शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

निर्ढावलेले प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:40 IST

उत्सवकाळात वाहतुकीला-पादचा-यांना अडथळा ठरतील अशा विनापरवानगी मंडपांवर कारवाईचा आदेश देऊनही त्याचे पालन होत नसल्याने महापालिका आयुक्तांची कारागृहात रवानगी करावी लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने दिली.

उत्सवकाळात वाहतुकीला-पादचाºयांना अडथळा ठरतील अशा विनापरवानगी मंडपांवर कारवाईचा आदेश देऊनही त्याचे पालन होत नसल्याने महापालिका आयुक्तांची कारागृहात रवानगी करावी लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने दिली. मुंबई, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या महानगरपालिकांच्या आयुक्तांचा त्यात समावेश आहे. आयुक्तपदावरील व्यक्तीसाठी न्यायमूर्तींना असा इशारा द्यावा लागतो तेव्हा तो संतापाचा कडेलोट असतो. अशी वेळ न्यायमूर्तींवर येणे हाच आपल्या महानगरपालिकांचे प्रशासन किती निर्ढावले आहे, याचे द्योतक आहे. आपला समाज हा उत्सवप्रिय असला तरी गेल्या काही वर्षांपासून उदंड झाले उत्सव अशी परिस्थिती आहे. बहुतांश वेळा हे मंडप उभारणारे राजकीय पक्षाशी संबंधित असतात. कायद्याचे पालन करण्याऐवजी तो पायदळी तुडवण्यात मोठेपण मानणाºया समाजात त्यासाठी धर्माचा आधार घेतला जातो.आपण पण थोडी दांडगाई करून घेऊ, अशीच मंडप उभारणाºया या मंडळवाल्यांची भावना असते. त्यामुळे ते प्रशासन-पोलीस कोणालाच जुमानत नाहीत. कारवाईची वेळ आली की कोणत्या तरी स्थानिक नेत्याचा आधार घेतला जातो. चिरीमिरीतूनही व्यवहार मिटवला जातो. पण त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. त्यातूनच ठाण्याच्या डॉ. महेश बेडेकर व इतरांनी त्याबद्दल याचिका केली. मुळात अशा मंडपांवर कारवाई व्हावी यासाठी न्यायालयात जावे लागते हाच आपल्या राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेचा पराभव आहे. याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेच्या हद्दीत ४२ बेकायदा मंडप उभारण्यात आले. तर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत ६२ आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ३६ मंडप अनधिकृतपणे उभारण्यात आले, असे समोर आले. त्यावर कहर म्हणजे पोलीस बंदोबस्ताअभावी कारवाई करता आली नाही... अनेक विभागांच्या समन्वयात वेळ गेल्याने त्या काळात हे विनापरवानगी मंडप उभारले गेले, अशी भंपक कारणे न्यायालयात देताना या महापालिकांच्या प्रशासनांचा कोडगेपणा दिसला. महापालिका प्रशासनात आयुक्त हे सर्वोच्च असतात. शिवाय सनदी अधिकारी असल्याने त्यांना सुरक्षेची कवच-कुंडले असतात. नाक दाबले की तोंड उघडते या न्यायाने सर्वोच्च अधिकाºयालाच दणका बसला तर खालचे प्रशासन हादरते. तसेच शहाण्याला शब्दाचा मार पुरतो... असे म्हणतात. तुरुंगात पाठवण्याच्या इशाºयाचा मथितार्थ हाच आहे. तो समजून आता तरी महापालिका आयुक्तांनी या प्रश्नात आपल्या अधिकारांचा उपयोग करून संबंधित अधिकाºयांना व-उपद्रवी मंडळांना दणका देऊन लोकांचे जगणे सुसह्य करावे आणि आपल्या संस्थेचीही अब्रू वाचवावी.

टॅग्स :Mumbaiमुंबई