शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

सर्जिकल स्ट्राइक हा अंतिम पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:50 IST

एअर सर्जिकल स्ट्राइक यशस्वी झाले, हे अभिनंदनीय आहे़ तरी भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने अंतिम आणि निर्णायक नाही, हे लक्षात घेतले ...

एअर सर्जिकल स्ट्राइक यशस्वी झाले, हे अभिनंदनीय आहे़ तरी भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने अंतिम आणि निर्णायक नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. भारत-पाक दरम्यानचा हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न राजकीय मार्गानेच सोडविला, तर अंतिम निर्णय प्राप्त होऊ शकतो आणि त्याकरिता अपेक्षित प्रयत्न झाले पाहिजेत़ गेल्या अनेक वर्षांपासून भारत-पाक दरम्यान बॉक्सिंगचा खेळ सुरू असून सारे विश्व त्यांचे अंपायर आहे, ही परिस्थिती अशीच चालू राहाणार नाही, याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सन १९७१ नंतर भारताने एलओसी दरम्यान ही कारवाई केली आहे. त्यावर पाकिस्तान आता प्रत्युत्तर कारवाई करणार, हे स्वाभाविक आहे. तशी तयारी भारतानेही करायला हवी, परंतु या सर्व परिस्थितीत देशातील जनतेला, विशेषत: सीमा भागातील जनतेला जे भोगावे लागते, त्याचा विचार करून अंतिम निर्णयास आणि तेही राजकीय मार्गाने पोहोचणे अत्यावश्यक आहे, तरच दोन्ही देशांतील नागरिकांचा नाहक बळी जाणार नाही. भारत-पाक उभय देशांत सुसंवाद साधण्यासाठी भारत-पाक शांतता मैत्री समितीचा एक प्रयत्न झाला आहे. त्याला यश येण्यासाठी काही काळ द्यावा लागेल, परंतु हा प्रयत्न उभय देशांनी संहारापेक्षा संवादाला महत्त्व देऊन राजकीय पाठबळाने केल्यास नक्की फरक पडू शकेल़

यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उभय देशांकडे अतिसंहारक शस्त्र आहेत, याचा विचार उभय देशांनी गांभीर्याने करणे आवश्यक आहे. ती वापरावी लागूच नयेत, याकरिता आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत़- एल.रामदास,माजी नौदल प्रमुख