शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

निर्ढावलेले प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:40 IST

उत्सवकाळात वाहतुकीला-पादचा-यांना अडथळा ठरतील अशा विनापरवानगी मंडपांवर कारवाईचा आदेश देऊनही त्याचे पालन होत नसल्याने महापालिका आयुक्तांची कारागृहात रवानगी करावी लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने दिली.

उत्सवकाळात वाहतुकीला-पादचाºयांना अडथळा ठरतील अशा विनापरवानगी मंडपांवर कारवाईचा आदेश देऊनही त्याचे पालन होत नसल्याने महापालिका आयुक्तांची कारागृहात रवानगी करावी लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने दिली. मुंबई, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या महानगरपालिकांच्या आयुक्तांचा त्यात समावेश आहे. आयुक्तपदावरील व्यक्तीसाठी न्यायमूर्तींना असा इशारा द्यावा लागतो तेव्हा तो संतापाचा कडेलोट असतो. अशी वेळ न्यायमूर्तींवर येणे हाच आपल्या महानगरपालिकांचे प्रशासन किती निर्ढावले आहे, याचे द्योतक आहे. आपला समाज हा उत्सवप्रिय असला तरी गेल्या काही वर्षांपासून उदंड झाले उत्सव अशी परिस्थिती आहे. बहुतांश वेळा हे मंडप उभारणारे राजकीय पक्षाशी संबंधित असतात. कायद्याचे पालन करण्याऐवजी तो पायदळी तुडवण्यात मोठेपण मानणाºया समाजात त्यासाठी धर्माचा आधार घेतला जातो.आपण पण थोडी दांडगाई करून घेऊ, अशीच मंडप उभारणाºया या मंडळवाल्यांची भावना असते. त्यामुळे ते प्रशासन-पोलीस कोणालाच जुमानत नाहीत. कारवाईची वेळ आली की कोणत्या तरी स्थानिक नेत्याचा आधार घेतला जातो. चिरीमिरीतूनही व्यवहार मिटवला जातो. पण त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. त्यातूनच ठाण्याच्या डॉ. महेश बेडेकर व इतरांनी त्याबद्दल याचिका केली. मुळात अशा मंडपांवर कारवाई व्हावी यासाठी न्यायालयात जावे लागते हाच आपल्या राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेचा पराभव आहे. याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेच्या हद्दीत ४२ बेकायदा मंडप उभारण्यात आले. तर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत ६२ आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ३६ मंडप अनधिकृतपणे उभारण्यात आले, असे समोर आले. त्यावर कहर म्हणजे पोलीस बंदोबस्ताअभावी कारवाई करता आली नाही... अनेक विभागांच्या समन्वयात वेळ गेल्याने त्या काळात हे विनापरवानगी मंडप उभारले गेले, अशी भंपक कारणे न्यायालयात देताना या महापालिकांच्या प्रशासनांचा कोडगेपणा दिसला. महापालिका प्रशासनात आयुक्त हे सर्वोच्च असतात. शिवाय सनदी अधिकारी असल्याने त्यांना सुरक्षेची कवच-कुंडले असतात. नाक दाबले की तोंड उघडते या न्यायाने सर्वोच्च अधिकाºयालाच दणका बसला तर खालचे प्रशासन हादरते. तसेच शहाण्याला शब्दाचा मार पुरतो... असे म्हणतात. तुरुंगात पाठवण्याच्या इशाºयाचा मथितार्थ हाच आहे. तो समजून आता तरी महापालिका आयुक्तांनी या प्रश्नात आपल्या अधिकारांचा उपयोग करून संबंधित अधिकाºयांना व-उपद्रवी मंडळांना दणका देऊन लोकांचे जगणे सुसह्य करावे आणि आपल्या संस्थेचीही अब्रू वाचवावी.

टॅग्स :Mumbaiमुंबई