शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची धारच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:01 IST

लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनादेखील महत्त्व असते आणि ही प्रणाली सुरळीतपणे चालण्यात त्यांचादेखील मोठा वाटा असतो.

लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनादेखील महत्त्व असते आणि ही प्रणाली सुरळीतपणे चालण्यात त्यांचादेखील मोठा वाटा असतो. देशात विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना देशाचे केंद्रस्थान असणा-या नागपुरात मात्र विरोधक मवाळ पवित्र्यातच दिसून येत आहेत. विरोधी गटांमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना ही बाब प्रकर्षाने जाणवतदेखील आहे. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेलादेखील आला. विरोधी पक्षात असलो तरी नागरिकांच्या हक्कांसाठी आपण सजग राहायला हवे. वेळ आलीच तर रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे. जर पक्षात सक्रियच राहायचे नसेल तर दुसºया व्यक्तीला संधी देण्यात येईल, असे खडे बोल काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी यावेळी सदस्यांना सुनावले. मुळात विरोधी पक्षात असताना तर नगरसेवक किंवा पक्षातील पदाधिकाºयांची जबाबदारी आणखी वाढते. कारण सत्ताधाºयांकडून न्याय मिळत नसेल तर जनता आपले प्रश्न विरोधकांनी मांडावे ही अपेक्षा करत असते. परंतु नागपुरात खरोखरच असे चित्र आहे, या प्रश्नावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. खरे तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी विरोधी पक्षातील सदस्यांनी नेहमी तत्परच असायला हवे. परंतु काँग्रेसच्या शहराध्यक्षांना बैठकीमध्ये ही गोष्ट सांगण्याची वेळ का आली हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी निवडणुकांच्या वेळी सक्रिय होतात आणि त्यानंतर पक्षाच्या आंदोलनाकडे सातत्याने पाठ फिरवितात हे ठाकरे यांचे निरीक्षण एकदम योग्य आहे. विरोधी बाकांवर बसणे म्हणजे हताश होऊ जाणे असा अर्थ होत नाही. तर ती एक संधी असते पक्षाला मजबूत करण्याची, संघटनेला सक्षमरीत्या बांधण्याची. विरोधकांनी या काळात जनतेमध्ये स्वत:बाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परिश्रमांची गुंतवणूक केली पाहिजे. कदाचित लगेच परिणाम समोर येणार नाहीत. मात्र दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यात निश्चितच फायद्याची ठरू शकते. केवळ प्रसिद्धीपुरते आंदोलनात यायचे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी उन्हात येणे टाळायचे, असा पवित्रा नुकसानकारक ठरू शकतो. जनतेसाठी लढताना जनतेच्या खांद्याला खांदा लावून उतरणे अपेक्षित असते. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी वा इतर पक्ष, या सर्वांनी सखोल मंथन केले पाहिजे. विरोधकांच्या मुद्यांमध्ये धार हा लोकशाहीचा खरा आधार असल्याची बाब समजून घेण्याची गरज आहे.