केल्यास नक्की फरक पडू शकेल़

यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उभय देशांकडे अतिसंहारक शस्त्र आहेत, याचा विचार उभय देशांनी गांभीर्याने करणे आवश्यक आहे. ती वापरावी लागूच नयेत, याकरिता आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत़- एल.रामदास,माजी नौदल प्रमुख