शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुमतिं चमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे

डॉ. गोविंद काळे।एरवी आपण देहाचे नुसतेच मालक़ मालकाला आतली यंत्रणा, कशी काय चालते याची तर कवडीचीही माहिती असत नाही़ स्वत:चे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव लावून देहाचा मालक म्हणून जन्मभर स्वपरिचय देत असतो़ मनाचा शोध लागत नाही नि बुद्धीचे माहात्म्य आयुष्यभर उमगत नाही़ मनुष्य हा बुद्धिमान प्राणी म्हणून मिरवत असतो़ ईश्वर सुद्धा हल्ली मनुष्य नावाच्या बुद्धीप्राण्याला वचकून असतो़ आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे हे तर आपल्या पूर्वजांचे निक्षून सांगणे होते़ ‘नमस्ते व्यास विशालबुद्धे’ बुद्धीचा एकमेव मापदंड म्हणजे महर्षी व्यास. न्यूटन आणि आईनस्टाईनला कुणी विशालबुद्धीचे म्हटल्याचे आमच्या तरी ऐकिवात नाही़ ‘बुद्धि: कर्मानुसारिणी’ म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या कृत्यानुसार ह्या जन्मी बुद्धी कार्य करीत राहते़ गतजन्म आठवणार कुणाला हो? आणि पुनर्जन्मावर विश्वास तरी कोण ठेवणार? काय साधून घ्यायचे आहे ते आत्ताच़ उद्या कुणी पाहिला आहे़मंत्रदृष्ट्या ऋषींचे ज्ञान अगाध होते़ त्यामुळेच तर त्यांनी ‘मतिं च मे सुमतिं चमे’ अशी प्रार्थना केली आहे़ मागणी केली आहे़ बुद्धीपुरते मर्यादित राहता आले असते परंतु वेगळी सुबुद्धीची मागणी ऋषींची आहे़ कारण बुद्धिमान माणसेही मोठमोठ्या चुका करतात़ प्रमाणपत्र मिळते ‘त्या वेळी त्याची बुद्धी कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे?’ बुद्धी असून ही परिस्थिती उद्भवते़ हेच कृत्य करायचे होते तऱ़.च्या जन्माला का नाही गेलास़अरे! तू माणूस ना? बुद्धी नव्हे तर माणसाकडे सुबुद्धी असली पाहिजे़ घरातील बालक सायंकाळी शुभं करोति झाल्यावर आजोबांच्या पाया पडते तेव्हा ते एवढेच म्हणतात़ ‘सद्बुद्धी देरे बाबा माझ्या नातवाला आणि कल्याण कऱ’ बुद्धी ही न्युट्रल आहे. ती पापाकडे, दुराचाराकडे वळली की पापबुद्धी होते़ समर्थांना लिहावे लागले ‘मना वासना पाप बुद्धी नको रे!’ पन्नासाव्या मजल्यावरून बादलीभर पाणी क्षणार्धात खाली ओतता येते़ वरती चढवायचे झाले तर मात्र पंप लावावा लागतो. तरच पाणी चढते़ जीवन सुसह्य होते़हे तर व्यवहारातील गणित आहे़ पंपाच्या माध्यमाने वर जाण्याचे गणित सुटते़ पंप हा एक संस्कार आहे़ मानवी जीवनाला संस्कारच घडवू शकतात, वाचवू शकतात म्हणून सुमती/सुबुद्धी़ ‘मतिं च मे सुमतिं चमे’ ही झालीपाहिजे प्रार्थना़ विष्णुसहस्रनामसांगते ‘नाशुभामति:’ / अशुभ बुद्धी देऊ नको़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक