शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

शिवरायांच्या राज्याभिषेकाची कहाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 07:39 IST

१९४३ साली वा. सी. बेंद्रे यांनी गागाभट्टकृत ‘राज्याभिषेकप्रयोग:’ या संस्कृत  ग्रंथाची पोथी बिकानेर राज्य हस्तलिखित संग्रहालयातून शोधून काढली.

- साधना बेंद्रे, अध्यक्ष, इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे मेमोरियल ट्रस्ट

महाराष्ट्राला साक्षेपी इतिहास संशोधकांची, व्यासंगी इतिहासकारांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. प्रामुख्याने विसाव्या शतकात मराठ्यांच्या इतिहासाच्या शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाला प्रारंभ झाला आणि वस्तुनिष्ठ मांडणीची परंपरा सुरू झाली. याच धारेतील एक श्रेष्ठ इतिहासकार म्हणजे वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे! आज छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करताना इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांचे स्मरण घडते ते त्यांनी केलेल्या अत्यंत मौलिक अशा  कार्यामुळेच! 

मराठ्यांच्या इतिहासाचे विविधांगी पैलू उजेडात आणण्याचे महत्कार्य तर वा. सी. बेंद्रे यांनी केलेच ; पण छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक विधीचा साद्यंत वृतान्त मराठी जनांसमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य बेंद्रे यांनी केले. गागाभट्टकृत राजाभिषेकप्रयोगः या संस्कृत ग्रंथाचा मराठी आणि इंग्लिश अनुवाद करून वा. सी. बेंद्रे यांनी शिवराज्याभिषेकाचा विधी जगभरातील वाचकांसमोर आणला. एका अर्थाने, वा. सी. बेंद्रेंच्या या भाषांतरकार्यामुळे राज्याभिषेकाच्या विधीची माहिती इतिहास अभ्यासक व शिवप्रेमी यांच्यासाठी खुली झाली. 

१९४३ साली बेंद्रेंनी “गागाभट्टकृत ‘राज्याभिषेकप्रयोग:’ या संस्कृत ग्रंथाची पोथी बिकानेर राज्य हस्तलिखित संग्रहालयातून शोधून काढली. तेथील दिवाण श्री. मनुभाई मेहता यांच्या सहकार्याने ही प्रत त्यांनी नकलून घेतली. मग, या ग्रंथाचे सुलभ मराठीत भाषांतर करून हा ऐतिहासिक ऐवज त्यांनी मराठी वाचकांसमोर आणला. इतिहास अभ्यासकांसाठी ही जणू पर्वणीच ठरली आहे. वा. सी. बेंद्रेंचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असे सांगतो की, ही पोथी पूर्णतः वैदिक असून सात दिवसांच्या कालावधीत करावयाच्या राज्याभिषेकाचे विधी गागाभट्टांनी यात दिनवार लिहून काढले आहेत. सदर ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘शिवराज्याभिषेक - मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना’ या डॉ. सदानंद मोरे संपादित ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.

राज्याभिषेकाचा सविस्तर विधी मांडतानाच, राज्याभिषेक का आवश्यक होता याचे बेंद्रेंनी केलेले विश्लेषणही विलक्षण आहे. राज्याभिषेकाच्या घटनेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीच्या परिप्रेक्ष्यात असलेले महत्त्व विषद करताना बेंद्रे लिहितात, ‘शिवराज्याभिषेकामुळे सतराव्या शतकात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि व्यावहारिक संघटनाचे एक उत्तम व प्रभावी साधन महाराष्ट्राच्या हाती आले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सांस्कृतिक उत्क्रांतीची ही एक महत्त्वाची घटना होती. या घटनेतील सांस्कृतिक तत्त्वांचा आत्मा अमर होता, याची आजही प्रचीती येते.’

 

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज