शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

असा मित्र सुरेख बाई

By admin | Updated: November 26, 2015 22:09 IST

शरद पवार काट्याच्या वाडीतील प्राथमिक शाळेत शिकले की नाही, ठाऊक नाही. जर शिकले असतील आणि त्यांचे तेव्हांचे गुरुजी आज हयात असतील तर ते नक्कीच सांगतील

शरद पवार काट्याच्या वाडीतील प्राथमिक शाळेत शिकले की नाही, ठाऊक नाही. जर शिकले असतील आणि त्यांचे तेव्हांचे गुरुजी आज हयात असतील तर ते नक्कीच सांगतील की ‘शरद वर्गातला मोठा खोडकर विद्यार्थी हो’! तो खोडकरपणा त्यांनी आजही अगदी जपून ठेवला आहे. ‘प्रौढत्वी नीज शैशवास जपणे’ वगैरे. या खोडकर स्वभावातूनच अधूनमधून मध्यावधी निवडणुकांचे भाकीत ते करीत असतात. एरवी त्यांचा फल ज्योतिषावर आणि भाकितांवर वगैरे विश्वास नसल्याचे त्यांचे सवंगडी सांगत असले तरी अशी राजकीय भाकिते ते नेहमीच व्यक्तवून मोकळे होत असतात. मध्यंतरी त्यांनी बऱ्याचदा लोकसभेच्या मध्यावधीची भाकिते केली पण हवामान खात्याच्या भाकितांसारखीच त्यांचीही गत झाली. आताचे त्यांचे ताजे भाकीत आहे राज्यातील विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे. अर्थात त्यासाठी त्यांनी मुहूर्त सांगितला आहे तो मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतरचा. तूर्तास राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपा आणि सेना यांच्यातील कुरबुरी वाढल्या आणि सेनेने सत्तात्याग वा युतीत्याग केला (तसे होणे असंभव कारण आतमध्ये राहून छळण्यात अधिक मौज असते) तर आपण फडणवीस सरकार पडू देणार नाही असे पवारांनीच नि:संदिग्धपणे सांगितले होते. त्यामुळे समजा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती झाली नाही (ती तर विधानसभेच्या वेळीही झाली नव्हती) तर दोघे स्वतंत्रपणे ती निवडणूक लढवतील, कपाळमोक्ष करुन घेतील आणि मग मध्यावधी निवडणुकीशिवाय पर्यायच राहणार नाही, असा पवारांच्या या भाकिताचा खुलासा. म्हणजे त्या स्थितीत ते फडणवीस सरकार वाचविण्याच्या काही भानगडीत पडणार नाहीत! परंतु प्रत्यक्षात तसे काही नसावे. विधान परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेससोबतलढविणार असल्याचे जाहीर करुन आणि त्याद्वारे युतीनेही युतीधर्म पाळावा असाच मित्रत्वाचा सल्ला त्यांनी दिला असावा. तसेही सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेना-भाजपा युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन पवारांचे सख्खे मित्र होते अणि या मित्रांच्या पश्चात त्यांचे गड सुरक्षित राखणे आपलेच कर्तव्य आहे, असा पवारांच्या मनातील रास्त समज असावा. त्यामुळे मध्यवधीची हूल उठवून दिली की मुळातच अंत:करणी घाबरट असलेले सेना आणि भाजपाचे लोक निमूट युतीला चिकटून राहतील असा त्यांचा विचार असावा. नव्हे तोच तर त्यांचा खरा प्रयत्न आहे आणि म्हणूनच युतीच्या दोन्ही भागीदारांनी ‘असा मित्र सुरेख बाई’ म्हणून गप्प बसावे.