शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

निष्पाप मच्छीमारांच्या अटकेचं ‘धोरण’ थांबवावं; भारताला याचा बसला आहे मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 07:51 IST

मासे पकडण्यासाठी बऱ्याचदा निष्पाप मच्छीमार चुकून पाकिस्तानच्या हद्दीत जातात. त्यांना अटक करणं चुकीचं आहे. भारताला याचा मोठा फटका बसला आहे.

- जतीन देसाई

श्रीधर चामरे नावाच्या महाराष्ट्राच्या तरुणाचा पाकिस्तानच्या मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या (एमएसए) गोळीबारात शनिवारी समुद्रात मृत्यू झाला. गुजरातच्या सौराष्ट्रातून मासे पकडण्यासाठी तो समुद्रात गेला होता. गुजरातमधून  समुद्रात मासे पकडायला जाणं म्हणजे जिवाशी खेळणे आहे. चामरे जलपरी नावाच्या बोटीवर होता. त्यावर एमएसएने गोळीबार केला होता. एमएसएने एक दुसरी भारतीय बोट पकडली आणि सहा मच्छिमारांना अटक केली. जवळपास ६०० भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या कराची येथील तुरुंगात आहेत.अलीकडे मासे पकडणं अवघड बनलं आहे. गुजरातच्या पोरबंदर, ओखा, वेरावळ व केंद्रशासित दीव येथून  १५-१७ दिवसांसाठी मासे पकडण्यासाठी बोटी निघतात. याचा अर्थ मच्छिमारांना समुद्रात खूप लांब जावं लागतं.

प्रदूषणामुळे सौराष्ट्रजवळ मासे मिळत नसल्याने त्यांना पाकिस्तानच्या दिशेला नाईलाजाने जावं लागतं. अनेकदा इंटरनॅशनल मेरिटाईम बाउंड्री लाईनच्या (आयएमबीएल) जवळ, पण भारताच्या पाण्यात असतानादेखील एमएसएचे जवान स्पीडबोटीने येऊन भारतीय मच्छिमारांना पकडून कराचीत घेऊन जातात. आतापर्यंत १२०० हून अधिक भारतीय बोटी पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात घेतल्या आहेत. एका बोटीची सरासरी किंमत ५० लाखांहून अधिक असते. पाकिस्तानच्या समुद्रात मासे खूप असल्याने तिकडच्या मच्छिमारांना भारताच्या दिशेने येण्याची आवश्यकता नसते. ६४ पाकिस्तानी मच्छिमार भारताच्या तुरुंगात आहेत.

पाकिस्तानच्या एमएसएने केलेल्या गोळीबारात मच्छिमार मारले जातात. भारताच्या कोस्ट गार्ड आणि पाकिस्तानच्या एमएसएनी तात्काळ बैठक घेऊन, पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार होणार नाही याची हमी घेतली पाहिजे. भारत सरकारने पाकिस्तानला ताकीद दिली पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी दोन मच्छिमारांची शिक्षा २०१७ मध्येच पूर्ण झाली आहे. ३२ जणांची २०१८ मध्ये आणि १५३ जणांची २०१९ मध्ये. गेल्या वर्षी ८१ भारतीय मच्छिमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. हे सगळे भारतीय नागरिक असल्याचं भारत सरकारने पाकिस्तानला कळवलं असूनही ते अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.

भारत आणि पाकिस्तानात २००८ मध्ये एग्रीमेंट ओन कॉन्सुलर ऍक्सेस नावाचा करार करण्यात आला. त्याअंतर्गत पकडल्या गेलेल्या दुसऱ्या देशाच्या नागरिकांना तीन महिन्याच्या आत त्याच्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्याला भेट घेऊ  देण्याची तरतूद आहे, पण सहसा तसं होत नाही. गुजरातच्या कच्छच्या सरहद्दीवरील लतीफ सामा नावाच्या व्यक्तीने २०१८ मध्ये चुकून सरहद्द ओलांडलेली. २२ एप्रिल २०१९ ला त्याची शिक्षा पूर्ण झाली. पण अजूनही भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला त्याची भेट घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर तो भारतीय आहे की नाही, ते ठरवण्याची प्रक्रिया सुरू होते. काही अशाही केसीस आहेत की, ज्यात काही वर्षे झाली तरी, ती व्यक्ती भारतीय किंवा पाकिस्तानी आहे ते शोधून काढण्यात आलेलं नाही. 

एखादा माणूस पहिल्यांदा पकडला गेला, तर त्याच्या घरी तो पाकिस्तानच्या तुरुंगात असेपर्यंत दररोज ३०० रुपयेप्रमाणे मदत सरकारकडून केली जाते. पण दुसऱ्यांदा पकडला गेल्यास ती मदत मिळत नाही. दुसऱ्यांदा तुरुंगात गेलेले अनेक जण आहेत. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असूनदेखील गुजरातमधील राजकीय नेतृत्व त्यावर आक्रमक भूमिका घेताना आढळत नाही. आपल्या देशाच्या पाण्यात दुसऱ्या देशाच्या मच्छिमार बोटी येत असल्यास त्यांना पकडण्याऐवजी त्यांना त्यांच्या देशाच्या पाण्यात परत जाण्यास भाग पाडण्यात यावं. थोडक्यात, अटक न करण्याचं धोरण दोन्ही देशांनी स्वीकारलं पाहिजे.

टॅग्स :Fishermanमच्छीमार