शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भयगंडात अडकले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:01 IST

बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडलेला हा धक्कादायक आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग.

बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडलेला हा धक्कादायक आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग. परीक्षेमुळे प्रचंड तणावात असलेला एक विद्यार्थी त्याचे परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयात पोहोचतो. अतिशय विमनस्क अवस्थेत थेट प्राचार्यांचे केबिन गाठतो आणि त्यांना विनवणी करतो, सर, मला कॉपी करू द्या. मी जर परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर माझे पालक माझ्यावर संतापतील, मला घराबाहेर काढतील. विद्यार्थ्याची ही अनपेक्षित मागणी आणि त्याची मानसिक अवस्था बघून प्राचार्यही प्रचंड अस्वस्थ होतात. दहावी-बारावीच्या परीक्षेचे भूत आणि त्यावर पालकांच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांना किती भयभीत करते, याचे हे जिवंत उदाहरण. शिक्षण घेणे म्हणजे फक्त भरपूर गुणांसह परीक्षा उत्तीर्ण करणे, त्या गुणांच्या भरवशावर नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणे आणि तेथील कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मोठमोठाल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळविणे, असे एक समीकरणच आज होऊन बसलेय. शिक्षण म्हणजे ज्ञानार्जन ही संकल्पना जवळपास मोडीतच निघालीय, असे म्हटले तरी चालेल आणि या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्याची दशा सर्कशीतील एखाद्या जनावराप्रमाणे झाली आहे. घरी पालक आणि शिकवणी वर्गांमध्ये शिक्षक त्याच्या मागे हंटर घेऊन उभे असतात. सर्वांचा एकच ससेमिरा असतो, काहीही कर एवढे गुण मिळालेच पाहिजेत ! मग काय! हा दबाव, हा तणाव न झेपणारे विद्यार्थी खरोखरच यासाठी ‘काहीही करण्यास’ तयार होतात. अगदी कॉपी करण्यापासून तर प्रश्नपत्रिका विकत घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते. नुकत्याच झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत विविध केंद्रांवर कॉप्यांचा आलेला महापूर सर्वांना थक्क करणाराच होता. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे तणाव आणि भयगंडातूनच गैरमार्ग पत्करत असतात. यातूनच पुढे आत्महत्येसारखा टोकाचा मार्गही स्वीकारला जातो. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. हा तणाव कसा कमी करता येईल? याचा विचार आता पालक आणि शिक्षण संस्थांनीही करणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केलेली सूचना गांभीर्याने घ्यावी लागेल. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे आणि यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेत विद्यार्थी समुपदेशन केंद्र उभारण्यात यावे, अशा आशयाचे पत्रच यूजीसीने देशभरातील सर्व विद्यापीठांना पाठविले आहे. मानसोपचारतज्ज्ञांची सेवा येथे उपलब्ध असणार आहे आणि यूजीसीच्या या सूचनेची महाविद्यालयांनी प्रामाणिक अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांना तणावमुक्त होण्यास निश्चितच मदत मिळेल.