शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

विरोधकांची धारच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:01 IST

लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनादेखील महत्त्व असते आणि ही प्रणाली सुरळीतपणे चालण्यात त्यांचादेखील मोठा वाटा असतो.

लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनादेखील महत्त्व असते आणि ही प्रणाली सुरळीतपणे चालण्यात त्यांचादेखील मोठा वाटा असतो. देशात विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना देशाचे केंद्रस्थान असणा-या नागपुरात मात्र विरोधक मवाळ पवित्र्यातच दिसून येत आहेत. विरोधी गटांमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना ही बाब प्रकर्षाने जाणवतदेखील आहे. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेलादेखील आला. विरोधी पक्षात असलो तरी नागरिकांच्या हक्कांसाठी आपण सजग राहायला हवे. वेळ आलीच तर रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे. जर पक्षात सक्रियच राहायचे नसेल तर दुसºया व्यक्तीला संधी देण्यात येईल, असे खडे बोल काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी यावेळी सदस्यांना सुनावले. मुळात विरोधी पक्षात असताना तर नगरसेवक किंवा पक्षातील पदाधिकाºयांची जबाबदारी आणखी वाढते. कारण सत्ताधाºयांकडून न्याय मिळत नसेल तर जनता आपले प्रश्न विरोधकांनी मांडावे ही अपेक्षा करत असते. परंतु नागपुरात खरोखरच असे चित्र आहे, या प्रश्नावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. खरे तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी विरोधी पक्षातील सदस्यांनी नेहमी तत्परच असायला हवे. परंतु काँग्रेसच्या शहराध्यक्षांना बैठकीमध्ये ही गोष्ट सांगण्याची वेळ का आली हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी निवडणुकांच्या वेळी सक्रिय होतात आणि त्यानंतर पक्षाच्या आंदोलनाकडे सातत्याने पाठ फिरवितात हे ठाकरे यांचे निरीक्षण एकदम योग्य आहे. विरोधी बाकांवर बसणे म्हणजे हताश होऊ जाणे असा अर्थ होत नाही. तर ती एक संधी असते पक्षाला मजबूत करण्याची, संघटनेला सक्षमरीत्या बांधण्याची. विरोधकांनी या काळात जनतेमध्ये स्वत:बाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परिश्रमांची गुंतवणूक केली पाहिजे. कदाचित लगेच परिणाम समोर येणार नाहीत. मात्र दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यात निश्चितच फायद्याची ठरू शकते. केवळ प्रसिद्धीपुरते आंदोलनात यायचे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी उन्हात येणे टाळायचे, असा पवित्रा नुकसानकारक ठरू शकतो. जनतेसाठी लढताना जनतेच्या खांद्याला खांदा लावून उतरणे अपेक्षित असते. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी वा इतर पक्ष, या सर्वांनी सखोल मंथन केले पाहिजे. विरोधकांच्या मुद्यांमध्ये धार हा लोकशाहीचा खरा आधार असल्याची बाब समजून घेण्याची गरज आहे.