शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सुमतिं चमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे

डॉ. गोविंद काळे।एरवी आपण देहाचे नुसतेच मालक़ मालकाला आतली यंत्रणा, कशी काय चालते याची तर कवडीचीही माहिती असत नाही़ स्वत:चे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव लावून देहाचा मालक म्हणून जन्मभर स्वपरिचय देत असतो़ मनाचा शोध लागत नाही नि बुद्धीचे माहात्म्य आयुष्यभर उमगत नाही़ मनुष्य हा बुद्धिमान प्राणी म्हणून मिरवत असतो़ ईश्वर सुद्धा हल्ली मनुष्य नावाच्या बुद्धीप्राण्याला वचकून असतो़ आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे हे तर आपल्या पूर्वजांचे निक्षून सांगणे होते़ ‘नमस्ते व्यास विशालबुद्धे’ बुद्धीचा एकमेव मापदंड म्हणजे महर्षी व्यास. न्यूटन आणि आईनस्टाईनला कुणी विशालबुद्धीचे म्हटल्याचे आमच्या तरी ऐकिवात नाही़ ‘बुद्धि: कर्मानुसारिणी’ म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या कृत्यानुसार ह्या जन्मी बुद्धी कार्य करीत राहते़ गतजन्म आठवणार कुणाला हो? आणि पुनर्जन्मावर विश्वास तरी कोण ठेवणार? काय साधून घ्यायचे आहे ते आत्ताच़ उद्या कुणी पाहिला आहे़मंत्रदृष्ट्या ऋषींचे ज्ञान अगाध होते़ त्यामुळेच तर त्यांनी ‘मतिं च मे सुमतिं चमे’ अशी प्रार्थना केली आहे़ मागणी केली आहे़ बुद्धीपुरते मर्यादित राहता आले असते परंतु वेगळी सुबुद्धीची मागणी ऋषींची आहे़ कारण बुद्धिमान माणसेही मोठमोठ्या चुका करतात़ प्रमाणपत्र मिळते ‘त्या वेळी त्याची बुद्धी कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे?’ बुद्धी असून ही परिस्थिती उद्भवते़ हेच कृत्य करायचे होते तऱ़.च्या जन्माला का नाही गेलास़अरे! तू माणूस ना? बुद्धी नव्हे तर माणसाकडे सुबुद्धी असली पाहिजे़ घरातील बालक सायंकाळी शुभं करोति झाल्यावर आजोबांच्या पाया पडते तेव्हा ते एवढेच म्हणतात़ ‘सद्बुद्धी देरे बाबा माझ्या नातवाला आणि कल्याण कऱ’ बुद्धी ही न्युट्रल आहे. ती पापाकडे, दुराचाराकडे वळली की पापबुद्धी होते़ समर्थांना लिहावे लागले ‘मना वासना पाप बुद्धी नको रे!’ पन्नासाव्या मजल्यावरून बादलीभर पाणी क्षणार्धात खाली ओतता येते़ वरती चढवायचे झाले तर मात्र पंप लावावा लागतो. तरच पाणी चढते़ जीवन सुसह्य होते़हे तर व्यवहारातील गणित आहे़ पंपाच्या माध्यमाने वर जाण्याचे गणित सुटते़ पंप हा एक संस्कार आहे़ मानवी जीवनाला संस्कारच घडवू शकतात, वाचवू शकतात म्हणून सुमती/सुबुद्धी़ ‘मतिं च मे सुमतिं चमे’ ही झालीपाहिजे प्रार्थना़ विष्णुसहस्रनामसांगते ‘नाशुभामति:’ / अशुभ बुद्धी देऊ नको़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक