शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

साखरेवरील सेस - टु बी आॅर नॉट टु बी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:16 IST

साखरेच्या विक्रीवर तीन टक्के सेस लावावा की नको यावरून केंद्र सरकारमध्ये मतभिन्नता दिसत आहे.

- चंद्रकांत कित्तुरेसाखरेच्या विक्रीवर तीन टक्के सेस लावावा की नको यावरून केंद्र सरकारमध्ये मतभिन्नता दिसत आहे. तो लावला तर अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटेल?केंद्र सरकारने विविध उपाययोजना करूनही साखर उद्योगावरील संकट काही दूर होण्याची चिन्हे नाहीत. साखर कारखान्यांकडे असलेली एफआरपीची थकीत बिले २२ हजार कोटी रुपयांवरून १८ हजार कोटी रुपयांवर आली आहेत इतकेच. आता साखरेवर तीन टक्के सेस (अधिभार) लावण्यावरून केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. मंत्रिगटाने असा सेस लावण्यास अनुकूलता न दर्शविता इथेनॉलवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणण्याला अनुकूलता दर्शविली आहे. याचवेळी साखरेवर सेस लावण्याऐवजी ऐषआरामी वस्तूंवर एक टक्का सेस लावण्याचाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत यावर निर्णय अपेक्षित आहे. मात्र, असा कर लावणे ‘एक देश एक कर’ या जीएसटीच्या तत्त्वाला मुरड घालण्यासारखे आहे. त्यामुळेच केंद्र सरकार याबाबत ‘टु बी आॅर नॉट टु बी’ अशा पेचात आहे.देशात यंदा साखरेचे उत्पादन ३२० लाख टनांच्या आसपास झाले आहे. देशाची मागणी २५० लाख टनांची आहे. आरंभीची शिल्लक ३९ लाख टन विचारात घेता देशातील उपलब्ध साखर ३५९ लाख टनांच्या आसपास जाते. यातील २५० लाख टन वगळले तर १०९ लाख टन शिल्लक राहते. यातील ३० लाख टन साखरेचा केंद्र सरकारने बफर स्टॉक केला आहे, तर २० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. याशिवाय निर्यात अनुदान म्हणून प्रतिटन ५५ रुपये थेट ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा होणार आहेत. याशिवाय साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये निश्चित करण्यात आला आहे. दर महिन्याला साखरेचा विक्री कोटा ठरवून देण्याची यंत्रणा पुन्हा लागू करण्यात आली आहे. तरीही साखरेचे दर म्हणावे तसे वधारलेले नाहीत. कारखान्यांकडील ऊस उत्पादकांची देणी कायम आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्याचा सरकारवर राग आहे. हे उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी सरकारला दाखवून दिले. यांनतरच साखरेचा विक्री दर निश्चित करण्यासह काही उपाय योजले गेले. आगामी साखर हंगामातही ३२० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. तसे झाले तर साखर ठेवायची कुठे, असा प्रश्न कारखानदारांना पडणार आहे. कारण गोदामे अपुरी पडणार आहेत.कोणत्याही परिस्थितीत साखरेची निर्यात हाच हा साठा कमी करण्याचा उपाय आहे. त्यासाठी अनुदान ५५ रुपयांवरून ११० रुपये करावे, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. जीएसटी लागू करण्यापूर्वी सरकार कारखान्यांकडून साखर विकास निधी घेत होते. त्यातूनच या कारखान्यांना कर्ज असो वा अनुदान देत होते. जीएसटीनंतर हा निधी बंद झाला आहे. त्यामुळे अनुदान, बफर स्टॉकवरील व्याज, गोदामभाडे अथवा इथेनॉल प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याज देण्यासाठी लागणारा पैसा साखरेच्या विक्रीवर तीन टक्के सेस लावून उभारण्याचा प्रस्ताव आहे. मुळात जीएसटी असताना सेस लावता येतो का यावर अ‍ॅटर्नी जनरल यांचे मत मागविले आहे. ते आल्यानंतर सरकार सेस लावायचा की नाही याचा निर्णय घेईल; पण अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे.