शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

सुखदेवबाबू

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

समाजाची अस्मिता गहाण ठेवून मंत्रिपदासाठी कधी पवारांसमोर तर कधी मोदींच्या मागे लाचारासारखे फिरणारे नेते पाहिले तर आपल्या समाजाचे आत्मभान जपणारा हा नेता अधिक मोठा वाटू लागतो.

समाजाची अस्मिता गहाण ठेवून मंत्रिपदासाठी कधी पवारांसमोर तर कधी मोदींच्या मागे लाचारासारखे फिरणारे नेते पाहिले तर आपल्या समाजाचे आत्मभान जपणारा हा नेता अधिक मोठा वाटू लागतो.आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर भांडणारे देसाईगंज वडसाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेवबाबू उईके परवा गेले. आरंभापासून समाजवादी निष्ठा बाळगणारा आणि त्या निष्ठांच्या बाजूने आयुष्यभर उभा राहिलेला हा निष्कांचन कार्यकर्ता होता. शेतमजूर आणि भूमिहीनांच्या समस्या विधिमंडळात मांडताना आपल्या भूमिकेवर अविचल राहणारा हा प्रामाणिक लोकप्रतिनिधी होता. त्यांनी आयुष्याशी तडजोड केली नाही आणि कुणी कितीही मोठा माणूस असो त्याच्याशी मतभेद करायला ते घाबरलेही नाहीत.सुखदेवबाबू सडेतोड बोलायचे. असा परखडपणा यायला व्यक्तिगत जीवनात सचोटी, प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्याही आरोपातून मुक्त आणि निर्भय आयुष्य वाट्याला येणे आवश्यक असते. सुखदेवबाबूंना तसे जगता आले म्हणूनच ते आपल्याच समाजातील सरंजामशाहीविरुद्ध कणखरपणे लढू शकले.ग्रामीण भागातील माणसांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगार हमी योजनेला अधिक व्यापक करण्याचे श्रेय सुखदेवबाबूंना जाते. जबरनजोत धारकांचा लढा त्यातूनच उभा राहिला. पिढ्यान्पिढ्यापासून जमीन कसत असूनही त्या जमिनीची मालकी नसलेल्या महाराष्ट्रातील हजारो जबरनजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी सुखदेवबाबू सतत लढायचे. आमदार असताना एकदा त्यांनी त्यासाठी विधिमंडळाचे कामकाज ठप्प पाडले होते. आणीबाणी संपल्यानंतर रचनात्मक कार्यात स्वत:चे आयुष्य झोकून दिलेल्या विधायक कार्यकर्त्यांची एक पिढी नंतरच्या काळात तयार झाली. त्यातील मोहन हिराबाई, डॉ. सतीश गोगुलवार या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काम सुरु केले. असंघटित मजूर, लाकूड कामगारांसाठी सुरु झालेल्या या चळवळीने नंतर महाराष्ट्र व्यापला. या लढ्याचे मुख्य सूत्र होते, ‘आपण आपला मार्ग शोधृू या’ आणि त्याचे शिल्पकार होते, सुखदेवबाबू. या चळवळीचे वैशिष्ट्य असे की, समाजातील सर्व वंचित घटकांना एका कवेत घेणारी विशाल दृष्टी त्यात होती. यातून लोकसमस्यांच्या निराकरणासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि कायद्याच्या माध्यमातून लढण्याची मानसिकता घडत गेली. आमच्या समस्यांची उत्तरे आम्हीच शोधू किंबहुना ती सोडवू, हा विश्वास गरीब, निरक्षर भूमिहीन मजुरांमध्ये निर्माण झाला आणि तो सतत वाढत गेला, ही सामाजिक चळवळीतील मोठी क्रांती होती.गडचिरोलीच्या जंगलासाठी शाप ठरणाऱ्या तुलतुली, भोपाळपट्टणम, इचमपल्ली या धरणांना विरोध करण्यासाठी उभ्या राहिलेल्या ‘जंगल बचाव-मानव बचाव’ आंदोलनाचे सुखदेवबाबू महत्त्वाचे शिलेदार होते. बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा यांच्या वैचारिक पाठबळाने या आंदोलनाला बळ मिळाले. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने दडपशाही सुरु केली. पण सुखदेवबाबू आणि त्यांचे कार्यकर्ते अखेरपर्यंत ढळले नाहीत. राजकारणातून त्यांनी काहीच कमावले नाही. उलट शिक्षक असताना जे काही थोडेबहुत पैसे जमले होते तेही चळवळीत गमावले. आदिवासी समाजात त्यांच्याबद्दल असलेला आदर बड्या राजकारण्यांनी हेरला होता. तशी आमिषंदेखील त्यांना यायची. पण सुखदेवबाबू त्यांना बळी पडले नाहीत. एकदा कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकाने त्यांना विचारलेच, ‘बाबूजी, तुमच्यासोबत समाज आहे, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे तुम्हाला निमंत्रण आहे. तुम्ही का जात नाही?’ या कार्यकर्त्यांला सुखदेवबाबूंनी दिलेले उत्तर वर्तमानातील राजकीय परिस्थितीच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. ते कार्यकर्त्याला म्हणाले, ‘मी आदिवासी आहे. आमचा समाज भीक मागत नाही. तो स्वाभिमानी आहे. काँग्रेस-भाजपासोबत गेलो तर मला तडजोडी कराव्या लागतील, माझी फरफट होईल.’ समाजाची अस्मिता गहाण ठेवून मंत्रिपदासाठी कधी पवारांसमोर तर कधी मोदींच्या मागे लाचारासारखे फिरणारे नेते पाहिले तर आपल्या समाजाचे आत्मभान जपणारा हा नेता अधिक मोठा वाटू लागतो.- गजानन जानभोर