शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

सुपंथीयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:45 IST

पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आपल्या हक्काच्या ठेवी मिळाव्यात यासाठी गेल्या 10 वर्षापासून लढा देणा:या शेकडो ठेवीदारांच्या जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय सहकार परिषद झाली. जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारतीतर्फे आयोजित या परिषदेस बँकींग क्षेत्रात येऊ घातलेले मोठे बदल, बदलते तंत्रज्ञान व नागरी सहकारी बँकांपुढील आव्हाने यावर विचार मंथन झाले. देशभरातील सहकार ...

पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आपल्या हक्काच्या ठेवी मिळाव्यात यासाठी गेल्या 10 वर्षापासून लढा देणा:या शेकडो ठेवीदारांच्या जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय सहकार परिषद झाली. जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारतीतर्फे आयोजित या परिषदेस बँकींग क्षेत्रात येऊ घातलेले मोठे बदल, बदलते तंत्रज्ञान व नागरी सहकारी बँकांपुढील आव्हाने यावर विचार मंथन झाले. देशभरातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले. नागरी सहकारी बँकांचे धोक्यात आलेल्या अस्तित्वाबाबत सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. बँकींग क्षेत्रात लवकच मोठे फेरबदल होणार आहेत. फायनान्स रिसोर्स अॅण्ड डिपॉङिाट इन्शुरन्स (एफआरडीआय)बिल येत आहे.  त्यामुळे जो सक्षम असेल, तोच टिकेल, अशी परिस्थिती राहील. त्यासाठी राष्ट्रीय नागरी सहकारी बँकांमध्ये लहान व मोठय़ा दोन्ही बँकांची गरज भागवेल अशी रिझव्र्ह बँकेच्या सहकार्याने राष्ट्रीयस्तरावरील शिखर संस्था (अम्ब्रेला) स्थापन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रय} सुरु असून रिझव्र्ह बँकेला प्रस्तावही दिला आहे. युरोप-अमेरिकेतही असे अम्ब्रेला आहेत. तसा भारतात असावा, अशी अपेक्षा या परिषदेत व्यक्त करण्यात आली. मात्र  नागरी सहकारी बँकांसाठी तशी तरतूद नसल्याचे रिझव्र्ह बँकेचे म्हणणे आहे. रिझव्र्ह बँक व केंद्र शासनाचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. सहकार क्षेत्राकडे शासन संशयाने बघते. देशात 1580 सहकारी बँका असून त्यापैकी सर्वाधिक 730 महाराष्ट्रात आहे. अडल्या नडलेल्यांना या बँका आर्थिक मदत करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळतो. तो राष्ट्रीयकृत बँका देऊ शकत नाही. असे असतानाही शासन नागरी सहकारी बँकांना मदत करण्यास तयार नाही. सहकारी बँकांकडून आकारण्यात येणारा आयकर घेऊ नये, लाभांश करमुक्त करण्यात यावा या मागण्यांबाबत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे, मात्र अद्यापही शासनाने दखल घेतलेली नाही. सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे सारखेच आहे. भाजपा सरकार हे आपले आहे, सत्तेवर आल्यानंतर आपल्या मागण्या तत्काळ मार्गी लावेल, अशी अपेक्षा होती, असे सहकार भारती समजत होती, मात्र असे असतानाही मागण्यांकडे दुर्लक्ष कायम आहे. काँग्रेस अन् भाजपा सरकार सारखेच आहे, अशा शब्दात या परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली. हार न मानता यापुढेही सरकारकडे पाठपुरावा सुरुच राहिल, त्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. भाजपा विचाराच्या एक-एक संस्था केंद्र शासनाबाबत नाराजी व्यक्त करुन घरचा आहेर देत आहे. काही दिवसांपूर्वी जळगावात झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनातही सरकारविषयी नाराजीचा सूर व्यक्त झाला होता.  जळगाव जिल्ह्यात ठेवीदारांचा प्रश्न असाच बिकट बनला आहे. गेल्या 10 वर्षापासून पतसंस्थांमध्ये अडलेल्या ठेवी मिळाव्यात यासाठी ठेवीदार शासकीय कार्यालये व पतसंस्थांचे उंबरठे ङिाजवत आहे मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही. तत्कालीन सहकार आयुक्त मधुकर चौधरी, चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. अॅक्शन प्लॅन तयार झाला मात्र तो कागदावरच आहे. ही परिस्थिती पाहता सहकार भारतीच्या परिषदेत व्यक्त झालेला हताशपणा वास्तवाला धरून आहे.