शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

असा मित्र सुरेख बाई

By admin | Updated: November 26, 2015 22:09 IST

शरद पवार काट्याच्या वाडीतील प्राथमिक शाळेत शिकले की नाही, ठाऊक नाही. जर शिकले असतील आणि त्यांचे तेव्हांचे गुरुजी आज हयात असतील तर ते नक्कीच सांगतील

शरद पवार काट्याच्या वाडीतील प्राथमिक शाळेत शिकले की नाही, ठाऊक नाही. जर शिकले असतील आणि त्यांचे तेव्हांचे गुरुजी आज हयात असतील तर ते नक्कीच सांगतील की ‘शरद वर्गातला मोठा खोडकर विद्यार्थी हो’! तो खोडकरपणा त्यांनी आजही अगदी जपून ठेवला आहे. ‘प्रौढत्वी नीज शैशवास जपणे’ वगैरे. या खोडकर स्वभावातूनच अधूनमधून मध्यावधी निवडणुकांचे भाकीत ते करीत असतात. एरवी त्यांचा फल ज्योतिषावर आणि भाकितांवर वगैरे विश्वास नसल्याचे त्यांचे सवंगडी सांगत असले तरी अशी राजकीय भाकिते ते नेहमीच व्यक्तवून मोकळे होत असतात. मध्यंतरी त्यांनी बऱ्याचदा लोकसभेच्या मध्यावधीची भाकिते केली पण हवामान खात्याच्या भाकितांसारखीच त्यांचीही गत झाली. आताचे त्यांचे ताजे भाकीत आहे राज्यातील विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे. अर्थात त्यासाठी त्यांनी मुहूर्त सांगितला आहे तो मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतरचा. तूर्तास राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपा आणि सेना यांच्यातील कुरबुरी वाढल्या आणि सेनेने सत्तात्याग वा युतीत्याग केला (तसे होणे असंभव कारण आतमध्ये राहून छळण्यात अधिक मौज असते) तर आपण फडणवीस सरकार पडू देणार नाही असे पवारांनीच नि:संदिग्धपणे सांगितले होते. त्यामुळे समजा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती झाली नाही (ती तर विधानसभेच्या वेळीही झाली नव्हती) तर दोघे स्वतंत्रपणे ती निवडणूक लढवतील, कपाळमोक्ष करुन घेतील आणि मग मध्यावधी निवडणुकीशिवाय पर्यायच राहणार नाही, असा पवारांच्या या भाकिताचा खुलासा. म्हणजे त्या स्थितीत ते फडणवीस सरकार वाचविण्याच्या काही भानगडीत पडणार नाहीत! परंतु प्रत्यक्षात तसे काही नसावे. विधान परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेससोबतलढविणार असल्याचे जाहीर करुन आणि त्याद्वारे युतीनेही युतीधर्म पाळावा असाच मित्रत्वाचा सल्ला त्यांनी दिला असावा. तसेही सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेना-भाजपा युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन पवारांचे सख्खे मित्र होते अणि या मित्रांच्या पश्चात त्यांचे गड सुरक्षित राखणे आपलेच कर्तव्य आहे, असा पवारांच्या मनातील रास्त समज असावा. त्यामुळे मध्यवधीची हूल उठवून दिली की मुळातच अंत:करणी घाबरट असलेले सेना आणि भाजपाचे लोक निमूट युतीला चिकटून राहतील असा त्यांचा विचार असावा. नव्हे तोच तर त्यांचा खरा प्रयत्न आहे आणि म्हणूनच युतीच्या दोन्ही भागीदारांनी ‘असा मित्र सुरेख बाई’ म्हणून गप्प बसावे.