शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

कपडे फाडणे थांबवा...

By admin | Updated: May 20, 2014 08:40 IST

सार्‍यांनी मिळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घालवा अशी मागणी करायची, हा सारा वस्त्रे गमावून बसलेल्यांनी एकत्र येऊन दुसर्‍या एकाला आपल्यासारखे बनविण्याचा चालविलेला पोरखेळ आहे.

माणिकराव ठाकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांना दोष द्यायचा, राण्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळायचा, कदमांनी त्याच्या जोडीने कदमताल करायचा आणि सार्‍यांनी मिळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घालवा अशी मागणी करायची, हा सारा वस्त्रे गमावून बसलेल्यांनी एकत्र येऊन दुसर्‍या एकाला आपल्यासारखे बनविण्याचा चालविलेला पोरखेळ आहे. माणिकराव ठाकरे यवतमाळात पडले, राणे रायगडात उताणे झाले, कदमांना त्यांचे बाळ पुण्यातून निवडून आणता आले नाही... थोड्याफार फरकाने गोंदियापासून मुंबईपर्यंतच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढार्‍यांची स्थिती अशीच राहिली. भाजप-सेनेच्या युतीविरुद्ध काहीएक करू न शकलेली ही माणसे आता सूडाने पेटून उठली आहेत आणि त्यासाठी त्यांना एक विषय हवा आहे. पृथ्वीराज चव्हाण हा चांगला व नेमका निशाणावर असलेला विषय आहे. दिल्लीहून मुंबईत आल्यापासून पृथ्वीराज कधीच स्थिर नव्हते. इथल्या कोणावर त्यांचा विश्वास नव्हता आणि इथल्याही कोणाला त्यांच्याविषयी आपुलकी नव्हती. कराड या त्यांच्या प्रत्यक्ष गावातला काँग्रेस पक्षही त्यांच्याकडे साशंकतेने पाहणारा व त्यांच्या स्वागताला फारसा उत्सुक नसलेला होता. पण, प्रथम मनमोहनसिंग व पुढे सोनिया गांधी यांचा कृपाप्रसाद प्राप्त केलेल्या पृथ्वीराजांना उघड विरोध करणे म्हणजे दिल्लीचा रोष ओढवून घेणारे असल्याने तेव्हा गप्प राहिलेले हे तेव्हाचे आशाळभूत व आताचे जखमी शिलेदार सामूहिक पराभवानंतर आपापला जुना राग घेऊन पृथ्वीराजांविरुद्ध एकवटले आहेत. मुळात ही काँग्रेसची संस्कृती नाही. ती खेकड्यांची संस्कृती आहे; पण जे बिळाबाहेर येऊन वाढण्याची क्षमता हरवून बसतात, त्यांना एकमेकांचे पाय ओढण्याची तीच रीत अवलंबावी लागते. काँग्रेसच्या झालेल्या पानिपताला दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सारेच काँग्रेसचे पुढारी, कार्यकर्ते, चाहते, हौसे आणि गवशे कारणीभूत आहेत. सरकारने गरिबांसाठी आणलेल्या व त्यांच्या लाभाच्या ठरलेल्या साध्या योजनाही त्यांना लोकांना सांगता आल्या नाहीत, आपसातील भांडणे मिटविता आली नाहीत, आपल्याच उमेदवाराविरुद्ध शत्रूंचे झेंडे वा झाडू खांद्यावर घेऊन प्रचारात वावरताना त्यांना खंत वाटली नाही. तिकिटे वाटल्यापासूनच त्यांच्या या अध:पतनाला आरंभ झाला. आपण, आपली पोरे, पोरी, सुना, बायका आणि नातेवाइकांना त्यांची लायकी असो व नसो थेट लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची सार्‍यांना घाई. राष्ट्रवादीच्या शरद पवारांना तर आपण ज्याला शेंदूर लावू तो देव बनेल, हा भ्रम. मग भुजबळांचा बळी, पद््मसिंहांची खांडोळी आणि प्रफुल्ल पटेलांचा पतंग होणे स्वाभाविक म्हणावे असेच नव्हते काय? सुशीलकुमार पडतात, संजय निरुपम हरतात, गावितांवर गावातच राहण्याची वेळ येते, शिवाजी मोघ्यांना सत्यसाईबाबांकडे आणि दत्ता मेघ्यांना चक्क नितीन गडकरींकडेच जावे लागते... ही वाताहत नाही. हा या सार्‍यांच्या राजकारणाचा शेवट आहे. आपण नापास झालो, हे एकदा मुकाट्याने मान्य करा आणि नव्या पाटीपुस्तकानिशी पुढच्या परीक्षेची तयारी करा. आता ते जुने धडे कामी यायचे नाहीत. पुन्हा दलित, आदिवासी आणि अल्पसंख्य ही गाणी कोणाला भुलवायची नाहीत. समाजासोबत राहण्याची, दुरावलेले जवळ आणण्याची, त्यातल्या दुखावलेल्यांची क्षमा मागण्याची आणि त्यांच्या पुढे नव्हे तर सोबत राहून चालण्याची तयारी करा. आपले साधे जातविरोधी वा पुतळाविरोधी वक्तव्य समाजातील केवढ्या मोठ्या वर्गाला दुखावून दूर नेते, याची गणिते मांडा. ज्ञानाचा व ज्ञानी माणसाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. आपल्या मर्यादा ओळखा. आपल्या सामर्थ्याविषयीचे, बुद्धिवैभवाविषयीचे आणि लोकप्रियतेबाबतचे अजून डोक्यात असलेले भ्रम काढून टाका. नवी माणसे, नवे वर्ग, नव्या वस्त्या आणि नवी गावे शोधा आणि जोडा. जुने उमेदवार आणि जुनी कार्यशैली मोडीत काढा. नवे उमेदवार नवे कार्यक्रम आणि नवा जोम हाती घ्या. नव्यांना संधी द्या आणि नाइलाज म्हणून का होईना स्वत:ला बाजूला ठेवण्याची तयारी करा आणि हो, ते नवे उमेदवार निवडताना पुन्हा आपल्याच घरातले निवडू नका. आपण पडलो तसे आपल्या नव्या पिढ्यांनाही पाडू नका. महाराष्ट्रात उदयाला आलेली नवी पिढी अतिशय बुद्धिमान आहे. तिच्यातील गुणवंतांना, त्यांची जातपात व धर्म-पंथ न पाहता पुढे करा आणि त्यांचे झेंडे खांद्यावर घेण्यात धन्यता माना... तशीही येती पाच वर्षे तुम्हाला सत्तेपासून दूर राहून अध्ययनच तेवढे करायचे आहे. ते करा आणि शहाणे व्हा. आजवर केले, झाले ते भरपूर झाले, हाणामार्‍या पुरेशा झाल्या, आरोप-प्रत्यारोपही जुने झाले. आता तरी एकमेकांचे कपडे फाडणे थांबवा आणि जमेल तेवढी विधायक कामे हाती घ्या.