शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

गोव्यातील वादळ

By admin | Updated: September 2, 2016 02:52 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभागाचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाने दिले आणि या चिरेबंदी मानल्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभागाचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाने दिले आणि या चिरेबंदी मानल्या जाणाऱ्या संघटनेच्या गोवा विभागात बंडाळीसदृश स्थिती निर्माण झाली. लगोलग सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे तर दिलेच शिवाय प्रांताचे प्रतिनिधी म्हणून आलेल्यांसमोर आपल्या प्रक्षोभाला वाट मोकळी करून दिली. संघाच्या इतिहासातले अशा प्रकारचे हे पहिलेच बंड असावे. यामागे आहे तो गोव्यातल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा वाद. इथले भाजपा सरकार मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे धोरण असल्याचे सांगते पण त्याचवेळी चर्चसंस्थेच्या अखत्यारीतल्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदानही देते. काँग्रेसच्या कारकिर्दीतला हा निर्णय बदलणे नव्या सरकारला शक्य झाला नाही, यामागे अर्थातच राजकीय अपरिहार्यता आहे. काँग्रेस राजवटीत गठित झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंच या संघटनेने या दुटप्पीपणाच्या निषेधार्थ आपले आंदोलन तीव्र केले. सुभाष वेलिंगकर या मंचाचे निमंत्रक. राज्यभर भ्रमण करत त्यांनी आपल्याच एके काळच्या चेल्यांचे वस्त्रहरण करणे सुरू केले. राज्याच्या मंत्र्यांबरोबरच केंद्रीय संरक्षणमंत्रदी मनोहर पर्रीकर यांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांना काळे झेंडे दाखविले गेले. भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही काळे झेंडे दाखविण्यात आले. वेलिंगकर यांनी तर आता मंच येत्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करील असे जाहीर करीत सरळ राजकीय पवित्रा घेतला आहे. दरम्यान त्यांनी आपली शस्त्रे म्यान करावीत यासाठी सर्वोच्च पातळीवर जे प्रयत्न जारी होते, त्यांना ते दाद देत नाहीत म्हटल्यावर त्यांच्यावर कारवाई होईल हे दिसतच होते. मात्र त्यांना पाठबळ देत गोव्यातले अवघे स्वयंसेवक विद्रोह करतील याचा अंदाज नागपूरला नसावा. पण संघ आणि भाजपा यामध्ये निर्माण झालेली ही दरी भाजपाच्या येत्या निवडणुकीअंती गोव्यात पुन्हा सत्तारोहण करण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावू शकते. पंचवीस-तीस हजारांचे विधानसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात पाच-सहाशे मतांचा फरक विजेता आणि पराभूत यात बदल करू शकतो. वेलिंगकर यांनाही हेच अभिप्रेत आहे. किंबहुना भारतीय भाषांच्या काळजीपेक्षा भाजपाचे पतन हाच त्यांचा आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचचा यापुढला कार्यक्रम असेल असे संकेत ताज्या घटनाक्रमावरून मिळत आहेत.