शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

विद्यार्थी आणि गणेश

By admin | Updated: September 6, 2016 03:42 IST

आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव

आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव. पण लोकमान्य टिळकांचा उद्देश बुडीत खात्यात जमा होऊन या उत्सवाचे बाजारीकरण होत गेले. धार्मिकतेतून शुद्धता जाऊन व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक इमल्यांचे राज्य निर्माण होत गेले. चित्रपट क्षेत्रातील एखादा सेलीब्रिटी त्या गणपतीच्या दर्शनाला येऊन गेला की माध्यमांचे कॅमेरे सरसावतात आणि आपल्या प्रिय गणेशभक्तांची भली मोठीच्या मोठी रांग लागते आणि मग भक्तीचे वलय जाऊन त्याला मनोरंजनाचे स्वरूप येत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तीची उंची. जितका जास्त मोठा गणपती तेवढी जास्त गर्दीे. या समाजमनाच्या अज्ञानामुळे चलाख व्यवहारी माणसांचे त्यात फावते व मग मागच्या दरवाजांचे भाव ठरले जातात. हे आता सर्वश्रुत आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीगणेशाचे विसर्जन. इतक्या अवाढव्य मूर्ती मग विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भग्न अवस्थेत दिसून येतात आणि मग त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि पुन्हा गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. यात भावना निसर्गाच्याही आपण दुखावत असतो. प्लास्टरचे ढिगारेच्या ढिगारे जे विरघळू शकत नाहीत, अशामुळे मग प्रदूषण वाढते. यावर तोडगाही निघालाच पाहिजे. म्हणून काही सुशिक्षित मंडळी पुढे आली. मुंबईतील भांडुपच्या युवा फाउंडेशनच्या वतीने शाडूच्या मातीपासून शालेय मुलांना गणपती करून दाखवीत होते आणि विद्यार्थी ते शिकत होते. यामागचे कारण असे होते, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या हाताने गणपती बनवून स्वत:च्या घरी बसवायचा. आकाराने छोट्या असलेल्या गणपतीचे विसर्जन शेजारच्या तलावात करायचे. निसर्गाकडून घेतलेली मूर्तीसाठीची माती निसर्गाला पुन्हा अर्पण करायची; ज्याने प्रदूषण होणार नाही व उंचीचा प्रश्न निकालात निघेल.या उपक्र्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे मत होते की, श्रीगणेश ही अभ्यासाची देवता असल्याने त्यातून आम्हाला अभ्यासासाठी स्फूर्ती मिळेल. भांडुपच्या युवा फाउंडेशनचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. -विजयराज बोधनकर