शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विद्यार्थी आणि गणेश

By admin | Updated: September 6, 2016 03:42 IST

आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव

आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव. पण लोकमान्य टिळकांचा उद्देश बुडीत खात्यात जमा होऊन या उत्सवाचे बाजारीकरण होत गेले. धार्मिकतेतून शुद्धता जाऊन व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक इमल्यांचे राज्य निर्माण होत गेले. चित्रपट क्षेत्रातील एखादा सेलीब्रिटी त्या गणपतीच्या दर्शनाला येऊन गेला की माध्यमांचे कॅमेरे सरसावतात आणि आपल्या प्रिय गणेशभक्तांची भली मोठीच्या मोठी रांग लागते आणि मग भक्तीचे वलय जाऊन त्याला मनोरंजनाचे स्वरूप येत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तीची उंची. जितका जास्त मोठा गणपती तेवढी जास्त गर्दीे. या समाजमनाच्या अज्ञानामुळे चलाख व्यवहारी माणसांचे त्यात फावते व मग मागच्या दरवाजांचे भाव ठरले जातात. हे आता सर्वश्रुत आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीगणेशाचे विसर्जन. इतक्या अवाढव्य मूर्ती मग विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भग्न अवस्थेत दिसून येतात आणि मग त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि पुन्हा गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. यात भावना निसर्गाच्याही आपण दुखावत असतो. प्लास्टरचे ढिगारेच्या ढिगारे जे विरघळू शकत नाहीत, अशामुळे मग प्रदूषण वाढते. यावर तोडगाही निघालाच पाहिजे. म्हणून काही सुशिक्षित मंडळी पुढे आली. मुंबईतील भांडुपच्या युवा फाउंडेशनच्या वतीने शाडूच्या मातीपासून शालेय मुलांना गणपती करून दाखवीत होते आणि विद्यार्थी ते शिकत होते. यामागचे कारण असे होते, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या हाताने गणपती बनवून स्वत:च्या घरी बसवायचा. आकाराने छोट्या असलेल्या गणपतीचे विसर्जन शेजारच्या तलावात करायचे. निसर्गाकडून घेतलेली मूर्तीसाठीची माती निसर्गाला पुन्हा अर्पण करायची; ज्याने प्रदूषण होणार नाही व उंचीचा प्रश्न निकालात निघेल.या उपक्र्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे मत होते की, श्रीगणेश ही अभ्यासाची देवता असल्याने त्यातून आम्हाला अभ्यासासाठी स्फूर्ती मिळेल. भांडुपच्या युवा फाउंडेशनचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. -विजयराज बोधनकर