शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

साखर गोडवा उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 05:22 IST

कांदा आता उत्पादकांनाच रडवत आहे, भाजीपाल्याचे दर उतरले आहेत, डाळी उतारावर आहेत पण साखर मात्र कडू होण्याच्या बेतात आहे

कांदा आता उत्पादकांनाच रडवत आहे, भाजीपाल्याचे दर उतरले आहेत, डाळी उतारावर आहेत पण साखर मात्र कडू होण्याच्या बेतात आहे. यंदा सारखेचे उत्पादन कमी होणार हे स्पष्ट असल्याने त्याचा परिणाम लगेच बाजारावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार भारतात या वर्षी साखरेचे उत्पादन कमी होऊन ती आयात करावी लागणार आहे. जगात साखर उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असून सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाले व उत्पादनावर परिणाम झाला. दुष्काळामुळे ३.७ दशलक्ष टन उत्पादन घसरले आहे. जागतिक पातळीवर खांडसरीची किंमत ३० टक्यांनी वाढल्याने भाववाढीला ते सुद्धा एक कारण आहे व त्याचाही साखर उत्पादनावर परिणाम होईल. चालू वर्षांत देशाची साखरेची गरज २६ दशलक्ष टनांची आहे. ऊसाचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन याचा ताळेबंद ३०.६ दशलक्ष टनाचा मांडला गेला असला तरी कागदावरची आकडेवारी प्रत्यक्षात उतरवणे हे अवघड काम आहे. कारण प्रत्यक्ष लागवड आणि तिची सरकारी नोंद यात कमालीची तफावत असते. परिमामी उत्पन्नाचा अंदाज हमखास कोलमडतो. अर्थात भाववाढीचे हे एकच कारण नसते. देशात या वर्षीं टमाटे आणि बटाट्याचे उत्पादन भरघोस होणार असा सरकारी अंदाज आहे; पण अगदी नावापुरती टंचाई असतानाही त्यांचे भाव वधारले. हा खेळ बाजारातील खेळीयांचा व तो प्रत्येक उत्पादनात असतो. जगाचा विचार करता आशिया खंडातील परिस्थिती प्रतिकूल दिसते. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे दुष्काळाने चित्र बिघडवले आणि उत्पादनात तूट निर्माण झाली. तिकडे युरोप आणि ब्राझीलमध्ये अनुकूल स्थिती असली तरी साखरेची जागतिक तूट ही साडे पाच दशलक्ष टनांची असेल. महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या वर्षी ८.४१ मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. ते या वर्षीं ५.३ टन होईल असा अंदाज आहे. ही घसरण अटळ आहे. २०१०-११ आणि ११-१२ मध्ये नऊ मेट्रीक टन उत्पादन होते; पण पुढील चार वर्षे ७.९१, ७.४७, ८.४१ आणि २०१५-१६ मध्ये ५.३० मेट्रीक टन अशी घसरण होत गेली. दोन वर्षांच्या दुष्काळाने शेतीतील ऊस मोडला त्यामुळे क्षेत्र कमी झाले. आजारी, कर्जबाजारी साखर कारखाने हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. साखरेचे जागतिक भाव गेल्या चार-पाच वर्षांपासून पडल्यामुळे साखर स्वस्त होती आणि त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसला. ऊसाचे क्षेत्र कमी होण्याचे हेसुद्धा एक कारण आहे. सणासुदीचे दिवस आले आहेत; साखरेची मागणी वाढणार व त्यात हा भाववाढीचा फटका अनिवार्य दिसतो. साखरेच्या गोड कहाणीचे दिवस पुढील काही काळासाठी तरी संपले हेच खरे.