शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

कहाणी ‘रित्या’ ताटाची

By admin | Updated: June 1, 2016 03:18 IST

१९७२ चा दुष्काळ हा मराठवाड्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेतील ‘लँडमार्क’ समजला जावा. हे यासाठी की, या दुष्काळाने शेती नव्हे

१९७२ चा दुष्काळ हा मराठवाड्याची शेती उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेतील ‘लँडमार्क’ समजला जावा. हे यासाठी की, या दुष्काळाने शेती नव्हे, तर माणसाचा आणि विचार करण्याचा पोतच बदलला. शेतीची घडी विस्कटली येथून आणि माणूस जमिनीपासून सुटला येथूनच. त्याचे बरे-वाईट परिणाम आपण पाहातो आणि अनुभवतो. त्यापूर्वी शेतीमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती ती ६४-६५ च्या सुमारास. तेव्हा हायब्रीड बियाणे अवतरले. हरित क्रांतीचा तो काळ होता. बियाणे बदलले; पण पीक पद्धती कायम होती. पुढे नगदी पिकाचे आकर्षण वाढले आणि पिकेही बदलली. ४५ वर्षांपूर्वीची पिके आज मराठवाड्यात पाहायला मिळत नाहीत. औरंगाबाद विभागाच्या कृषी खात्याने या बदलाचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष निघाले आहेत.समाज बदलाच्या प्रक्रियेत शेतीचाही वाटा असतो. अगोदर म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यातील पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ज्वारी, बाजरी, भुईमूग, भात, तूर, मटकी, मूग, उडीद, कापूस अशी पिके शिवारात दिसायची. याच्या जोडीला भगर, राळे, तीळ, जवस, काराळे ही पिकेही होती आणि ही मिश्र पीक पद्धती आहाराचा आधार होता. पुढे नगदी पिके आणि कमी कष्टात अधिक उत्पन्न हा मार्ग निवडल्याने यातील काही पिके तर बाद झाली. राळे, काराळे, जवस, हुलगे या पिकांची नावेही नव्या पिढीला माहीत नाहीत. ज्वारी, बाजरी, भुईमूग ही तृणधान्ये आणि तूर, मूग, उडीद आणि मटकीसारखी डाळवर्गीय पिकेही हळूहळू बाद होत आहेत. कृषी खात्याने याचा अभ्यास केला तो १९९५ पासून, म्हणजे २0 वर्षांचा त्याचा निष्कर्ष धक्कादायक यासाठी की, आताचे क्षेत्र उणे ९३ टक्क्यांनी घटले. तीच स्थिती ज्वारी (-८२), बाजरी (-७३), भुईमूग (-८२), अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल संपत आला. या उलट मक्याचे क्षेत्र ४0 टक्क्यांनी वाढले. कापूस ५२ टक्क्यांनी, तर सोयाबीनच्या क्षेत्रात थोडीथोडकी नव्हे, तर ५३0७ टक्क्यांनी वाढ झाली. कडधान्याची अवस्था तर दखल न घेण्यासारखी आहे.याचा अर्थ मिश्र पीक पद्धती बाद होऊन एकसुरी पिके घेण्याचा आग्रह दिसतो. याचा परिणाम मराठवाड्यातील आहारावर झाला. लोकांच्या आहारातील डाळींचे प्रमाण प्रचंड घटले. त्याची जागा भाजीपाल्याने घेतली. त्यामुळे प्रथिनांची कमतरता ही सार्वत्रिक बाब ठरली. तसेही शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांचा तुटवडा असतो. त्यात आहारातील डाळींचे प्रमाण घटल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. तो इतका की, प्रथिनांची कमतरता हा आता मराठवाड्याच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनू पाहतोय. हे धान्य घरात असल्याने लोकांच्या आहारात त्याचा समावेश होता, आता शेतातच नाही, तर ताटात कोठून पडणार?हा परिणाम एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, तो जमिनीच्या पोतावर झाला. एकसुरी पीक पद्धतीत मशागतीसाठी जनावरांची गरज कमी झाली, तशी जनावरांची संख्या लक्षणीय घटली. दावण नावाचा प्रकार संपुष्टात आला. बैलजोडी सांभाळण्याऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागत सोयीची वाटू लागली; पण त्याचा थेट परिणाम म्हणजे जमिनीतील सेंद्रिय खत मिळेनासे झाले. सारा भर रासायनिक खतांवर पडला. जमिनीचा पोत बिघडला. पर्यावरणाचे किती नुकसान झाले हा भाग वेगळा. याचा परिणाम म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नसताना उत्पादन वाढले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही. म्हणजे पीक पद्धतीतील बदलामुळे शेतकऱ्यांचा असाही फायदा झाला नाही. नुकसान मात्र पावलापावलावर झाले आहे. त्याची आणि जमिनीची अशी दोघांची भूक भागली नाही, दोघेही भुकेले आहेत.- सुधीर महाजन