शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

विद्यार्थी आणि गणेश

By admin | Updated: September 6, 2016 03:42 IST

आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव

आपण भारतीय अति उत्सवप्रिय आहोत. गणपती उत्सव हा दहा दिवसांचा आनंदी उत्सव. पण लोकमान्य टिळकांचा उद्देश बुडीत खात्यात जमा होऊन या उत्सवाचे बाजारीकरण होत गेले. धार्मिकतेतून शुद्धता जाऊन व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक इमल्यांचे राज्य निर्माण होत गेले. चित्रपट क्षेत्रातील एखादा सेलीब्रिटी त्या गणपतीच्या दर्शनाला येऊन गेला की माध्यमांचे कॅमेरे सरसावतात आणि आपल्या प्रिय गणेशभक्तांची भली मोठीच्या मोठी रांग लागते आणि मग भक्तीचे वलय जाऊन त्याला मनोरंजनाचे स्वरूप येत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्तीची उंची. जितका जास्त मोठा गणपती तेवढी जास्त गर्दीे. या समाजमनाच्या अज्ञानामुळे चलाख व्यवहारी माणसांचे त्यात फावते व मग मागच्या दरवाजांचे भाव ठरले जातात. हे आता सर्वश्रुत आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीगणेशाचे विसर्जन. इतक्या अवाढव्य मूर्ती मग विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भग्न अवस्थेत दिसून येतात आणि मग त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि पुन्हा गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जातात. यात भावना निसर्गाच्याही आपण दुखावत असतो. प्लास्टरचे ढिगारेच्या ढिगारे जे विरघळू शकत नाहीत, अशामुळे मग प्रदूषण वाढते. यावर तोडगाही निघालाच पाहिजे. म्हणून काही सुशिक्षित मंडळी पुढे आली. मुंबईतील भांडुपच्या युवा फाउंडेशनच्या वतीने शाडूच्या मातीपासून शालेय मुलांना गणपती करून दाखवीत होते आणि विद्यार्थी ते शिकत होते. यामागचे कारण असे होते, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या हाताने गणपती बनवून स्वत:च्या घरी बसवायचा. आकाराने छोट्या असलेल्या गणपतीचे विसर्जन शेजारच्या तलावात करायचे. निसर्गाकडून घेतलेली मूर्तीसाठीची माती निसर्गाला पुन्हा अर्पण करायची; ज्याने प्रदूषण होणार नाही व उंचीचा प्रश्न निकालात निघेल.या उपक्र्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे मत होते की, श्रीगणेश ही अभ्यासाची देवता असल्याने त्यातून आम्हाला अभ्यासासाठी स्फूर्ती मिळेल. भांडुपच्या युवा फाउंडेशनचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. -विजयराज बोधनकर