शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भयगंडात अडकले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:01 IST

बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडलेला हा धक्कादायक आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग.

बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडलेला हा धक्कादायक आणि पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रसंग. परीक्षेमुळे प्रचंड तणावात असलेला एक विद्यार्थी त्याचे परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयात पोहोचतो. अतिशय विमनस्क अवस्थेत थेट प्राचार्यांचे केबिन गाठतो आणि त्यांना विनवणी करतो, सर, मला कॉपी करू द्या. मी जर परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर माझे पालक माझ्यावर संतापतील, मला घराबाहेर काढतील. विद्यार्थ्याची ही अनपेक्षित मागणी आणि त्याची मानसिक अवस्था बघून प्राचार्यही प्रचंड अस्वस्थ होतात. दहावी-बारावीच्या परीक्षेचे भूत आणि त्यावर पालकांच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांना किती भयभीत करते, याचे हे जिवंत उदाहरण. शिक्षण घेणे म्हणजे फक्त भरपूर गुणांसह परीक्षा उत्तीर्ण करणे, त्या गुणांच्या भरवशावर नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविणे आणि तेथील कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मोठमोठाल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळविणे, असे एक समीकरणच आज होऊन बसलेय. शिक्षण म्हणजे ज्ञानार्जन ही संकल्पना जवळपास मोडीतच निघालीय, असे म्हटले तरी चालेल आणि या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्याची दशा सर्कशीतील एखाद्या जनावराप्रमाणे झाली आहे. घरी पालक आणि शिकवणी वर्गांमध्ये शिक्षक त्याच्या मागे हंटर घेऊन उभे असतात. सर्वांचा एकच ससेमिरा असतो, काहीही कर एवढे गुण मिळालेच पाहिजेत ! मग काय! हा दबाव, हा तणाव न झेपणारे विद्यार्थी खरोखरच यासाठी ‘काहीही करण्यास’ तयार होतात. अगदी कॉपी करण्यापासून तर प्रश्नपत्रिका विकत घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते. नुकत्याच झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत विविध केंद्रांवर कॉप्यांचा आलेला महापूर सर्वांना थक्क करणाराच होता. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे तणाव आणि भयगंडातूनच गैरमार्ग पत्करत असतात. यातूनच पुढे आत्महत्येसारखा टोकाचा मार्गही स्वीकारला जातो. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. हा तणाव कसा कमी करता येईल? याचा विचार आता पालक आणि शिक्षण संस्थांनीही करणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केलेली सूचना गांभीर्याने घ्यावी लागेल. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे आणि यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेत विद्यार्थी समुपदेशन केंद्र उभारण्यात यावे, अशा आशयाचे पत्रच यूजीसीने देशभरातील सर्व विद्यापीठांना पाठविले आहे. मानसोपचारतज्ज्ञांची सेवा येथे उपलब्ध असणार आहे आणि यूजीसीच्या या सूचनेची महाविद्यालयांनी प्रामाणिक अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांना तणावमुक्त होण्यास निश्चितच मदत मिळेल.