शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कहाणी ‘रित्या’ ताटाची

By admin | Updated: June 1, 2016 03:18 IST

१९७२ चा दुष्काळ हा मराठवाड्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेतील ‘लँडमार्क’ समजला जावा. हे यासाठी की, या दुष्काळाने शेती नव्हे

१९७२ चा दुष्काळ हा मराठवाड्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेतील ‘लँडमार्क’ समजला जावा. हे यासाठी की, या दुष्काळाने शेती नव्हे, तर माणसाचा आणि विचार करण्याचा पोतच बदलला. शेतीची घडी विस्कटली येथून आणि माणूस जमिनीपासून सुटला येथूनच. त्याचे बरे-वाईट परिणाम आपण पाहातो आणि अनुभवतो. त्यापूर्वी शेतीमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती ती ६४-६५ च्या सुमारास. तेव्हा हायब्रीड बियाणे अवतरले. हरित क्रांतीचा तो काळ होता. बियाणे बदलले; पण पीक पद्धती कायम होती. पुढे नगदी पिकाचे आकर्षण वाढले आणि पिकेही बदलली. ४५ वर्षांपूर्वीची पिके आज मराठवाड्यात पाहायला मिळत नाहीत. औरंगाबाद विभागाच्या कृषी खात्याने या बदलाचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष निघाले आहेत.समाज बदलाच्या प्रक्रियेत शेतीचाही वाटा असतो. अगोदर म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यातील पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ज्वारी, बाजरी, भुईमूग, भात, तूर, मटकी, मूग, उडीद, कापूस अशी पिके शिवारात दिसायची. याच्या जोडीला भगर, राळे, तीळ, जवस, काराळे ही पिकेही होती आणि ही मिश्र पीक पद्धती आहाराचा आधार होता. पुढे नगदी पिके आणि कमी कष्टात अधिक उत्पन्न हा मार्ग निवडल्याने यातील काही पिके तर बाद झाली. राळे, काराळे, जवस, हुलगे या पिकांची नावेही नव्या पिढीला माहीत नाहीत. ज्वारी, बाजरी, भुईमूग ही तृणधान्ये आणि तूर, मूग, उडीद आणि मटकीसारखी डाळवर्गीय पिकेही हळूहळू बाद होत आहेत. कृषी खात्याने याचा अभ्यास केला तो १९९५ पासून, म्हणजे २0 वर्षांचा त्याचा निष्कर्ष धक्कादायक यासाठी की, आताचे क्षेत्र उणे ९३ टक्क्यांनी घटले. तीच स्थिती ज्वारी (-८२), बाजरी (-७३), भुईमूग (-८२), अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल संपत आला. या उलट मक्याचे क्षेत्र ४0 टक्क्यांनी वाढले. कापूस ५२ टक्क्यांनी, तर सोयाबीनच्या क्षेत्रात थोडीथोडकी नव्हे, तर ५३0७ टक्क्यांनी वाढ झाली. कडधान्याची अवस्था तर दखल न घेण्यासारखी आहे.याचा अर्थ मिश्र पीक पद्धती बाद होऊन एकसुरी पिके घेण्याचा आग्रह दिसतो. याचा परिणाम मराठवाड्यातील आहारावर झाला. लोकांच्या आहारातील डाळींचे प्रमाण प्रचंड घटले. त्याची जागा भाजीपाल्याने घेतली. त्यामुळे प्रथिनांची कमतरता ही सार्वत्रिक बाब ठरली. तसेही शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांचा तुटवडा असतो. त्यात आहारातील डाळींचे प्रमाण घटल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. तो इतका की, प्रथिनांची कमतरता हा आता मराठवाड्याच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनू पाहतोय. हे धान्य घरात असल्याने लोकांच्या आहारात त्याचा समावेश होता, आता शेतातच नाही, तर ताटात कोठून पडणार?हा परिणाम एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, तो जमिनीच्या पोतावर झाला. एकसुरी पीक पद्धतीत मशागतीसाठी जनावरांची गरज कमी झाली, तशी जनावरांची संख्या लक्षणीय घटली. दावण नावाचा प्रकार संपुष्टात आला. बैलजोडी सांभाळण्याऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागत सोयीची वाटू लागली; पण त्याचा थेट परिणाम म्हणजे जमिनीतील सेंद्रिय खत मिळेनासे झाले. सारा भर रासायनिक खतांवर पडला. जमिनीचा पोत बिघडला. पर्यावरणाचे किती नुकसान झाले हा भाग वेगळा. याचा परिणाम म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नसताना उत्पादन वाढले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही. म्हणजे पीक पद्धतीतील बदलामुळे शेतकऱ्यांचा असाही फायदा झाला नाही. नुकसान मात्र पावलापावलावर झाले आहे. त्याची आणि जमिनीची अशी दोघांची भूक भागली नाही, दोघेही भुकेले आहेत.- सुधीर महाजन